शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसाळ्यातही १०१ टँकर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 01:00 IST

भर पावसाळ्यात आॅगस्ट महिन्याच्या अखेरच्या टप्प्यातही तब्बल १०१ टँकरद्वारे ८९ गावे १८ वाड्यांना पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दमदार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. परिणामी भर पावसाळ्यात आॅगस्ट महिन्याच्या अखेरच्या टप्प्यातही तब्बल १०१ टँकरद्वारे ८९ गावे १८ वाड्यांना पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पावसाळ्याचा तिसरा महिना संपत आला असून, अद्यापही मोठा पाऊस न झाल्याने सर्वसामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे.सततच्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. सर्वसामान्यांनाही पाण्याच्या प्रश्नाने ग्रासले आहे. यंदा मोठा पाऊस पडण्याची अपेक्षा जिल्हावासियांना होती. मराठवाडा वगळता राज्यात इतरत्र दमदार पाऊस झाला असून, पूर परिस्थितीमुळे सांगली, सातारा, कोल्हापूर भागात अतोनात नुकसान झाले आहे. या उलट जालना जिल्ह्यातील गावा-गावातील पाणीटंचाईचा प्रश्न आजही कायम आहे.मध्यंतरी भोकरदन तालुक्याच्या अर्ध्या भागात दमदार पाऊस झाला. मात्र, अर्ध्याहून अधिक तालुक्यात आजही पाणीटंचाईचा प्रश्न कायम आहे. इतर तालुक्यांमधील पाण्याची परिस्थिती वेगळी नाही.मे महिन्यात जिल्ह्यात ६०० वर टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात होता. मध्यंतरी झालेल्या पावसानंतर प्रशासनाकडून जवळपास ५०० टँकर बंद करण्यात आले आहेत. असे असले तरी बदनापूर, परतूर, अंबड व घनसावंगी तालुक्यातील ८९ गावे आणि १८ वाड्यांना टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यात बदनापूर तालुक्यातील १० गावांना ११ टँकरद्वारे, परतूर तालुक्यातील ११ गावांना ११ टँकरद्वारे अंबड तालुक्यातील ४६ गावे, ११ वाड्यांना ५४ टँकरद्वारे तर घनसावंगी तालुक्यातील २२ गावे आणि ७ वाड्यांना २५ टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. दरम्यान, पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. आगामी एक महिन्यात दमदार पाऊस न झाल्यास पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.३३ गावांना अधिग्रहणाचा आधारजिल्ह्यातील ३३ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी विहिरी, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर टँकर भरण्यासाठी ४२ अधिग्रहणे करण्यात आली आहेत. टँकर व गावांसाठी एकूण ७५ अधिग्रहणे जिल्ह्यात करण्यात आली आहेत. तर काही टँकर ज्या जलशुध्दकरण केंद्रात पाणी उपलब्ध आहे, तेथे भरण्यात येत आहेत.एक लाख ९१ हजार नागरिकांना आधारजालना जिल्ह्यातील ८९ गावे, १८ वाड्यांना १०१ टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या ठिकाणच्या तब्बल १ लाख ९१ हजार ४४३ नागरिकांना टँकरच्या पाण्याचा आधार मिळाला आहे.९७ खासगी टँकरप्रशासनाकडून जिल्ह्यात १०१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यातील ९७ टँकर खासगी असून, केवळ ४ टँकर शासकीय आहेत. या टँकरच्या २२५ खेपा मंजूर असून, प्रत्यक्षात १८९ फेºया झाल्या आहेत.

टॅग्स :droughtदुष्काळwater shortageपाणीकपातwater transportजलवाहतूक