शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
2
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
3
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
4
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
5
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
6
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
7
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
8
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
9
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
10
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
11
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
12
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
13
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
14
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
15
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
17
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
18
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
19
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
20
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...

३८ कोटींचा टंचाई आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 01:07 IST

आज घडीला १६९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आह.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत केवळ ६१ टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे यंदा दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या झळा या आतापासून जाणवत आहेत. आज घडीला १६९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, जवळपास २२१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. यापूर्वी टंचाई निवारण्यासाठी ११ कोटी रूपयांचा टंचाई आराखडा तयार केला होता. आता नवीन आराखडा जानेवारी ते जून असा सहा महिन्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तो जवळपास ३८ कोटी रूपयांचा असल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यात यंदा जानेवारीतच १६९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, ही टँकरची संख्या जून पर्यंत साधारणपणे ५०० पेक्षा अधिक टँकर लागू शकतील असा अंदाज आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने हा आरखडा तयार केला असून, त्यासाठी भूजल सर्वेक्षणाचा अहवाल लक्षात घेऊन तयार केल्याचे सांगण्यात आले. एकूणच जिल्ह्यातील भूजल पाणीपातळीत सरासरी दोन मीटरने खोल गेल्याचा अहवाल आहे. यामुळे आहेत, त्या विहिरींची पाणीपातळी आताच खोल गेली आहे.जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात जास्तीची टंचाई आताच जाणवत आहे.आता अंमलबजावणीवर भरएकीकडे पाणी टंचाईने ग्रामस्थ हैराण असल्याने त्यांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून प्रशासनाने आवश्यक ते उपाय केले आहेत. पाणी टंचाईत निधी कमी पडू नये म्हणून सर्वेक्षण करून आराखडा तयार केला आहे. पाणी टंचाई दूर करण्यासाठी निधी कमी पडू नये म्हणून आम्ही योजना तयार केली आहे. आता तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांसह गाव पातळीवरील कर्मचाºयांनी अंमलबजावणी करून ग्रामस्थांना टंचाई जाणवू नये यासाठी तत्पर राहण्याची गरज आहे.नवीन आराखड्यात जवळपास एक हजार ५८३ योजना प्रस्तावित करण्यात आल्या असून, एक हजार ४१२ गावे आणि वाड्यांमध्ये टंचाई जाणवू शकते असे म्हटले आहे. तालुका निहाय जालना ५४०, बदनापूर तीन कोटी ९३ लाख, अंबड चार कोटी १२ लाख, घनसावंगी ४ कोटी ९६ लाख, परतूर दोन कोटी ६० लाख रूपये, मंठा दोन कोटी ८७ लाख, भोकरदन ८ कोटी ७ लाख रूपये, जाफराबाद पाच कोटी ३६ लाख असे एकूण ३७ कोटी ३८ लाख रूपयांचा टंचाई आरखडा तयार केला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईfundsनिधी