शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

७ हजार ८०० हेक्टर उसाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 00:18 IST

परतूर तालुक्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्याला पाणीपुरवठा करणारे निम्म दुधना धरण मृत साठ्यातून बाहेर आले आहे

शेषराव वायाळ ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : परतूर तालुक्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्याला पाणीपुरवठा करणारे निम्म दुधना धरण मृत साठ्यातून बाहेर आले आहे. यामुळे परतूर तालुक्यातील ७ हजार ८०० हेक्टरवरील उसाला जीवदान मिळाले असून, यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आनंदी आहेत.धरणातील पाणी व बॅक वॉटरवर अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून उसाची लागवड केली. यामुळे हळूहळू तालुक्यात उसाचे प्रमाण वाढत गेले. बागेश्वरी कारखाना सुरळीत सुरू झाल्याने शेतकरी उसाकडे वळू लागले.परंतु, तालुक्यात उसाचे पीक वाढत असतानाच मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाला. विहिरी, बोअरची पाणीपातळी घटण्याबरोबरच निम्न दुधना प्रकल्पातील पाणी परभणीकडे सोडावे लागले. यामुळे दुधना नदीच्या पात्रातील बॅक वॉटरमध्येही घट झाली. धरण कोरडे झाल्याने उसाचे क्षेत्रही अडचणीत आले.दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी उसाचे क्षेत्र कमी करून इतर पिकांकडे वळू लागले.मात्र, मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने दुधना नदीसह इतर नद्या व नाल्यांना पूर आला. यामुळे विहिरी व बोअरची पाणीपातळी वाढली आहे.निम्न दुधनात ५० टक्के जलसाठानिम्न दुधना प्रकल्पातही पाण्याची आवक सुरू असल्याने मृत साठ्यातून धरण बाहेर आले आहे. तसेच श्रीष्टी जवळील कसूरा धरणात ही ५० टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे घटत जाणाºया उसाच्या पिकाला जीवदान मिळाले असून, शेतकरी आनंदी दिसत आहे.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी