शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

भर पावसाळ्यातही १०१ टँकर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 01:00 IST

भर पावसाळ्यात आॅगस्ट महिन्याच्या अखेरच्या टप्प्यातही तब्बल १०१ टँकरद्वारे ८९ गावे १८ वाड्यांना पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दमदार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. परिणामी भर पावसाळ्यात आॅगस्ट महिन्याच्या अखेरच्या टप्प्यातही तब्बल १०१ टँकरद्वारे ८९ गावे १८ वाड्यांना पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पावसाळ्याचा तिसरा महिना संपत आला असून, अद्यापही मोठा पाऊस न झाल्याने सर्वसामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे.सततच्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. सर्वसामान्यांनाही पाण्याच्या प्रश्नाने ग्रासले आहे. यंदा मोठा पाऊस पडण्याची अपेक्षा जिल्हावासियांना होती. मराठवाडा वगळता राज्यात इतरत्र दमदार पाऊस झाला असून, पूर परिस्थितीमुळे सांगली, सातारा, कोल्हापूर भागात अतोनात नुकसान झाले आहे. या उलट जालना जिल्ह्यातील गावा-गावातील पाणीटंचाईचा प्रश्न आजही कायम आहे.मध्यंतरी भोकरदन तालुक्याच्या अर्ध्या भागात दमदार पाऊस झाला. मात्र, अर्ध्याहून अधिक तालुक्यात आजही पाणीटंचाईचा प्रश्न कायम आहे. इतर तालुक्यांमधील पाण्याची परिस्थिती वेगळी नाही.मे महिन्यात जिल्ह्यात ६०० वर टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात होता. मध्यंतरी झालेल्या पावसानंतर प्रशासनाकडून जवळपास ५०० टँकर बंद करण्यात आले आहेत. असे असले तरी बदनापूर, परतूर, अंबड व घनसावंगी तालुक्यातील ८९ गावे आणि १८ वाड्यांना टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यात बदनापूर तालुक्यातील १० गावांना ११ टँकरद्वारे, परतूर तालुक्यातील ११ गावांना ११ टँकरद्वारे अंबड तालुक्यातील ४६ गावे, ११ वाड्यांना ५४ टँकरद्वारे तर घनसावंगी तालुक्यातील २२ गावे आणि ७ वाड्यांना २५ टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. दरम्यान, पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. आगामी एक महिन्यात दमदार पाऊस न झाल्यास पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.३३ गावांना अधिग्रहणाचा आधारजिल्ह्यातील ३३ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी विहिरी, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर टँकर भरण्यासाठी ४२ अधिग्रहणे करण्यात आली आहेत. टँकर व गावांसाठी एकूण ७५ अधिग्रहणे जिल्ह्यात करण्यात आली आहेत. तर काही टँकर ज्या जलशुध्दकरण केंद्रात पाणी उपलब्ध आहे, तेथे भरण्यात येत आहेत.एक लाख ९१ हजार नागरिकांना आधारजालना जिल्ह्यातील ८९ गावे, १८ वाड्यांना १०१ टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या ठिकाणच्या तब्बल १ लाख ९१ हजार ४४३ नागरिकांना टँकरच्या पाण्याचा आधार मिळाला आहे.९७ खासगी टँकरप्रशासनाकडून जिल्ह्यात १०१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यातील ९७ टँकर खासगी असून, केवळ ४ टँकर शासकीय आहेत. या टँकरच्या २२५ खेपा मंजूर असून, प्रत्यक्षात १८९ फेºया झाल्या आहेत.

टॅग्स :droughtदुष्काळwater shortageपाणीकपातwater transportजलवाहतूक