शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यातील ४८ प्रकल्पांमध्ये ५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 20:19 IST

जिल्ह्यातील ५७ लघु प्रकल्पांपैकी पाच प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत.

ठळक मुद्देमध्यम प्रकल्पांमध्ये ६३ टक्के जिल्ह्यातील १६ प्रकल्पांमध्ये मृतसाठा

जालना : यंदा जिल्ह्यात वेळेवर आणि मुबलक प्रमाणात पाऊस झाला आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील ६४ पैकी ४८ प्रकल्पांमध्ये ५०.९९ टक्के पाणीसाठा झाला आहे. विशेषत: मध्यम प्रकल्पात ६३.६४ टक्के पाणीसाठा झाल्याने शहरी, ग्रामीण भागातील पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील १६ प्रकल्पांमध्ये अद्यापही मृत पाणीसाठा आहे. 

जून महिन्याच्या प्रारंभीपासूनच जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील नद्या, नाल्यांना पूर आला आहे. नद्या दुथडी वाहिल्याने जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्यात वाढ होत आहे. जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांमध्ये ६३.६४ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यात भोकरदन तालुक्यातील जुई, धामणा व जाफराबाद तालुक्यातील जीवरेखा मध्यम प्रकल्प ओसंडून वाहिला आहे. तर अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्पात ८४.३९ टक्के पाणीसाठा झाला आहे. 

बदनापूर तालुक्यातील अपर दुधना प्रकल्पात ६८.३९ टक्के, जालना तालुक्यातील कल्याण गिरजा प्रकल्पात २९.८९ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर कल्याण मध्यम प्रकल्पात अद्याप अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. जिल्ह्यातील ५७ मध्यम प्रकल्पांमध्ये ५२.५९ दलघमी म्हणजे ४३.७८ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील एकूण ६४ प्रकल्पांपैकी १६ प्रकल्प आजही जोत्याखाली आहेत. १२ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपर्यंत उपयुक्त पाणीसाठा आहे. १३ प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्क्यांच्या दरम्यान तर १२ प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्क्यांच्या दरम्यान उपयुक्त पाणीसाठा आहे. शिवाय जिल्ह्यातील आठ प्रकल्पांमध्ये ७६ टक्क्यांपेक्षा अधिक उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तर जिल्ह्यातील तीन प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत.

पाच लघु प्रकल्प तुडुंब जिल्ह्यातील ५७ लघु प्रकल्पांपैकी पाच प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. यात जाफराबाद तालुक्यातील भारज, शिंदी, बदनापूर तालुक्यातील आन्वी, भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को, रेलगाववाडी हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. इतर लघु प्रकल्पांमध्येही पाण्याची आवक समाधानकारक सुरू आहे.

पाणीटंचाईचा प्रश्न मार्गीजिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये जवळपास ५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. विशेषत: भोकरदन, जाफराबाद, अंबड, बदनापूर तालुका व परिसरात दमदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे या भागातील प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला असून, शहरी, ग्रामीण भागाचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे.

टॅग्स :JalanaजालनाDamधरणWaterपाणीRainपाऊस