शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

घनसावंगीतून सलग ५ विजय; गतवेळी मतविभाजनाने तारले, यावेळी राजेश टोपेंना जड जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 20:07 IST

पाचवेळा आमदार तरी मतदार संघाच्या विकासाचे काय? जिल्ह्यात पक्ष देखील मजबूत झाला नाही

जालना : आजवरच्या निवडणुकांचा निकाल पाहता एखादा अपवाद पाहता मतविभाजनामुळे आ. राजेश टोपे यांना विजयाचा गुलाला उधळता आला आहे. परंतु यंदाची निवडणूक टोपे आणि समर्थकांना वाटते तितकी सोपी नाही. टोपेंविरोधात महायुतीकडून तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न आहे. विशेषत: यंदाच्या निवडणुकीत टोपे यांना सामाजिक नाराजीचा मोठा फटका बसू शकतो, असे जाणकरांना वाटते.

१९९९ ते २०१९ या कालावधीत घनसावंगी (पूर्वीचा अंबड) मतदार संघातील मतदारांनी सलग पाच वेळा आमदार काम करण्याची संधी राजेश टोपे यांना दिली आहे. घनसावंगीचे आमदार आणि राज्य मंत्रीमंडळात मंत्री म्हणूनही टोपे यांना काम करण्याची संधी मिळाली आहे. २५ वर्षे प्रमुख पदावर असतानाही मतदार संघातील रस्ते, पाणी आणि विजेचा प्रश्न पूर्णपणे सोडविण्यात आ. टोपे यांना अपयशच आल्याचा आरोप महायुतीकडून केला जात आहे. विशेषत: मराठा आणि ओबीसी आंदोलनातील आ. टोपे यांच्या भूमिकेवर टीका झाली. त्यामुळे दोन्ही समाजातील नाराजीचा सामना यंदा टोपे यांना निवडणुकीत करावा लागणार आहे.

राष्ट्रवादी जिल्ह्यात मजबूत का झाली नाहीराष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार, अजित पवार यांनी वेळोवेळी आ. राजेश टोपे यांना पक्ष-संघटन वाढविण्यासाठी बळ दिले. महिला संघटन वाढावे, यासाठी सुप्रिया सुळेही नेहमीच जालन्याच्या दौऱ्यावर असायच्या. परंतु, घनसावंगी, अंबड वगळता इतर तालुक्यात राष्ट्रवादी वाढलीच नाही, अशी टिका पक्षातीलच नेते खासगीत करतात. विशेष म्हणजे पक्षाचे प्रमुखपद आपल्या जवळच्याच कार्यकर्त्याकडे सोपविल्याचा सूरही आवळला जात आहे. भोकरदनमध्ये माजी आ. चंद्रकांत दानवे यांच्यामुळे राष्ट्रवादी बळकट असली तरी इतर ठिकाणी मात्र पक्षाची वाताहत दिसून येते.

उसाचे राजकारणकाही वर्षांपूर्वी टोपे यांच्याच कारखान्याला ऊस द्यावा लागायचा. परंतु, त्यातही आपला आणि विरोधक असे मोठे राजकारण केल्याचा आरोप वेळोवेळी शेतकऱ्यांसह विरोधकांनी केला आहे. त्याला पर्याय म्हणून सतीश घाटगे आणि नंतर हिकमत उढाण यांनीही आपापले युनिट सुरू करून ऊस उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि टोपे यांच्या कारखान्यापेक्षा अधिक दर देण्याचा प्रयत्न केल्याचा सूरही निघतो. त्यामुळे उसाच्या राजकारणाचेही उत्तर निवडणुकीत मविआच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना द्यावे लागणार असल्याचे सांगितले जाते.

अजित पवारांनी दिल्या होत्या कानपिचक्याराजेश टोपे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार जालन्यात आले होते. टोपे यांच्या घराकडे जाताना रस्त्यांची दुरवस्था आणि शहरातील अस्वच्छता पवारांच्या नजरेत आली होती. त्यावेळी अजित पवार यांनीही टोपे यांच्या घरीच कानपिचक्या दिल्याची चर्चा होती. या कानपिचक्यांवर राष्ट्रवादीच्या नाराज गटात चांगलीच चर्चा रंगली होती.

गत निवडणुकीतील मतदान: २०१९राजेश टोपे- राष्ट्रवादी- १,०७,८४९हिकमत उढाण- शिवसेना- १,०४,४४०विष्णू शेळके- वंचित- ९२९३

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकghansawangi-acघनसावंगी