शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

३६५ गावांची टँकरवर मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 00:33 IST

वाढत्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील ३६५ गावे आणि ७३ वाड्यांसाठी तब्बल ४२२ टँकरला मंजुरी दिली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेबरोबरच पाण्याची टंचाईही वाढू लागली आहे़ वाढत्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील ३६५ गावे आणि ७३ वाड्यांसाठी तब्बल ४२२ टँकरला मंजुरी दिली आहे़ तर ५८० विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे़पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असून, शहरी भागातील नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे़ टंचाई निवारणार्थ ग्रामपंचायत स्तरावरून येणाऱ्या प्रस्तावांना प्रशासनाकडून मंजुरी देण्यात येत आहे़सध्या जिल्ह्यातील ३६५ गावे आणि ७३ वाड्यांसाठी ४२२ टँकरना मंजुरी देण्यात आली आहे़ यात जालना तालुक्यातील २७ गावांसाठी ५० टँकर, बदनापूर तालुक्यातील ५२ गावांसाठी ६१ टँकर, भोकरदन तालुक्यातील ८१ गावांसाठी ९२ टँकर, जाफराबाद तालुक्यातील ५३ गावांसाठी ५७ टँकर, परतूर तालुक्यातील १८ गावांसाठी १८ टँकर, मंठा तालुक्यातील ३१ गावांसाठी ३२ टँकर, घनसावंगी तालुक्यातील ४४ गावांसाठी ४४ टँकर तर अंबड तालुक्यातील ५९ गावांसाठी ६६ टँकर सुरू करण्यात आले आहेत़. टँकरची संख्या भविष्यात सातशेपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.भोकरदन तालुक्यात सर्वाधिक टँकरभोकरदन तालुक्यात सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. भोकरदन तालुक्यात ९२, जालना ५०, बदनापूर ६१, जाफराबाद ५७, परतूर १८, मंठा ३१, अंबड ६६, घनसावंगी तालुक्यात ४४ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.नियोजन सुरू- गोरंट्यालघाणेवाडी तलाव आटल्याने पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिकांनी कुठल्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये. जायकवाडी धरणातून जास्तीचे पाणी पुरविण्याचे नियोजन सुरू असल्याचे नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी सांगितले.

टॅग्स :water transportजलवाहतूकwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ