शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
3
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
4
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
5
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
6
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
7
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
8
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
9
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
10
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
11
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
12
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
13
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
14
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
15
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
16
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
17
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
18
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
20
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?

२८६ कोटींचा आराखडा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:19 IST

जालना जिल्ह्यासाठी विशेष बाब म्हणून फेब्रवारीत झालेल्या वित्त मंत्र्यांच्या बैठकीत या आराखड्यात ३६ कोटी १० लाख रूपयांची वाढ करून घेतल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

ठळक मुद्देजालना जिल्हा नियोजन समिती बैठक : पालकमंत्री लोणीकर यांची माहिती, दुष्काळ, विम्याचा मुद्दा गाजला

जालना : जालना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आगामी वर्षासाठीच्या जवळपास २८६ कोटी रूपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली. जालना जिल्ह्यासाठी विशेष बाब म्हणून फेब्रवारीत झालेल्या वित्त मंत्र्यांच्या बैठकीत या आराखड्यात ३६ कोटी १० लाख रूपयांची वाढ करून घेतल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत जालना जिल्ह्यातील दुष्काळाचा मुद्दाही चांगलाच गाजला. उपस्थित सदस्यांनी दुष्काळाबाबत प्रशासन हलत नसल्याच्या तक्रारी केल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आली. पाणीटंचाई वीजेचा प्रश्न, पीकविमा आणि अन्य विकास कामांच्या मुद्यावरून उपस्थित सदस्यांनी आपले मुद्दे समिती समोर मांडले. याला संबंधित अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली, मात्र, त्या उत्तरांवर पदाधिकाऱ्यांचे समाधान झाले नसल्याचे दिसून आले.एकूणच प्रशासनाने कारभार सुधारावा अशा स्पष्ट सूचना केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्या.यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी देखील जिल्ह्यातील दुष्काळावर आक्रमक भूमिका मांडली. आ. राजेश टोपे यांनी वीजेचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगून वादळी वाºयांमुळे जे विद्युत खांब कोसळे आहेत, ते पुन्हा उभे करताना आठ-आठ दिवस लागत असल्याने अनेक गावे अंधारात असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. पिकविम्याचा मुद्दाही त्यांनी प्रभावीपणे मांडला.जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश टोपे यांनी जिल्हा परिषदेसाठी जो निधी दिला जातो, तो देतांना तांत्रिक अडचणी सांगून तो इतरत्र कसा वळवला असा सवाल करून प्रशासनाला धारेवर धरले. एकूणच विविध विकास कामांच्या मुद्यावरून ही बैठक वादळी ठरली.बैठकीस नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, सुनीता दौंड, दमयंती सावंत, उषा तोडावत, प्रतिभा बंड, कुशीवर्ता जाधव, सुरेखा लहाने, वैजयंती प्रधान, मनिषा जंजाळ, प्रतिभा घनवट, अनिता राठोड, लिलाबाई लोखंडे, अंशीराम कंटुळे, कैलास चव्हाण, चंद्रकांत साबळे, सोपान पाडमुख, यादवराव राऊत, गणेश पवार, गणेश फुके, संतोष अन्नदाते, आमेरखान एकबालखान आदींची उपस्थिती होती. यावेळी सदस्यांनीही त्यांच्या भागातील प्रश्न बैठकीत मांडले.

टॅग्स :JalanaजालनाBabanrao Looneykarबबनराव लोणीकरdroughtदुष्काळ