शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोच्या कामावर २७ हजार मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 01:04 IST

रोजगार हमी योजनेच्या कामांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, मागेल त्याला काम देण्यासाठी रोजगार हमी विभागाने प्रत्येक गावाचे नियोजन केले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी दिली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुष्काळाने हैराण असलेल्या ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेच्या कामांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, मागेल त्याला काम देण्यासाठी रोजगार हमी विभागाने प्रत्येक गावाचे नियोजन केले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी दिली. त्यांच्या विशेष प्रयत्नामुळे जालना जिल्ह्यात आठ हजार मजूरांची उपस्थिती आता थेट २७ हजारावर पोहचली आहे.रोजगार हमी योजनेच्या कामावर आता २०० रूपये रोज मिळतो. जेवढे जास्त ब्रास काम होईल तेवढी मजूरी दिली जात आहे. त्यातच ही मजूरी त्यांना दर आठवड्याला त्यांच्या खात्यात रोखीने जमा केली जात आहे. जिल्ह्यातील बहुतांश मजुरांचे जॉबकार्ड काढले आहेत. त्यामुळे मस्टरवर कामांची तसेच मजूर उपस्थितीची नीट नोंद असल्यास मजुरीसाठी कुठलीच अडचण येत नाही. जालना जिल्ह्यातील वन, कृषी तसेच सामाजिक वनिकरणसह अन्य विभागांमध्ये ही रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत.अनेक गावांमध्ये पाझर तलाव, फळबागेची लागवड, रोपवाटीका तयार करणे, तसेच आहेत त्या रोपवाटीकेतील झाडांची काळजी घेणे आदी कामे केली जात आहेत. या कामांसाठी मजुरांकडून मागणी होती, ती कामे त्यांना दिली असल्याचे सांगण्यात आले. काम नाही, म्हणून कोणाला स्थलांतर करण्याची वेळ यामुळे येणार नसल्याची काळजी घेतली असल्याचे वायाळ म्हणाले.अचानक भेटी देऊन पाहणीजिल्ह्यात सुरू असलेल्या जवळपास साडेतीनशे कामांवर मजुरांची काळजी घेतली जाते की, नाही याची पाहणी अचानक करण्यात येत आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने मजूरांना कामे करण्यासाठी अडचण येत आहे.सकाळीच कामांना प्रारंभ केला जात आहे. अभियंत्याकडून मजुरांनी कोणते काम करावे याचे नियोजन सकाळीच ठरवून दिले जाते. त्यानंतर सायंकाळी चार वाजता ते काम निकषानुसार होते की, हे तपासल्यावर मस्टर भरल्या जाते.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाdroughtदुष्काळ