शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

७ हजार ८०० हेक्टर उसाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 00:18 IST

परतूर तालुक्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्याला पाणीपुरवठा करणारे निम्म दुधना धरण मृत साठ्यातून बाहेर आले आहे

शेषराव वायाळ ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : परतूर तालुक्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्याला पाणीपुरवठा करणारे निम्म दुधना धरण मृत साठ्यातून बाहेर आले आहे. यामुळे परतूर तालुक्यातील ७ हजार ८०० हेक्टरवरील उसाला जीवदान मिळाले असून, यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आनंदी आहेत.धरणातील पाणी व बॅक वॉटरवर अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून उसाची लागवड केली. यामुळे हळूहळू तालुक्यात उसाचे प्रमाण वाढत गेले. बागेश्वरी कारखाना सुरळीत सुरू झाल्याने शेतकरी उसाकडे वळू लागले.परंतु, तालुक्यात उसाचे पीक वाढत असतानाच मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाला. विहिरी, बोअरची पाणीपातळी घटण्याबरोबरच निम्न दुधना प्रकल्पातील पाणी परभणीकडे सोडावे लागले. यामुळे दुधना नदीच्या पात्रातील बॅक वॉटरमध्येही घट झाली. धरण कोरडे झाल्याने उसाचे क्षेत्रही अडचणीत आले.दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी उसाचे क्षेत्र कमी करून इतर पिकांकडे वळू लागले.मात्र, मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने दुधना नदीसह इतर नद्या व नाल्यांना पूर आला. यामुळे विहिरी व बोअरची पाणीपातळी वाढली आहे.निम्न दुधनात ५० टक्के जलसाठानिम्न दुधना प्रकल्पातही पाण्याची आवक सुरू असल्याने मृत साठ्यातून धरण बाहेर आले आहे. तसेच श्रीष्टी जवळील कसूरा धरणात ही ५० टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे घटत जाणाºया उसाच्या पिकाला जीवदान मिळाले असून, शेतकरी आनंदी दिसत आहे.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी