शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मतदार हेल्पलाईनवर १६३० कॉल्स्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 12:41 AM

मतदार हेल्पलाईनवर ४५ दिवसात १६३० कॉल्स्ची नोंद झाली असून कॉल करणाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभा निवडणूक चोखपणे पार पडावी तसेच मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. मतदारांच्या मनातील शंका- कुशंका यांचे निरसन व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार हेल्पलाईनची सुविधा तयार करण्यात आली आहे. या मतदार हेल्पलाईनवर ४५ दिवसात १६३० कॉल्स्ची नोंद झाली असून कॉल करणाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली आहेत.अनेकदा मतदार निवडणूक केंद्रावर गेल्यावर मतदान यादीत नाव नसणे, चुकीचे नाव असणे, पत्यात बदल असणे या सारख्या असंख्य प्रश्नांना सामोरे जावे लागते. मतदारांच्या समस्या सोडता याव्यात, यासाठी ०२८२१९५० या हेल्पलाईनची सुविधा १७ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आली आहे. १ फेब्रुवारीपर्यंत या हेल्पलाईन क्रमांकावर ७४ कॉलची नोंद झाली होती. १ फेबु्रवारी ते १ एप्रिलपर्यंत १५२७ तर मंगळवारी एक दिवसात जवळपास ३० कॉल या हेल्पलाईनवर आले आहेत. असे १७ जानेवारी ते २ एप्रिल या ४५ दिवसांच्या कालावधीत १६३० कॉलची नोंद झालेली आहेत.या हेल्पलाईन कक्षाची स्थापना जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या मार्गदशनाखाली करण्यात आली. जालना जिल्ह्यात लोकसभेची निवडणूक २३ एप्रिल रोजी होत आहे.मतदार याद्या बिनचूक तयार व्हाव्यात, यासाठी या हेल्पलाईनची सुविधा तयार करण्यात आली आहे. यात नवमतदार आमचे यादीत नाव आहे का याची व ओळखपत्रासंबंधी विचारपूस करत आहेत.यावेळी त्यांना त्यांच्या अडचणींबाबत मार्गदर्शन केले जात आहे. तसेच नावात बदल करण्यासाठी काय करावे, पत्त्यात बदल, चुकलेला फोटो असल्यास तो बदलणे, मतदान केंद्र आदींबाबत या क्रमांकावर मतदार प्रश्न विचारत आहेत. त्यांना प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली जातात. दरम्यान, मतदारांसाठी सुरु करण्यात आलेल्या नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून, अनेकांना येणाऱ्या अडचणी यामुळे सुटण्यास मदत होत आहे. त्यातच अनेकांनी आपले नाव मतदार यादीत आले नसल्याच्या तक्रारी या हेल्पलाईनवर मोठ्या आल्या असल्याची माहिती निवडून विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिली आहे. काही तक्रारी असल्यास तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.वातावरण तापतेयलोकसभेची निवडणूक २० दिवसांवर आली आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. यात मतदारराजाही सज्ज आहे. मतदानाला गेल्यानंतर ऐनवेळी विविध अडचणी येतात. मतदारांची असुविधा होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने सदर हेल्पलाईन सुरु केली आहे. या हेल्पलाईनवर आतापर्यंत १६३० मतदारांनी आपल्या विविध अडचणीसंदर्भात नोंदणी केल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :jalna-pcजालनाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग