शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

प्रकल्पांमध्ये ४८ टक्के उपयुक्त जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 00:18 IST

परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ४७.९२ टक्के उपयुक्त पाणीसाठा वाढला आहे. जिल्ह्यातील एकूण ६४ पैकी ४० प्रकल्पांमध्ये हा उपयुक्त पाणीसाठा असून, इतर २३ प्रकल्प जोत्याखाली आहेत. तर एक प्रकल्प अद्यापही कोरडाठाक आहे

ठळक मुद्देपाणीप्रश्न मार्गी । ६४ पैकी ४० प्रकल्पांत उपयुक्त साठा

जालना : परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ४७.९२ टक्के उपयुक्त पाणीसाठा वाढला आहे. जिल्ह्यातील एकूण ६४ पैकी ४० प्रकल्पांमध्ये हा उपयुक्त पाणीसाठा असून, इतर २३ प्रकल्प जोत्याखाली आहेत. तर एक प्रकल्प अद्यापही कोरडाठाक आहे. प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने शहरी, ग्रामीण भागाचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे.यंदा आॅक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत वार्षिक सरासरीच्या जवळपास ७५ टक्क्यांपर्यंत पाऊस झाला होता. त्यानंतर मात्र, परतीच्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६८८.२१ मिमी ओलांडत एकूण ८०० मिमीहून अधिक पाऊस जिल्ह्यात झाला. परिणामी जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ होण्यास मोठी मदत झाली आहे. जालना जिल्ह्यात एकूण ६४ मध्यम व लघू प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत ४७.९२ टक्के उपयुुक्त पाणीसाठा झाला आहे. यात १० प्रकल्पांमध्ये ७६ ते १०० टक्क्यांच्या मध्ये उपयुक्त पाणीसाठा आहे. ७ प्रकल्पात ५१ ते ७५ टक्क्यांच्या मध्ये, ५ प्रकल्पात २६ ते ५० टक्क्यांच्या मध्ये तर १८ प्रकल्पात २५ टक्क्यांपर्यंत उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. २३ प्रकल्प अद्यापही जोत्याखाली असून, केवळ एक प्रकल्प कोरडाठाक आहे. प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने बहुतांश भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांपैकी केवळ जालना तालुक्यातील कल्याण गिरीजा प्रकल्प जोत्याच्या पातळीखाली आहे. तर कल्याण मध्यम प्रकल्पात ३१.१८ टक्के, बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकल्पात १३.८८ टक्के, भोकरदन तालुक्यातील जुई प्रकल्पासह धामणा प्रकल्प १०० टक्के भरला आहे. जाफराबाद तालुक्यातील जीवरेखा प्रकल्पात ४८ टक्के तर अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्पात ६०.२६ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

टॅग्स :JalanaजालनाWaterपाणीRainपाऊस