शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

भारतासोबत नव्याने मैत्रीची पाकिस्तानच्या पंतप्रधानांची इच्छा, काश्मीरबाबत सुचवला असा तोडगा, मोदी मान्य करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 17:23 IST

India Pakistan Relation: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतासोबत शांततापूर्ण आणि मैत्रिपूर्ण संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच काश्मीर प्रश्न सुटण्याची शक्यताही व्यक्त केली.

इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतासोबत शांततापूर्ण आणि मैत्रिपूर्ण संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच काश्मीर प्रश्न सुटण्याची शक्यताही व्यक्त केली. एका मीडिया रिपोर्टनुसार शाहबाज शरीफ यांनी समानता, न्याय आणि परस्पर सन्मानाचे तत्त्व आणि काश्मीर प्रश्न सोडवण्याच्या आधारावर भारतासोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

शाहबाज शरीफ यांनी आंतरराष्ट्रीय समुहाला दक्षिण आशियामध्ये स्थायी शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी सुविधाजनक भूमिका बजावण्याची मागणी केली.  पाकिस्तानमधील अग्रगण्य अशा डॉन वृत्तपत्राने पंतप्रधानांच्या कार्यालयाच्या हवाल्याने सांगितले की, शरीफ यांनी पाकिस्तानमध्ये नवनियुक्त ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त नील हॉकिन्स यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हे मत व्यक्त केले.

शाहबाज शरीफ यांनी सांगितले की, पाकिस्तान समानता, न्याय आणि परस्पर सन्मानाच्या सिद्धांताच्या आधारावर भारतासोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करू इच्छितो. या संदर्भात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्ताव आणि काश्मिरी लोकांच्या इच्छेनुसार जम्मू-काश्मीर विवादावर न्यायसंगत आणि  शांततापूर्ण तोडगा निघणे अपरिहार्य आहे.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, आंतरराष्ट्रीय समुदायाला या संदर्भात एका सहाय्यकाची भूमिका बजावावी लागेल. कारण हा दक्षिण आशियामध्ये स्थायी शांतता आणि स्थिरतेसाठी आवश्यक आहे. दरम्यान, दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, असे भारताने पाकिस्तानला ठणकावून सांगितले आहे. दहशतवाद आणि शत्रुत्वमुक्त वातावरण बनवण्याची जबाबदारी पाकिस्तानची आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य आहे आणि कायम राहील, असे भारताने पाकिस्तानला वारंवार ठणकावून सांगितले आहे.   

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPoliticsराजकारण