शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
2
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
3
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
4
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
5
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
6
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
7
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
8
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
9
सोमवती अमावस्या आणि लक्ष्मी पूजनाचा दुर्मिळ योग; 'या' ७ राशींच्या आयुष्याला मिळणार कलाटणी
10
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
11
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
12
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
13
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
14
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
15
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
16
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांचे 'रॉकेट' जमिनीवरच, भारतानं वाढवली रशियन तेल खरेदी!
18
यंदा किंग खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, मोठं कारण आलं समोर
19
YouTuber Murder: युट्यूबर पुष्पाची आत्महत्या नव्हेतर हत्या! कारण काय, आरोपी कोण?
20
Tejashwi Yadav: तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार

सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 14:22 IST

किमान ५००० पाण्याचे टँकर आणि १००० रुग्णवाहिका सोबत असाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जारंगे यांनी 29 ऑगस्टला चलो मुंबई, असा नारा देत, मराठा बांधवांना मोठ्या प्रमाणावर मुंबईकडे कूच करण्याचे आवाहन केले आहे. याच बरोबर, कुठलेही कारण न सांगता, शेतकरी, चालक, वाहक, वारकरी आदी सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असेही जरांगे यांनी म्हटले आहे. याशिवाय, त्यांनी मराठा बांधवांना, असतील त्यांनी पाण्याचे टँकर आणि रुग्णवाहिका सोबत घ्या. किमान ५००० पाण्याचे टँकर आणि १००० रुग्णवाहिका सोबत असाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ते अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी बोलत होते.

जरांगे म्हणाले, "शेतकरी असेल, व्यवसायिक असेल, ट्रकवर असेल, बसवर ड्रायव्हर कंडक्टर असेल, महाराज मंडळी असतील, वारकरी असतील, टाळकरी, गायक, वादक, या सर्वांनी यावेळी तुटून पडावे. सगळे जण मुंबईकडे निघा आता, कुणी शेतीचे कारण सांगू नका, कुणी नोकरीचे कारण सांगू नका, डॉक्टर-वकिलांनी सांगू नका सर्वांनी तयारीने चलायचे आहे." 

"विशेष करून आज पासून महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना सांगतो की, जेथे-जेथे पाण्याचे टँकर असतील, ते सोबत घ्या आपल्या मुलांना पिण्याचे पाणी लागेल. जेजे डॉक्टर बंधव ही प्रेस ऐकत आहेत, त्यांनाही माझी विनंती आहे की, त्यांनीही अँब्यूलन्स आणि  औषधी सोबत घ्यावी. १००० हून अधिक अँब्यूलन्स हव्यात आणि ५००० हून अधिक पाण्याचे टँकर हवेत. मी सांगितले आहे, ५००० हून अधिक पाण्याचे टँकर घ्याचे आणि तेथे एकही नसले, तर तुम्ही म्हणाल, ५००० हजार टँकर सांगितले आणि येथे एकही नाही. माझ्याकडे काय कंपनी आहे का? जिल्ह्या जिल्यातील आपल्या बांधवांना हे घडवून आणावे लागणार आहे," असे जरांगे म्हणाले. 

जरांगे पुढे म्हणाले, "याच बरोबर मी आणखी चार आवाहणे केली आहेत. शिक्षक असतील, वकील असतील, डॉक्टर असतील आणि श्रीमंत राजकारणी मराठे असतील, यांनी आपापली वाहने बाहेर काढावीत, असे मी म्हटले आहे. तुम्हाला नोकरीवर जायचे तर जा, पण आपली वाहने बाहेर काढा. तुम्ही आम्हाल केवळ तीन दिवस साथ द्या. २७,२८ आणि २९ तारखेला आम्ही मैतानावर बसलो की तुम्ही परत या हवं तर. तुम्ही थांबू नका." 

मला आंदोल शांततेत हवं... -"मराठा समाजाला खरे बोलायला हवे, आम्हाल खोटं होलून कुणालाही मुंबईत न्यायचे नाही. सर्वांनी मुंबई कडे चलायचे आहे. आपापली वाहने घेऊन. आम्ही तेथे बसल्यानंतर तुम्ही आम्हाल आशीर्वाद द्या आणि परत या. ही सर्व महाराष्ट्रातील मराठ्यांना विनंती करतो. आपण संपूर्ण शक्तीनीशी यात उतरल्याशिवाय पर्याय नाही. फक्त एकच सांगतो की मला आंदोल शांततेत हवे आहे. कुणीही जाळपोळ, दगडफेक करायची नाही. नसता त्याने आमच्यासोबत यायचे नाही," असेही जरांगे यांनी स्पष्ट शब्दात म्हटले आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणMumbaiमुंबईWaterपाणी