शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

३४५०० दुधाळ जनावरांना ‘आधार कार्ड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:41 IST

पशुसंवर्धन विभागातर्फे दुधाळ जनावरांच्या कानावर बारा अंकी क्रमांकाचा बिल्ला (आधार कार्ड ) लावल्या जात आहे.

विकास व्होरकटे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील दुधाळ जनावरांची अचून नोंद व्हावी, यासाठी मागील वर्षापासून पशुसंवर्धन विभागातर्फे दुधाळ जनावरांच्या कानावर बारा अंकी क्रमांकाचा बिल्ला (आधार कार्ड ) लावल्या जात आहे. सध्या स्थितीत जालना जिल्ह्यातील ३४ हजार ५०० दुधाळ जनावरांच्या कानावर हा बिल्ला (आधार कार्ड) बसविण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व दुधाळ जनावरांना हा बारा अंकी क्रमांक दिल्यानंतर सर्व माहिती इनाफ संगणक प्रणालीमध्ये भरण्यात येणार आहे.माणसांप्रमाणे दुभत्या जनावरांची ओळख तयार व्हावी, यासाठी शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे ही मोहीम मागील वर्षापासून हाती घेण्यात आली आहे. यात दुधाळ जनावरांचे कान टोचून बारा अंकी क्रमांकाचा बिल्ला जनावराच्या कानावर लावल्या जातो. दरम्यान बिल्ला लावलेल्या जनावराची मुलभूत माहिती घेतली जाते. यात जनावर दूध किती देते, मालकाचे नाव काय आहे. आदी माहिती गोळा करून ती संगणक प्रणालीवर नोंदविण्यात येत आहे. यामुळे भविष्यात पशुसंवर्धन विभागाच्या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी हा विशिष्ट क्रमांकाचा बिल्ला असणे अनिवार्य राहणार आहे. ही बारा अंकी युनिक ओळख क्रमांक असलेले आधार कार्ड फायबरचे आहे. म्हणजेच न तुटणारे. कान कापला किंवा जनावर दगावल्यावर हा टॅग निघेल.ंसाडेचौतीस हजार जनावरांना बिल्लेसन २०१२ च्या जणगणनेनुसार जिल्ह्यात ९२ हजार ९२७ दुधाळ जनावरे असून आधार कार्डच्या धर्तीवर ही मोहीम राबविली जात आहे. पहिल्या व दुसऱ्या अशा दोन टप्यात ६४ हजार ५०० बिल्ले पशु संवर्धन विभागाकडे प्राप्त झाले आहेत. यातील ३४ हजार ५०० जनावरांचे कान टोचून हे बिल्ले लावण्यात आले आहेत.तसेच सध्या स्थितीत पशु संवर्धन विभागाच्या जिल्ह्यातील १०४ संस्थांमार्फत हे बिल्ले लावण्याचे काम केल्या जात आहे. येणाºया चार महिन्यात हे कामकाज पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.छावणीत कान टोचणीची विशेष मोहीमजिल्ह्यात २४ चारा छावण्यांपेक्षा अधिक चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. यातील जनावरांची योग्य नोंद व्हावी, यासाठी यातील दुधाळ व इतर जनावरांनाही बिल्ला मारण्याचे काम सुरू आहे. यातील दुधाळ जनावरांना १२ अंकी बिल्ला पशु विभागातर्फे दिला जात आहे. तर इतर जनावरांसाठी १० अंकी नंबरचा बिल्ला चारा छावणी मालक उपलब्ध करून देत आहे. यानंतर पशु संवर्धन विभागातर्फे हा बिल्ला जनावरांच्या कानावर लावला जात आहे.

टॅग्स :cowगायFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र