शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
2
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
3
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
4
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
5
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
6
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
7
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
8
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
9
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
10
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
11
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
12
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
13
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
14
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
15
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
16
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
17
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
18
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
19
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
20
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार

घनसावंगीतून सलग ५ विजय; गतवेळी मतविभाजनाने तारले, यावेळी राजेश टोपेंना जड जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 20:07 IST

पाचवेळा आमदार तरी मतदार संघाच्या विकासाचे काय? जिल्ह्यात पक्ष देखील मजबूत झाला नाही

जालना : आजवरच्या निवडणुकांचा निकाल पाहता एखादा अपवाद पाहता मतविभाजनामुळे आ. राजेश टोपे यांना विजयाचा गुलाला उधळता आला आहे. परंतु यंदाची निवडणूक टोपे आणि समर्थकांना वाटते तितकी सोपी नाही. टोपेंविरोधात महायुतीकडून तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न आहे. विशेषत: यंदाच्या निवडणुकीत टोपे यांना सामाजिक नाराजीचा मोठा फटका बसू शकतो, असे जाणकरांना वाटते.

१९९९ ते २०१९ या कालावधीत घनसावंगी (पूर्वीचा अंबड) मतदार संघातील मतदारांनी सलग पाच वेळा आमदार काम करण्याची संधी राजेश टोपे यांना दिली आहे. घनसावंगीचे आमदार आणि राज्य मंत्रीमंडळात मंत्री म्हणूनही टोपे यांना काम करण्याची संधी मिळाली आहे. २५ वर्षे प्रमुख पदावर असतानाही मतदार संघातील रस्ते, पाणी आणि विजेचा प्रश्न पूर्णपणे सोडविण्यात आ. टोपे यांना अपयशच आल्याचा आरोप महायुतीकडून केला जात आहे. विशेषत: मराठा आणि ओबीसी आंदोलनातील आ. टोपे यांच्या भूमिकेवर टीका झाली. त्यामुळे दोन्ही समाजातील नाराजीचा सामना यंदा टोपे यांना निवडणुकीत करावा लागणार आहे.

राष्ट्रवादी जिल्ह्यात मजबूत का झाली नाहीराष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार, अजित पवार यांनी वेळोवेळी आ. राजेश टोपे यांना पक्ष-संघटन वाढविण्यासाठी बळ दिले. महिला संघटन वाढावे, यासाठी सुप्रिया सुळेही नेहमीच जालन्याच्या दौऱ्यावर असायच्या. परंतु, घनसावंगी, अंबड वगळता इतर तालुक्यात राष्ट्रवादी वाढलीच नाही, अशी टिका पक्षातीलच नेते खासगीत करतात. विशेष म्हणजे पक्षाचे प्रमुखपद आपल्या जवळच्याच कार्यकर्त्याकडे सोपविल्याचा सूरही आवळला जात आहे. भोकरदनमध्ये माजी आ. चंद्रकांत दानवे यांच्यामुळे राष्ट्रवादी बळकट असली तरी इतर ठिकाणी मात्र पक्षाची वाताहत दिसून येते.

उसाचे राजकारणकाही वर्षांपूर्वी टोपे यांच्याच कारखान्याला ऊस द्यावा लागायचा. परंतु, त्यातही आपला आणि विरोधक असे मोठे राजकारण केल्याचा आरोप वेळोवेळी शेतकऱ्यांसह विरोधकांनी केला आहे. त्याला पर्याय म्हणून सतीश घाटगे आणि नंतर हिकमत उढाण यांनीही आपापले युनिट सुरू करून ऊस उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि टोपे यांच्या कारखान्यापेक्षा अधिक दर देण्याचा प्रयत्न केल्याचा सूरही निघतो. त्यामुळे उसाच्या राजकारणाचेही उत्तर निवडणुकीत मविआच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना द्यावे लागणार असल्याचे सांगितले जाते.

अजित पवारांनी दिल्या होत्या कानपिचक्याराजेश टोपे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार जालन्यात आले होते. टोपे यांच्या घराकडे जाताना रस्त्यांची दुरवस्था आणि शहरातील अस्वच्छता पवारांच्या नजरेत आली होती. त्यावेळी अजित पवार यांनीही टोपे यांच्या घरीच कानपिचक्या दिल्याची चर्चा होती. या कानपिचक्यांवर राष्ट्रवादीच्या नाराज गटात चांगलीच चर्चा रंगली होती.

गत निवडणुकीतील मतदान: २०१९राजेश टोपे- राष्ट्रवादी- १,०७,८४९हिकमत उढाण- शिवसेना- १,०४,४४०विष्णू शेळके- वंचित- ९२९३

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकghansawangi-acघनसावंगी