शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

गरिमाच्या संचालकांनी गरिबांच्या पैशातून घेतली २०० एकर जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 00:36 IST

गुंतवणूकदारांच्या रकमेतून गरिमा रिअल इस्टेट कंपनीच्या संचालकांनी रत्नागिरी जिल्ह्यात चक्क २०० एकर शेतजमीन खरेदी केल्याचे तपासात उघड झाले आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मोलमजुरी करून बचत केलेले पैसे तीन वर्षात दुप्पट करून देण्याचे आमिष दाखविल्याने जिल्ह्यातील हजारो कष्टकऱ्यांनी आपल्या घामाचे पैसे गरिमा रिअल इस्टेट कंपनीत गुंतविले होते. दुप्पट पैसे तर सोडाच; परंतु मुद्दलही न मिळाल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले होते. तर दुसरीकडे या गुंतवणूकदारांच्या रकमेतून गरिमा रिअल इस्टेट कंपनीच्या संचालकांनी रत्नागिरी जिल्ह्यात चक्क २०० एकर शेतजमीन खरेदी केल्याचे तपासात उघड झाले आहे.जालना जिल्ह्यात २०१० ते २०१५ या दरम्यान गरिमा रिअल इस्टेट कंपनीने जवळपास अडीच हजार गुंतवणूकदारांकडून प्रथमदर्शनी अंदाजित साडेचार कोटी रूपयांची गुंतवणूक केली होती. त्या पैकी ९०० जणांची साधारपणे दोन कोटी ९ लाख रूपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. या गरिमा कंपनीने जालन्या प्रमाणेच औरंगाबाद जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनही गंडा घातला आहे. या प्रकरणी जालन्यातील आर्थिक गुन्हे शाखेने माजी आ. बनवारीलाल कुशवाह याला ३० आॅगस्टला जालना येथील जिल्हा न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी त्याला पाच सप्टेबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या पाच दिवसांच्या पोलीस कोठडी दरम्यान, कुशवाह यांनी गुंतवणूक दारांच्या पैशातून रत्नागिरी जिल्ह्यातील लांजिया तालुक्यात जवळपास २०० एकर शेतजमीन घेतल्याचे सांगितले. या माहितीवरून पोलिसांनी रत्नागिरी येथे जाऊन १८ रजिस्ट्री आणि सातबारा उताºयांची माहिती आणली आहे. या जमिनीची नेमकी किंमत किती होते, याचा तपशील मिळविण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, बुधवारी बनवारीलाल कुशवाह याच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असून, त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.गेल्याच महिन्यात औरंगाबाद पोलिसांनी गरिमाच्या याच माजी आ. बनवारीलाल कुशचाहला राजस्थानमधील धवलपूर येथून फसणूक प्रकरणात अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्याचवेळी जालना येथील आर्थिक गुन्हे शाखेने पत्र व्यवहार करून हाच संशयित आरोपी आम्हालाही हवा असून, त्याला आमच्याकडे स्वाधीन करावे अशी मागणी केली होती. मात्र ती नाकारण्यात आली. विशेष म्हणजे यामुळे औरंगााद नंतर जालन्याच्या पोलिसांना धवलपूर येथे फेरा मारून कुशवाहला अटक करून जालन्यात आणावे लागले. यामुळे एक प्रकारे शासनाचा प्रवास भत्त्यासह अन्य खर्च वाढला आहे. समन्वयाचा अभाव असल्यानेच हे असे घडल्याचे दिसून आले.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी