शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

जालना जिल्ह्यातील ३९ प्रकल्प कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांची तहान आजही कायम आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ ८ टक्के ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांची तहान आजही कायम आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ ८ टक्के उपयुक्त पाणी आहे. जिल्ह्यातील ६४ प्रकल्पांपैकी ३९ प्रकल्प कोरडेठाक असून, १७ प्रकल्पांची पाणीपातळी जोत्याखाली आहे.पावसाळा शेवटच्या टप्प्यात असला तरी यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. पावसाअभावी गावा-गावातील पाण्याचा प्रश्न आजही कायम आहे. अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील ६४ पैकी ३९ प्रकल्प कोरडेठाक आहेत. १७ प्रकल्पाची पाणीपातळी जोत्याखाली आहे. तर ३ प्रकल्पात ० ते २५ टक्क्यांच्या मध्ये उपयुक्त पाणी उपलब्ध आहे. एका प्रकल्पात २६ ते ५० टक्के, एका प्रकल्पात ५१ ते ७५ टक्के पाणीसाठा आहे. तर तीन प्रकल्पांमध्ये ७६ ते १०० टक्क्यांच्या मध्ये पाणी आहे. या तीन प्रकल्पांमध्ये साधारणत: ८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. यात भोकरदन तालुक्यातील रेलगाववाडी साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. जाफराबाद तालुक्यातील भारज लघू पाझर तलावात ७५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.जायकवाडी प्रकल्प भरल्यामुळे गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. या नदीपात्रातील बॅरेजमुळे संबंधित गाव, शिवारातील पाणीप्रश्न काही अंशी मार्गी लागला आहे. भोकरदन, जाफराबाद तालुक्यातील काही भागात झालेल्या पावसामुळे प्रकल्पांमध्ये पाणी उपलब्ध झाले आहे. मात्र, इतर शहरी, ग्रामीण भागात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. परिणामी जिल्ह्यातील इतर प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. जिल्ह्यात असलेल्या ७ बंधाऱ्यांपैकी केवळ दोन बंधाºयांमध्ये ७५ टक्क्याहून अधिक पाणीसाठा आहे. तर इतर बंधा-यांमध्येही पाणीसाठा झालेला नाही.दरम्यान, पुढील आठ- दहा दिवसात मोठा पाऊस झाला नाही, तर जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न यंदाही मोठा गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.पावसाअभावी जिल्ह्यातील लघू, मध्यम प्रकल्पांची स्थिती बिकट आहे. भोकरदन तालुक्यातील जुई मध्यम प्रकल्प, धामणा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. तर जालना तालुक्यातील कल्याण गिरजा, कल्याण व जाफराबाद तालुक्यातील जिवरेखा हे प्रकल्प जोत्याखाली आहेत. बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकल्पही जोत्याखाली आहे. तर तालुक्यातील गल्हाटी प्रकल्पही कोरडाठाक आहे.मागील वर्षी याच कालावधीत जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ ८.८३ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा याच कालावधीत मध्यम प्रकल्पांमध्ये २१.२३ टक्के उपयुक्त पाणी आहे. गतवर्षीपेक्षा यंदा मध्यम प्रकल्पांची स्थिती समाधानकारक असली तरी प्रकल्पांची तहान मात्र कायम आहे. त्यामुळे पुढील कालावधीत तरी जिल्ह्यात मोठा पाऊस पडेल, अशी आशा सर्वसामान्यांना लागली आहे.

टॅग्स :droughtदुष्काळDamधरणwater shortageपाणीकपात