शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

पाकिस्तानला आनंदाच्या उकळ्या; सुखी देशांच्या यादीत भारताला सख्ख्या शेजाऱ्यांनी पछाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 09:11 IST

World Happiness Report 2021: संयुक्त राष्ट्रांकडून जारी होत असलेल्या या यादीमध्ये 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' मध्ये फिनलँड सलग चार वर्षे एक नंबरला आहे. तर भारत 149 देशांच्या या यादीत 139 व्या क्रमांकावर आहे. 

गेल्या वर्षीपासून सुरु असलेल्या कोरोना महामारीने जगभरात हाहाकार उडविला आहे. आतापर्यंत 27 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान जगातील आनंदी देश कोणते याचा सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. (Finland is first Happiest county in the world by fourth time.)

फिनलँडचे लोक जगात सर्वाधिक खूश आहेत. महत्वाचे म्हणजे संयुक्त राष्ट्रांकडून जारी होत असलेल्या या यादीमध्ये 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' मध्ये फिनलँड सलग चार वर्षे एक नंबरला आहे. तर भारत 149 देशांच्या या यादीत 139 व्या क्रमांकावर आहे. 

या रिपोर्टमध्ये असे आढळले आहे की, कोरोना महामारीतून धडा घेताना पैसा नाही तर आरोग्यावर जोर द्यावा लागणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्यूशन्स नेटवर्कने हा रिपोर्ट तयार केला आहे. यामध्य़े डेन्मार्क दुसऱ्या आणि स्वित्झरलँड तिसऱ्या नंबरवर आहे. 

जगातील सर्वात शक्तीशाली देश अमेरिका गेल्या वर्षी या यादीत 18 व्या नंबरवर होता. यंदाच्या यादीत तो 14 व्या नंबरवर आला आहे. तर ब्रिटन पाच अंकांनी घसरून 18 व्या स्थानावर आला आहे. 149 देशांच्या या आनंदाचा स्तर शोधण्यासाठी गॅलपच्या आकड्यांचा प्रयोग करण्यात आला आहे. यामध्ये जीवनाची गुणवत्ता, सकारात्मकपणा आणि नकारात्मकतेच्या आधारावर हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. 

चीन विसाव्या नंबरवरभारतानंतर बुरूंडी, येमन, टांझानिया, हैती, मालावी, लेसोथो, बोत्सवाना, रवांडा, झिम्बाम्बे आणि अफगाणिस्तान या देशांचा नंबर लागतो. मात्र, सख्खे शेजारी असलेले नेपाळ 87, पाकिस्तान105, चीन 20, बांग्लादेश 101, श्रीलंका 129 आदींनी भारताला मागे टाकले आहे. चीन गेल्यावर्षी 94 व्या स्थानी होता.

 काय होते प्रश्न...सकारात्मक भावाच्या श्रेणीमध्ये सहभागी झालेल्या लोकांना तुम्ही काल हसला होता का असा प्रश्न विचारण्यात आला होता. तर नकारात्मक भावाच्या व्यक्तींना तुम्ही ज्या दिवशी हसला होता त्या दिवशीच कोणत्याही गोष्टीवरून नाराज झाला होता का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. अशाप्रकारे लोकांच्या आयुष्याच्या गुणवत्तेच्या आधारावर लोकांमधील संतोष भाव जाणण्यात आला आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानchinaचीनNepalनेपाळ