शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

जालना जिल्ह्यातील ३९ प्रकल्प कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांची तहान आजही कायम आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ ८ टक्के ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांची तहान आजही कायम आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ ८ टक्के उपयुक्त पाणी आहे. जिल्ह्यातील ६४ प्रकल्पांपैकी ३९ प्रकल्प कोरडेठाक असून, १७ प्रकल्पांची पाणीपातळी जोत्याखाली आहे.पावसाळा शेवटच्या टप्प्यात असला तरी यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. पावसाअभावी गावा-गावातील पाण्याचा प्रश्न आजही कायम आहे. अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील ६४ पैकी ३९ प्रकल्प कोरडेठाक आहेत. १७ प्रकल्पाची पाणीपातळी जोत्याखाली आहे. तर ३ प्रकल्पात ० ते २५ टक्क्यांच्या मध्ये उपयुक्त पाणी उपलब्ध आहे. एका प्रकल्पात २६ ते ५० टक्के, एका प्रकल्पात ५१ ते ७५ टक्के पाणीसाठा आहे. तर तीन प्रकल्पांमध्ये ७६ ते १०० टक्क्यांच्या मध्ये पाणी आहे. या तीन प्रकल्पांमध्ये साधारणत: ८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. यात भोकरदन तालुक्यातील रेलगाववाडी साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. जाफराबाद तालुक्यातील भारज लघू पाझर तलावात ७५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.जायकवाडी प्रकल्प भरल्यामुळे गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. या नदीपात्रातील बॅरेजमुळे संबंधित गाव, शिवारातील पाणीप्रश्न काही अंशी मार्गी लागला आहे. भोकरदन, जाफराबाद तालुक्यातील काही भागात झालेल्या पावसामुळे प्रकल्पांमध्ये पाणी उपलब्ध झाले आहे. मात्र, इतर शहरी, ग्रामीण भागात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. परिणामी जिल्ह्यातील इतर प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. जिल्ह्यात असलेल्या ७ बंधाऱ्यांपैकी केवळ दोन बंधाºयांमध्ये ७५ टक्क्याहून अधिक पाणीसाठा आहे. तर इतर बंधा-यांमध्येही पाणीसाठा झालेला नाही.दरम्यान, पुढील आठ- दहा दिवसात मोठा पाऊस झाला नाही, तर जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न यंदाही मोठा गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.पावसाअभावी जिल्ह्यातील लघू, मध्यम प्रकल्पांची स्थिती बिकट आहे. भोकरदन तालुक्यातील जुई मध्यम प्रकल्प, धामणा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. तर जालना तालुक्यातील कल्याण गिरजा, कल्याण व जाफराबाद तालुक्यातील जिवरेखा हे प्रकल्प जोत्याखाली आहेत. बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकल्पही जोत्याखाली आहे. तर तालुक्यातील गल्हाटी प्रकल्पही कोरडाठाक आहे.मागील वर्षी याच कालावधीत जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ ८.८३ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा याच कालावधीत मध्यम प्रकल्पांमध्ये २१.२३ टक्के उपयुक्त पाणी आहे. गतवर्षीपेक्षा यंदा मध्यम प्रकल्पांची स्थिती समाधानकारक असली तरी प्रकल्पांची तहान मात्र कायम आहे. त्यामुळे पुढील कालावधीत तरी जिल्ह्यात मोठा पाऊस पडेल, अशी आशा सर्वसामान्यांना लागली आहे.

टॅग्स :droughtदुष्काळDamधरणwater shortageपाणीकपात