शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

रोहयोच्या कामावर २७ हजार मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 01:04 IST

रोजगार हमी योजनेच्या कामांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, मागेल त्याला काम देण्यासाठी रोजगार हमी विभागाने प्रत्येक गावाचे नियोजन केले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी दिली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुष्काळाने हैराण असलेल्या ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेच्या कामांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, मागेल त्याला काम देण्यासाठी रोजगार हमी विभागाने प्रत्येक गावाचे नियोजन केले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी दिली. त्यांच्या विशेष प्रयत्नामुळे जालना जिल्ह्यात आठ हजार मजूरांची उपस्थिती आता थेट २७ हजारावर पोहचली आहे.रोजगार हमी योजनेच्या कामावर आता २०० रूपये रोज मिळतो. जेवढे जास्त ब्रास काम होईल तेवढी मजूरी दिली जात आहे. त्यातच ही मजूरी त्यांना दर आठवड्याला त्यांच्या खात्यात रोखीने जमा केली जात आहे. जिल्ह्यातील बहुतांश मजुरांचे जॉबकार्ड काढले आहेत. त्यामुळे मस्टरवर कामांची तसेच मजूर उपस्थितीची नीट नोंद असल्यास मजुरीसाठी कुठलीच अडचण येत नाही. जालना जिल्ह्यातील वन, कृषी तसेच सामाजिक वनिकरणसह अन्य विभागांमध्ये ही रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत.अनेक गावांमध्ये पाझर तलाव, फळबागेची लागवड, रोपवाटीका तयार करणे, तसेच आहेत त्या रोपवाटीकेतील झाडांची काळजी घेणे आदी कामे केली जात आहेत. या कामांसाठी मजुरांकडून मागणी होती, ती कामे त्यांना दिली असल्याचे सांगण्यात आले. काम नाही, म्हणून कोणाला स्थलांतर करण्याची वेळ यामुळे येणार नसल्याची काळजी घेतली असल्याचे वायाळ म्हणाले.अचानक भेटी देऊन पाहणीजिल्ह्यात सुरू असलेल्या जवळपास साडेतीनशे कामांवर मजुरांची काळजी घेतली जाते की, नाही याची पाहणी अचानक करण्यात येत आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने मजूरांना कामे करण्यासाठी अडचण येत आहे.सकाळीच कामांना प्रारंभ केला जात आहे. अभियंत्याकडून मजुरांनी कोणते काम करावे याचे नियोजन सकाळीच ठरवून दिले जाते. त्यानंतर सायंकाळी चार वाजता ते काम निकषानुसार होते की, हे तपासल्यावर मस्टर भरल्या जाते.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाdroughtदुष्काळ