शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
2
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
3
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
4
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
5
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
6
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
7
IND W vs BAN W Live Streaming : कुठं आणि कसा पाहाल भारत-बांगलादेश यांच्यातील सामना?
8
कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवारांनी दिला हिशेब, म्हणाले, "जरा सबुरीने घ्या..."
9
'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
10
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
11
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
12
'तक्रार केल्याने दिला जास्त त्रास'; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पीएसआय बदने, बनकर अटकेत
13
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
14
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
15
धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड
16
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
17
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
18
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
19
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
20
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले

प्रकल्पांमध्ये ४८ टक्के उपयुक्त जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 00:18 IST

परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ४७.९२ टक्के उपयुक्त पाणीसाठा वाढला आहे. जिल्ह्यातील एकूण ६४ पैकी ४० प्रकल्पांमध्ये हा उपयुक्त पाणीसाठा असून, इतर २३ प्रकल्प जोत्याखाली आहेत. तर एक प्रकल्प अद्यापही कोरडाठाक आहे

ठळक मुद्देपाणीप्रश्न मार्गी । ६४ पैकी ४० प्रकल्पांत उपयुक्त साठा

जालना : परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ४७.९२ टक्के उपयुक्त पाणीसाठा वाढला आहे. जिल्ह्यातील एकूण ६४ पैकी ४० प्रकल्पांमध्ये हा उपयुक्त पाणीसाठा असून, इतर २३ प्रकल्प जोत्याखाली आहेत. तर एक प्रकल्प अद्यापही कोरडाठाक आहे. प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने शहरी, ग्रामीण भागाचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे.यंदा आॅक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत वार्षिक सरासरीच्या जवळपास ७५ टक्क्यांपर्यंत पाऊस झाला होता. त्यानंतर मात्र, परतीच्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६८८.२१ मिमी ओलांडत एकूण ८०० मिमीहून अधिक पाऊस जिल्ह्यात झाला. परिणामी जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ होण्यास मोठी मदत झाली आहे. जालना जिल्ह्यात एकूण ६४ मध्यम व लघू प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत ४७.९२ टक्के उपयुुक्त पाणीसाठा झाला आहे. यात १० प्रकल्पांमध्ये ७६ ते १०० टक्क्यांच्या मध्ये उपयुक्त पाणीसाठा आहे. ७ प्रकल्पात ५१ ते ७५ टक्क्यांच्या मध्ये, ५ प्रकल्पात २६ ते ५० टक्क्यांच्या मध्ये तर १८ प्रकल्पात २५ टक्क्यांपर्यंत उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. २३ प्रकल्प अद्यापही जोत्याखाली असून, केवळ एक प्रकल्प कोरडाठाक आहे. प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने बहुतांश भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांपैकी केवळ जालना तालुक्यातील कल्याण गिरीजा प्रकल्प जोत्याच्या पातळीखाली आहे. तर कल्याण मध्यम प्रकल्पात ३१.१८ टक्के, बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकल्पात १३.८८ टक्के, भोकरदन तालुक्यातील जुई प्रकल्पासह धामणा प्रकल्प १०० टक्के भरला आहे. जाफराबाद तालुक्यातील जीवरेखा प्रकल्पात ४८ टक्के तर अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्पात ६०.२६ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

टॅग्स :JalanaजालनाWaterपाणीRainपाऊस