शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

भारतासोबत नव्याने मैत्रीची पाकिस्तानच्या पंतप्रधानांची इच्छा, काश्मीरबाबत सुचवला असा तोडगा, मोदी मान्य करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 17:23 IST

India Pakistan Relation: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतासोबत शांततापूर्ण आणि मैत्रिपूर्ण संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच काश्मीर प्रश्न सुटण्याची शक्यताही व्यक्त केली.

इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतासोबत शांततापूर्ण आणि मैत्रिपूर्ण संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच काश्मीर प्रश्न सुटण्याची शक्यताही व्यक्त केली. एका मीडिया रिपोर्टनुसार शाहबाज शरीफ यांनी समानता, न्याय आणि परस्पर सन्मानाचे तत्त्व आणि काश्मीर प्रश्न सोडवण्याच्या आधारावर भारतासोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

शाहबाज शरीफ यांनी आंतरराष्ट्रीय समुहाला दक्षिण आशियामध्ये स्थायी शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी सुविधाजनक भूमिका बजावण्याची मागणी केली.  पाकिस्तानमधील अग्रगण्य अशा डॉन वृत्तपत्राने पंतप्रधानांच्या कार्यालयाच्या हवाल्याने सांगितले की, शरीफ यांनी पाकिस्तानमध्ये नवनियुक्त ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त नील हॉकिन्स यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हे मत व्यक्त केले.

शाहबाज शरीफ यांनी सांगितले की, पाकिस्तान समानता, न्याय आणि परस्पर सन्मानाच्या सिद्धांताच्या आधारावर भारतासोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करू इच्छितो. या संदर्भात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्ताव आणि काश्मिरी लोकांच्या इच्छेनुसार जम्मू-काश्मीर विवादावर न्यायसंगत आणि  शांततापूर्ण तोडगा निघणे अपरिहार्य आहे.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, आंतरराष्ट्रीय समुदायाला या संदर्भात एका सहाय्यकाची भूमिका बजावावी लागेल. कारण हा दक्षिण आशियामध्ये स्थायी शांतता आणि स्थिरतेसाठी आवश्यक आहे. दरम्यान, दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, असे भारताने पाकिस्तानला ठणकावून सांगितले आहे. दहशतवाद आणि शत्रुत्वमुक्त वातावरण बनवण्याची जबाबदारी पाकिस्तानची आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य आहे आणि कायम राहील, असे भारताने पाकिस्तानला वारंवार ठणकावून सांगितले आहे.   

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPoliticsराजकारण