शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 14:22 IST

किमान ५००० पाण्याचे टँकर आणि १००० रुग्णवाहिका सोबत असाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जारंगे यांनी 29 ऑगस्टला चलो मुंबई, असा नारा देत, मराठा बांधवांना मोठ्या प्रमाणावर मुंबईकडे कूच करण्याचे आवाहन केले आहे. याच बरोबर, कुठलेही कारण न सांगता, शेतकरी, चालक, वाहक, वारकरी आदी सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असेही जरांगे यांनी म्हटले आहे. याशिवाय, त्यांनी मराठा बांधवांना, असतील त्यांनी पाण्याचे टँकर आणि रुग्णवाहिका सोबत घ्या. किमान ५००० पाण्याचे टँकर आणि १००० रुग्णवाहिका सोबत असाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ते अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी बोलत होते.

जरांगे म्हणाले, "शेतकरी असेल, व्यवसायिक असेल, ट्रकवर असेल, बसवर ड्रायव्हर कंडक्टर असेल, महाराज मंडळी असतील, वारकरी असतील, टाळकरी, गायक, वादक, या सर्वांनी यावेळी तुटून पडावे. सगळे जण मुंबईकडे निघा आता, कुणी शेतीचे कारण सांगू नका, कुणी नोकरीचे कारण सांगू नका, डॉक्टर-वकिलांनी सांगू नका सर्वांनी तयारीने चलायचे आहे." 

"विशेष करून आज पासून महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना सांगतो की, जेथे-जेथे पाण्याचे टँकर असतील, ते सोबत घ्या आपल्या मुलांना पिण्याचे पाणी लागेल. जेजे डॉक्टर बंधव ही प्रेस ऐकत आहेत, त्यांनाही माझी विनंती आहे की, त्यांनीही अँब्यूलन्स आणि  औषधी सोबत घ्यावी. १००० हून अधिक अँब्यूलन्स हव्यात आणि ५००० हून अधिक पाण्याचे टँकर हवेत. मी सांगितले आहे, ५००० हून अधिक पाण्याचे टँकर घ्याचे आणि तेथे एकही नसले, तर तुम्ही म्हणाल, ५००० हजार टँकर सांगितले आणि येथे एकही नाही. माझ्याकडे काय कंपनी आहे का? जिल्ह्या जिल्यातील आपल्या बांधवांना हे घडवून आणावे लागणार आहे," असे जरांगे म्हणाले. 

जरांगे पुढे म्हणाले, "याच बरोबर मी आणखी चार आवाहणे केली आहेत. शिक्षक असतील, वकील असतील, डॉक्टर असतील आणि श्रीमंत राजकारणी मराठे असतील, यांनी आपापली वाहने बाहेर काढावीत, असे मी म्हटले आहे. तुम्हाला नोकरीवर जायचे तर जा, पण आपली वाहने बाहेर काढा. तुम्ही आम्हाल केवळ तीन दिवस साथ द्या. २७,२८ आणि २९ तारखेला आम्ही मैतानावर बसलो की तुम्ही परत या हवं तर. तुम्ही थांबू नका." 

मला आंदोल शांततेत हवं... -"मराठा समाजाला खरे बोलायला हवे, आम्हाल खोटं होलून कुणालाही मुंबईत न्यायचे नाही. सर्वांनी मुंबई कडे चलायचे आहे. आपापली वाहने घेऊन. आम्ही तेथे बसल्यानंतर तुम्ही आम्हाल आशीर्वाद द्या आणि परत या. ही सर्व महाराष्ट्रातील मराठ्यांना विनंती करतो. आपण संपूर्ण शक्तीनीशी यात उतरल्याशिवाय पर्याय नाही. फक्त एकच सांगतो की मला आंदोल शांततेत हवे आहे. कुणीही जाळपोळ, दगडफेक करायची नाही. नसता त्याने आमच्यासोबत यायचे नाही," असेही जरांगे यांनी स्पष्ट शब्दात म्हटले आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणMumbaiमुंबईWaterपाणी