शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानला आनंदाच्या उकळ्या; सुखी देशांच्या यादीत भारताला सख्ख्या शेजाऱ्यांनी पछाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 09:11 IST

World Happiness Report 2021: संयुक्त राष्ट्रांकडून जारी होत असलेल्या या यादीमध्ये 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' मध्ये फिनलँड सलग चार वर्षे एक नंबरला आहे. तर भारत 149 देशांच्या या यादीत 139 व्या क्रमांकावर आहे. 

गेल्या वर्षीपासून सुरु असलेल्या कोरोना महामारीने जगभरात हाहाकार उडविला आहे. आतापर्यंत 27 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान जगातील आनंदी देश कोणते याचा सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. (Finland is first Happiest county in the world by fourth time.)

फिनलँडचे लोक जगात सर्वाधिक खूश आहेत. महत्वाचे म्हणजे संयुक्त राष्ट्रांकडून जारी होत असलेल्या या यादीमध्ये 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' मध्ये फिनलँड सलग चार वर्षे एक नंबरला आहे. तर भारत 149 देशांच्या या यादीत 139 व्या क्रमांकावर आहे. 

या रिपोर्टमध्ये असे आढळले आहे की, कोरोना महामारीतून धडा घेताना पैसा नाही तर आरोग्यावर जोर द्यावा लागणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्यूशन्स नेटवर्कने हा रिपोर्ट तयार केला आहे. यामध्य़े डेन्मार्क दुसऱ्या आणि स्वित्झरलँड तिसऱ्या नंबरवर आहे. 

जगातील सर्वात शक्तीशाली देश अमेरिका गेल्या वर्षी या यादीत 18 व्या नंबरवर होता. यंदाच्या यादीत तो 14 व्या नंबरवर आला आहे. तर ब्रिटन पाच अंकांनी घसरून 18 व्या स्थानावर आला आहे. 149 देशांच्या या आनंदाचा स्तर शोधण्यासाठी गॅलपच्या आकड्यांचा प्रयोग करण्यात आला आहे. यामध्ये जीवनाची गुणवत्ता, सकारात्मकपणा आणि नकारात्मकतेच्या आधारावर हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. 

चीन विसाव्या नंबरवरभारतानंतर बुरूंडी, येमन, टांझानिया, हैती, मालावी, लेसोथो, बोत्सवाना, रवांडा, झिम्बाम्बे आणि अफगाणिस्तान या देशांचा नंबर लागतो. मात्र, सख्खे शेजारी असलेले नेपाळ 87, पाकिस्तान105, चीन 20, बांग्लादेश 101, श्रीलंका 129 आदींनी भारताला मागे टाकले आहे. चीन गेल्यावर्षी 94 व्या स्थानी होता.

 काय होते प्रश्न...सकारात्मक भावाच्या श्रेणीमध्ये सहभागी झालेल्या लोकांना तुम्ही काल हसला होता का असा प्रश्न विचारण्यात आला होता. तर नकारात्मक भावाच्या व्यक्तींना तुम्ही ज्या दिवशी हसला होता त्या दिवशीच कोणत्याही गोष्टीवरून नाराज झाला होता का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. अशाप्रकारे लोकांच्या आयुष्याच्या गुणवत्तेच्या आधारावर लोकांमधील संतोष भाव जाणण्यात आला आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानchinaचीनNepalनेपाळ