शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
2
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
3
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
5
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
6
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
7
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
8
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
9
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
10
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
11
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
12
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
13
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
14
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
15
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
16
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
17
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
19
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
20
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश

कोरोनामुळे १४२ बालकांनी गमावले पालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:35 IST

जालना : कोरोनामुळे जिल्ह्यातील १४२ बालकांच्या पालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यात १३६ बालकांच्या एका पालकाचा मृत्यू झाला ...

जालना : कोरोनामुळे जिल्ह्यातील १४२ बालकांच्या पालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यात १३६ बालकांच्या एका पालकाचा मृत्यू झाला आहे. तर सहा बालकांचे आई-वडील कोरोनामुळे मृत झाले आहेत. संबंधितांची माहिती बाल स्वराज्य पोर्टलवर भरण्यात आली आहे. संबंधित बालकांना शासकीय योजनांचा लाभ देण्याबाबत सुरू असलेल्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी आयोजित बैठकीत घेण्यात आला.

जिल्हास्तरावरील कृती दल समितीची तिसरी बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी सदस्य पालीस अधीक्षक विनायक देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, डॉ. संदीप लहाने, सदस्य सचिव आर. बी. पारवेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, बालकल्याण समितीच्या अश्विनी लखमले, गजानन इंगळे, सदस्य सचिव संगीता लोंढे, आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी लाेंढे यांनी शासकीय निर्देशानुसार झालेल्या कामाचा आढावा घेतला.

कोरोनामुळे एक पालक गमावलेल्या १४२ बालकांचा शोध घेण्यात आला आहे. दोन्ही पालक गमावलेल्या सहा बालकांचा शोध घेतला आहे. त्याची नोंद बाल स्वराज पोर्टलवर झाली आहे. त्यांपैकी १२९ बालकांचा सामाजिक तपासणी अहवाल जिल्हा बालसंरक्षण कक्षामार्फत करण्यात आला आहे. १२९ पैकी बालकल्याण समितीने ६० बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी आदेश दिलेले आहेत. त्याचबरोबर कोरोनाव्यतिरिक्त इतर १४५ बालकांना बालकल्याण समितीने बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी आदेश दिलेले आहे. उर्वरित ८२ बालकांना लाभ देण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.

४१ महिलांची यादी प्राप्त

कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना, नॅशनल बेनिफिट स्किम व इतर शासकीय योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी ४१ विधवा महिलांची यादी प्राप्त झाली असून, त्यावर वेळेत कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.