शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
6
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
7
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
8
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
9
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
10
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
11
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
12
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
13
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
14
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
15
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
16
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
18
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
19
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
20
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
Daily Top 2Weekly Top 5

३८ कोटींचा टंचाई आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 01:07 IST

आज घडीला १६९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आह.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत केवळ ६१ टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे यंदा दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या झळा या आतापासून जाणवत आहेत. आज घडीला १६९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, जवळपास २२१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. यापूर्वी टंचाई निवारण्यासाठी ११ कोटी रूपयांचा टंचाई आराखडा तयार केला होता. आता नवीन आराखडा जानेवारी ते जून असा सहा महिन्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तो जवळपास ३८ कोटी रूपयांचा असल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यात यंदा जानेवारीतच १६९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, ही टँकरची संख्या जून पर्यंत साधारणपणे ५०० पेक्षा अधिक टँकर लागू शकतील असा अंदाज आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने हा आरखडा तयार केला असून, त्यासाठी भूजल सर्वेक्षणाचा अहवाल लक्षात घेऊन तयार केल्याचे सांगण्यात आले. एकूणच जिल्ह्यातील भूजल पाणीपातळीत सरासरी दोन मीटरने खोल गेल्याचा अहवाल आहे. यामुळे आहेत, त्या विहिरींची पाणीपातळी आताच खोल गेली आहे.जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात जास्तीची टंचाई आताच जाणवत आहे.आता अंमलबजावणीवर भरएकीकडे पाणी टंचाईने ग्रामस्थ हैराण असल्याने त्यांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून प्रशासनाने आवश्यक ते उपाय केले आहेत. पाणी टंचाईत निधी कमी पडू नये म्हणून सर्वेक्षण करून आराखडा तयार केला आहे. पाणी टंचाई दूर करण्यासाठी निधी कमी पडू नये म्हणून आम्ही योजना तयार केली आहे. आता तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांसह गाव पातळीवरील कर्मचाºयांनी अंमलबजावणी करून ग्रामस्थांना टंचाई जाणवू नये यासाठी तत्पर राहण्याची गरज आहे.नवीन आराखड्यात जवळपास एक हजार ५८३ योजना प्रस्तावित करण्यात आल्या असून, एक हजार ४१२ गावे आणि वाड्यांमध्ये टंचाई जाणवू शकते असे म्हटले आहे. तालुका निहाय जालना ५४०, बदनापूर तीन कोटी ९३ लाख, अंबड चार कोटी १२ लाख, घनसावंगी ४ कोटी ९६ लाख, परतूर दोन कोटी ६० लाख रूपये, मंठा दोन कोटी ८७ लाख, भोकरदन ८ कोटी ७ लाख रूपये, जाफराबाद पाच कोटी ३६ लाख असे एकूण ३७ कोटी ३८ लाख रूपयांचा टंचाई आरखडा तयार केला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईfundsनिधी