शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

जालना जिल्ह्यातील ४८ प्रकल्पांमध्ये ५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 20:19 IST

जिल्ह्यातील ५७ लघु प्रकल्पांपैकी पाच प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत.

ठळक मुद्देमध्यम प्रकल्पांमध्ये ६३ टक्के जिल्ह्यातील १६ प्रकल्पांमध्ये मृतसाठा

जालना : यंदा जिल्ह्यात वेळेवर आणि मुबलक प्रमाणात पाऊस झाला आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील ६४ पैकी ४८ प्रकल्पांमध्ये ५०.९९ टक्के पाणीसाठा झाला आहे. विशेषत: मध्यम प्रकल्पात ६३.६४ टक्के पाणीसाठा झाल्याने शहरी, ग्रामीण भागातील पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील १६ प्रकल्पांमध्ये अद्यापही मृत पाणीसाठा आहे. 

जून महिन्याच्या प्रारंभीपासूनच जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील नद्या, नाल्यांना पूर आला आहे. नद्या दुथडी वाहिल्याने जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्यात वाढ होत आहे. जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांमध्ये ६३.६४ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यात भोकरदन तालुक्यातील जुई, धामणा व जाफराबाद तालुक्यातील जीवरेखा मध्यम प्रकल्प ओसंडून वाहिला आहे. तर अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्पात ८४.३९ टक्के पाणीसाठा झाला आहे. 

बदनापूर तालुक्यातील अपर दुधना प्रकल्पात ६८.३९ टक्के, जालना तालुक्यातील कल्याण गिरजा प्रकल्पात २९.८९ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर कल्याण मध्यम प्रकल्पात अद्याप अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. जिल्ह्यातील ५७ मध्यम प्रकल्पांमध्ये ५२.५९ दलघमी म्हणजे ४३.७८ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील एकूण ६४ प्रकल्पांपैकी १६ प्रकल्प आजही जोत्याखाली आहेत. १२ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपर्यंत उपयुक्त पाणीसाठा आहे. १३ प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्क्यांच्या दरम्यान तर १२ प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्क्यांच्या दरम्यान उपयुक्त पाणीसाठा आहे. शिवाय जिल्ह्यातील आठ प्रकल्पांमध्ये ७६ टक्क्यांपेक्षा अधिक उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तर जिल्ह्यातील तीन प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत.

पाच लघु प्रकल्प तुडुंब जिल्ह्यातील ५७ लघु प्रकल्पांपैकी पाच प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. यात जाफराबाद तालुक्यातील भारज, शिंदी, बदनापूर तालुक्यातील आन्वी, भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को, रेलगाववाडी हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. इतर लघु प्रकल्पांमध्येही पाण्याची आवक समाधानकारक सुरू आहे.

पाणीटंचाईचा प्रश्न मार्गीजिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये जवळपास ५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. विशेषत: भोकरदन, जाफराबाद, अंबड, बदनापूर तालुका व परिसरात दमदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे या भागातील प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला असून, शहरी, ग्रामीण भागाचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे.

टॅग्स :JalanaजालनाDamधरणWaterपाणीRainपाऊस