शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

भर पावसाळ्यातही १०१ टँकर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 01:00 IST

भर पावसाळ्यात आॅगस्ट महिन्याच्या अखेरच्या टप्प्यातही तब्बल १०१ टँकरद्वारे ८९ गावे १८ वाड्यांना पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दमदार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. परिणामी भर पावसाळ्यात आॅगस्ट महिन्याच्या अखेरच्या टप्प्यातही तब्बल १०१ टँकरद्वारे ८९ गावे १८ वाड्यांना पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पावसाळ्याचा तिसरा महिना संपत आला असून, अद्यापही मोठा पाऊस न झाल्याने सर्वसामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे.सततच्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. सर्वसामान्यांनाही पाण्याच्या प्रश्नाने ग्रासले आहे. यंदा मोठा पाऊस पडण्याची अपेक्षा जिल्हावासियांना होती. मराठवाडा वगळता राज्यात इतरत्र दमदार पाऊस झाला असून, पूर परिस्थितीमुळे सांगली, सातारा, कोल्हापूर भागात अतोनात नुकसान झाले आहे. या उलट जालना जिल्ह्यातील गावा-गावातील पाणीटंचाईचा प्रश्न आजही कायम आहे.मध्यंतरी भोकरदन तालुक्याच्या अर्ध्या भागात दमदार पाऊस झाला. मात्र, अर्ध्याहून अधिक तालुक्यात आजही पाणीटंचाईचा प्रश्न कायम आहे. इतर तालुक्यांमधील पाण्याची परिस्थिती वेगळी नाही.मे महिन्यात जिल्ह्यात ६०० वर टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात होता. मध्यंतरी झालेल्या पावसानंतर प्रशासनाकडून जवळपास ५०० टँकर बंद करण्यात आले आहेत. असे असले तरी बदनापूर, परतूर, अंबड व घनसावंगी तालुक्यातील ८९ गावे आणि १८ वाड्यांना टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यात बदनापूर तालुक्यातील १० गावांना ११ टँकरद्वारे, परतूर तालुक्यातील ११ गावांना ११ टँकरद्वारे अंबड तालुक्यातील ४६ गावे, ११ वाड्यांना ५४ टँकरद्वारे तर घनसावंगी तालुक्यातील २२ गावे आणि ७ वाड्यांना २५ टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. दरम्यान, पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. आगामी एक महिन्यात दमदार पाऊस न झाल्यास पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.३३ गावांना अधिग्रहणाचा आधारजिल्ह्यातील ३३ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी विहिरी, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर टँकर भरण्यासाठी ४२ अधिग्रहणे करण्यात आली आहेत. टँकर व गावांसाठी एकूण ७५ अधिग्रहणे जिल्ह्यात करण्यात आली आहेत. तर काही टँकर ज्या जलशुध्दकरण केंद्रात पाणी उपलब्ध आहे, तेथे भरण्यात येत आहेत.एक लाख ९१ हजार नागरिकांना आधारजालना जिल्ह्यातील ८९ गावे, १८ वाड्यांना १०१ टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या ठिकाणच्या तब्बल १ लाख ९१ हजार ४४३ नागरिकांना टँकरच्या पाण्याचा आधार मिळाला आहे.९७ खासगी टँकरप्रशासनाकडून जिल्ह्यात १०१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यातील ९७ टँकर खासगी असून, केवळ ४ टँकर शासकीय आहेत. या टँकरच्या २२५ खेपा मंजूर असून, प्रत्यक्षात १८९ फेºया झाल्या आहेत.

टॅग्स :droughtदुष्काळwater shortageपाणीकपातwater transportजलवाहतूक