शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

२५० शेततळ्यांच्या टँकरमुक्त नंदापूरात दुष्काळातही फुलवली द्राक्ष, डाळिंबांची बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 16:53 IST

या शिवारात सध्या ६५० एकरवर द्राक्ष, ५० एकरवर सीताफळ, ५० एकरवर डाळिंब बागा फुललेल्या आहेत.

- संजय देशमुख

जालना : जालन्यापासून जवळच असलेल्या नंदापूर येथील ग्रामस्थांनी गेल्या दहा वर्षात जलसंधारणाच्या कामांची कास धरल्याने आज येथील जवळपास २५० पेक्षा अधिक शेततळ्यांमध्ये भरपूर पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे द्राक्ष, डाळिंब तसेच सीताफळांच्या बागा फुललेल्या आहेत, त्यामुळे या गावाने अल्पावधीत स्वत:ची पाणीदार गाव म्हणून ओळख निर्माण केली आहे. 

जालना तसा कायम दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे सिंचनाचा मोठा अनुशेष आजही कायम आहे. लघु आणि मध्यम तसेच शेततळे आणि साठवण तलावांची मोठी निर्मिती झाली. त्यावर कोट्यवधी रूपयांचा खर्च झाला. अनेक कामांमध्ये गैरव्यवहाराची प्रकरणे चर्चेत राहिली. जिल्हा परिषदेतील सिंचन घोटाळा तर संपूर्ण राज्यभर गाजला. जालन्यातील सिंचनावरील खर्चातून कंत्राटदारांची घरे भरली. परंतु शेतजमिनी मात्र ओसाडच राहिल्या.

नंदापूर हे जालना तालुक्यातील डोंगराळ भागातील एक छोटेसे गाव. या गावाची लोकसंख्या १८०० च्या जवळपास आहे. येथील गावकऱ्यांनी एकत्रित येऊन जलसंधारणात सहभाग घेण्याचा निर्णय घेतला. कृषीभूषण विजयअण्णा बोराडे तसेच कृषी विज्ञान केंद्र यांच्या मदतीतून बांध बंदिस्ती, गावातील नदीचे खोलीकरण आणि रूंदीकरण तसेच शेततळ्याच्या योजनेतून शेततळ्यांची उभारणी इ. कामे केल्याने यंदा नंदापूरला टँकरने पाणीपुरवठ्याची अजून तरी गरज भासलेली नाही. दुष्काळ तीव्र असल्याने गावातील विहिरींची पाणीपातळी मात्र खोलवर गेली असून, पुढील महिन्यात गावात टँकरने पाणी देण्याची वेळ येते की काय, इतकी पाणीपातळी घटली आहे. नंदापूर हे गाव उपक्रमशील असल्याने आ. अर्जुन खोतकर यांनी ते दत्तक घेतले आहे. त्यामुळे तेथे जास्तीचा निधी मिळाल्याने देखील हे गाव पाणीदार झाल्याचे सांगण्यात आले. 

जलसंधारणासाठी गावकऱ्यांची एकजुटया शिवारात सध्या ६५० एकरवर द्राक्ष, ५० एकरवर सीताफळ, ५० एकरवर डाळिंब बागा फुललेल्या आहेत. कडवंचीनंतर या गावाने देखील उत्पादनात आघाडी घेऊन एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पूर्वी खडकाळ असलेल्या या माळरानावर या बागा फुलल्या, त्या केवळ शासनाच्या योजनांमुळेच नाही तर गावकऱ्यांनी एकजूट करून जलसंधारणाला जे महत्त्व दिले; त्यामुळेच हे शक्य झाल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्रातील कृषी अभियंता पंडित वासरे यांनी दिली. 

आणखी बरीच कामे करणारजलसंधारणाची आणखी कामे करावयाची आहेत. कडवंची पॅटर्न येथे आणावयाचा आहे. कडवंची येथे कल्याणी नदी आहे. त्याचीच उपनदी नंदापूर येथून वाहते. ती नदी आणखी खोल करून त्यातील गाळ काढण्याचे कामही हाती घेण्यात येणार आहे. एकूणच बहुतांश गावांमध्ये टँकर सुरू आहेत. मात्र केवळ कडवंची, नंदापूर तसेच अन्य ज्या गावांनी जलसंधारण तसेच शेततळी बांधली आहेत, ती मात्र याला अपवाद आहेत. -दत्तात्रय चव्हाण, सरपंच, नंदापूर 

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीJalanaजालना