शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
2
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
3
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
4
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
5
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
6
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
7
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
8
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
9
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
10
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
11
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
12
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
13
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
14
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
15
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
16
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
17
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
18
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
19
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
20
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
Daily Top 2Weekly Top 5

गरिमाच्या संचालकांनी गरिबांच्या पैशातून घेतली २०० एकर जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 00:36 IST

गुंतवणूकदारांच्या रकमेतून गरिमा रिअल इस्टेट कंपनीच्या संचालकांनी रत्नागिरी जिल्ह्यात चक्क २०० एकर शेतजमीन खरेदी केल्याचे तपासात उघड झाले आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मोलमजुरी करून बचत केलेले पैसे तीन वर्षात दुप्पट करून देण्याचे आमिष दाखविल्याने जिल्ह्यातील हजारो कष्टकऱ्यांनी आपल्या घामाचे पैसे गरिमा रिअल इस्टेट कंपनीत गुंतविले होते. दुप्पट पैसे तर सोडाच; परंतु मुद्दलही न मिळाल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले होते. तर दुसरीकडे या गुंतवणूकदारांच्या रकमेतून गरिमा रिअल इस्टेट कंपनीच्या संचालकांनी रत्नागिरी जिल्ह्यात चक्क २०० एकर शेतजमीन खरेदी केल्याचे तपासात उघड झाले आहे.जालना जिल्ह्यात २०१० ते २०१५ या दरम्यान गरिमा रिअल इस्टेट कंपनीने जवळपास अडीच हजार गुंतवणूकदारांकडून प्रथमदर्शनी अंदाजित साडेचार कोटी रूपयांची गुंतवणूक केली होती. त्या पैकी ९०० जणांची साधारपणे दोन कोटी ९ लाख रूपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. या गरिमा कंपनीने जालन्या प्रमाणेच औरंगाबाद जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनही गंडा घातला आहे. या प्रकरणी जालन्यातील आर्थिक गुन्हे शाखेने माजी आ. बनवारीलाल कुशवाह याला ३० आॅगस्टला जालना येथील जिल्हा न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी त्याला पाच सप्टेबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या पाच दिवसांच्या पोलीस कोठडी दरम्यान, कुशवाह यांनी गुंतवणूक दारांच्या पैशातून रत्नागिरी जिल्ह्यातील लांजिया तालुक्यात जवळपास २०० एकर शेतजमीन घेतल्याचे सांगितले. या माहितीवरून पोलिसांनी रत्नागिरी येथे जाऊन १८ रजिस्ट्री आणि सातबारा उताºयांची माहिती आणली आहे. या जमिनीची नेमकी किंमत किती होते, याचा तपशील मिळविण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, बुधवारी बनवारीलाल कुशवाह याच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असून, त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.गेल्याच महिन्यात औरंगाबाद पोलिसांनी गरिमाच्या याच माजी आ. बनवारीलाल कुशचाहला राजस्थानमधील धवलपूर येथून फसणूक प्रकरणात अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्याचवेळी जालना येथील आर्थिक गुन्हे शाखेने पत्र व्यवहार करून हाच संशयित आरोपी आम्हालाही हवा असून, त्याला आमच्याकडे स्वाधीन करावे अशी मागणी केली होती. मात्र ती नाकारण्यात आली. विशेष म्हणजे यामुळे औरंगााद नंतर जालन्याच्या पोलिसांना धवलपूर येथे फेरा मारून कुशवाहला अटक करून जालन्यात आणावे लागले. यामुळे एक प्रकारे शासनाचा प्रवास भत्त्यासह अन्य खर्च वाढला आहे. समन्वयाचा अभाव असल्यानेच हे असे घडल्याचे दिसून आले.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी