शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

३८ कोटींचा टंचाई आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 01:07 IST

आज घडीला १६९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आह.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत केवळ ६१ टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे यंदा दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या झळा या आतापासून जाणवत आहेत. आज घडीला १६९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, जवळपास २२१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. यापूर्वी टंचाई निवारण्यासाठी ११ कोटी रूपयांचा टंचाई आराखडा तयार केला होता. आता नवीन आराखडा जानेवारी ते जून असा सहा महिन्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तो जवळपास ३८ कोटी रूपयांचा असल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यात यंदा जानेवारीतच १६९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, ही टँकरची संख्या जून पर्यंत साधारणपणे ५०० पेक्षा अधिक टँकर लागू शकतील असा अंदाज आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने हा आरखडा तयार केला असून, त्यासाठी भूजल सर्वेक्षणाचा अहवाल लक्षात घेऊन तयार केल्याचे सांगण्यात आले. एकूणच जिल्ह्यातील भूजल पाणीपातळीत सरासरी दोन मीटरने खोल गेल्याचा अहवाल आहे. यामुळे आहेत, त्या विहिरींची पाणीपातळी आताच खोल गेली आहे.जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात जास्तीची टंचाई आताच जाणवत आहे.आता अंमलबजावणीवर भरएकीकडे पाणी टंचाईने ग्रामस्थ हैराण असल्याने त्यांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून प्रशासनाने आवश्यक ते उपाय केले आहेत. पाणी टंचाईत निधी कमी पडू नये म्हणून सर्वेक्षण करून आराखडा तयार केला आहे. पाणी टंचाई दूर करण्यासाठी निधी कमी पडू नये म्हणून आम्ही योजना तयार केली आहे. आता तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांसह गाव पातळीवरील कर्मचाºयांनी अंमलबजावणी करून ग्रामस्थांना टंचाई जाणवू नये यासाठी तत्पर राहण्याची गरज आहे.नवीन आराखड्यात जवळपास एक हजार ५८३ योजना प्रस्तावित करण्यात आल्या असून, एक हजार ४१२ गावे आणि वाड्यांमध्ये टंचाई जाणवू शकते असे म्हटले आहे. तालुका निहाय जालना ५४०, बदनापूर तीन कोटी ९३ लाख, अंबड चार कोटी १२ लाख, घनसावंगी ४ कोटी ९६ लाख, परतूर दोन कोटी ६० लाख रूपये, मंठा दोन कोटी ८७ लाख, भोकरदन ८ कोटी ७ लाख रूपये, जाफराबाद पाच कोटी ३६ लाख असे एकूण ३७ कोटी ३८ लाख रूपयांचा टंचाई आरखडा तयार केला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईfundsनिधी