शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
5
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
6
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
7
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
8
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
9
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
11
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
12
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
13
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
14
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
15
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
16
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
17
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
18
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
19
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
20
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...

२८६ कोटींचा आराखडा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:19 IST

जालना जिल्ह्यासाठी विशेष बाब म्हणून फेब्रवारीत झालेल्या वित्त मंत्र्यांच्या बैठकीत या आराखड्यात ३६ कोटी १० लाख रूपयांची वाढ करून घेतल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

ठळक मुद्देजालना जिल्हा नियोजन समिती बैठक : पालकमंत्री लोणीकर यांची माहिती, दुष्काळ, विम्याचा मुद्दा गाजला

जालना : जालना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आगामी वर्षासाठीच्या जवळपास २८६ कोटी रूपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली. जालना जिल्ह्यासाठी विशेष बाब म्हणून फेब्रवारीत झालेल्या वित्त मंत्र्यांच्या बैठकीत या आराखड्यात ३६ कोटी १० लाख रूपयांची वाढ करून घेतल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत जालना जिल्ह्यातील दुष्काळाचा मुद्दाही चांगलाच गाजला. उपस्थित सदस्यांनी दुष्काळाबाबत प्रशासन हलत नसल्याच्या तक्रारी केल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आली. पाणीटंचाई वीजेचा प्रश्न, पीकविमा आणि अन्य विकास कामांच्या मुद्यावरून उपस्थित सदस्यांनी आपले मुद्दे समिती समोर मांडले. याला संबंधित अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली, मात्र, त्या उत्तरांवर पदाधिकाऱ्यांचे समाधान झाले नसल्याचे दिसून आले.एकूणच प्रशासनाने कारभार सुधारावा अशा स्पष्ट सूचना केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्या.यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी देखील जिल्ह्यातील दुष्काळावर आक्रमक भूमिका मांडली. आ. राजेश टोपे यांनी वीजेचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगून वादळी वाºयांमुळे जे विद्युत खांब कोसळे आहेत, ते पुन्हा उभे करताना आठ-आठ दिवस लागत असल्याने अनेक गावे अंधारात असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. पिकविम्याचा मुद्दाही त्यांनी प्रभावीपणे मांडला.जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश टोपे यांनी जिल्हा परिषदेसाठी जो निधी दिला जातो, तो देतांना तांत्रिक अडचणी सांगून तो इतरत्र कसा वळवला असा सवाल करून प्रशासनाला धारेवर धरले. एकूणच विविध विकास कामांच्या मुद्यावरून ही बैठक वादळी ठरली.बैठकीस नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, सुनीता दौंड, दमयंती सावंत, उषा तोडावत, प्रतिभा बंड, कुशीवर्ता जाधव, सुरेखा लहाने, वैजयंती प्रधान, मनिषा जंजाळ, प्रतिभा घनवट, अनिता राठोड, लिलाबाई लोखंडे, अंशीराम कंटुळे, कैलास चव्हाण, चंद्रकांत साबळे, सोपान पाडमुख, यादवराव राऊत, गणेश पवार, गणेश फुके, संतोष अन्नदाते, आमेरखान एकबालखान आदींची उपस्थिती होती. यावेळी सदस्यांनीही त्यांच्या भागातील प्रश्न बैठकीत मांडले.

टॅग्स :JalanaजालनाBabanrao Looneykarबबनराव लोणीकरdroughtदुष्काळ