शहरं
Join us  
Trending Stories
1
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
2
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
3
Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?
4
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
5
कष्टाचं फळ मिळालंच! स्मृती मानधनानं दुसऱ्यांदा जिंकला आयसीसीचा स्पेशल अवॉर्ड
6
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
7
बाजारात तेजीचा डबल धमाका! सेन्सेक्सची ८६२ अंकांची उडी; गुंतवणूकदारांनी कमावले २.०९ लाख कोटी
8
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
9
आशिया कप स्पर्धेत कार जिंकली; आता स्फोटक बॅटर अभिषेक शर्माला ICC कडून मिळालं मोठं बक्षीस
10
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?
11
Diwali Rain Alert: यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडी नाही तर पाऊस बरसणार, मुंबईसह महाराष्ट्रात हवामान असं असणार
12
कष्टाचं फळ! ५० रुपये मजुरी, घरोघरी जाऊन विकली भाजी, शिक्षण सोडलं अन् आता RAS ऑफिसर
13
Raigad Crime: पतीच्या हत्येसाठी इन्स्टाग्रामवर अकाऊंट, कृष्णाला बस स्टॅण्डवर भेटायला बोलावलं अन् बॉयफ्रेंड, मैत्रिणीच्या मदतीने काढला काटा
14
इंडिया आघाडीत राज ठाकरेंच्या मनसेला सहभागी करून घेणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले...
15
Mumbai Crime: एक व्हिडीओ कॉल अन् मुंबईतील व्यक्तीचे 58 कोटी लुटले! 'तुम्ही मनी लॉड्रिंग केलंय' म्हणत...
16
Vasubaras 2025: रमा एकादशी आणि वसुबारस (गोवत्स द्वादशी) एकत्र; कशी करावी पूजा? वाचा लाभ!
17
Happy Diwali Stickers: एक नंबर! आपल्या माणसांना द्या खास शुभेच्छा; WhatsApp वर स्वत:च 'असे' बनवा 'दिवाळी स्टिकर्स'
18
'या' शेअरने वर्षात १ लाखाचे केले १ कोटी! गेल्या दिवाळीचा लखपती यंदा कोट्यधीश, टॉप १० मल्टीबॅगर स्टॉक
19
“तक्रार करण्यासारखे काही घडले नाही, संजय राऊतांना...”; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितले
20
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नेपाळ दौरा का महत्त्वाचा आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2018 14:39 IST

पंतप्रधानपदी आल्यापासून मोदी यांची गेल्या चार वर्षातील ही तिसरी नेपाळ भेट आहे. दोन वर्षांपुर्वी मधेसी समुदायाच्या निदर्शनांनंतर तयार झालेल्या कोंडीनंतर दोन्ही देशांमध्ये काही गैरसमज आणि तणावाचे प्रसंग निर्माण झाले होते.

काठमांडू- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसांचा नेपाळ दौरा आज सकाळपासून सुरु झाला आहे. पंतप्रधानपदी आल्यापासून मोदी यांची गेल्या चार वर्षातील ही तिसरी नेपाळ भेट आहे. दोन वर्षांपुर्वी मधेसी समुदायाच्या निदर्शनांनंतर तयार झालेल्या कोंडीनंतर दोन्ही देशांमध्ये काही गैरसमज आणि तणावाचे प्रसंग निर्माण झाले होते. मात्र या भेटीनंतर त्या कोंडीमुळे निर्माण झालेला तणाव निवऴेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नेपाळने नुकताच चीनला बुधी-गंडकी हायड्रोइलेक्टीकल प्रोजेक्ट या 2.3 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीच्या प्रकल्पाला नकार दिला आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली अरुण 3 या प्रकल्पाची पायाभरणी करतील. हा प्रकल्प 900 मेगावॅट ऊर्जा निर्मितीच्या क्षमतेचा असेल. हा प्रकल्प संखुवासभा या जिल्ह्यामध्ये उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प तयार होण्यास पाच वर्षांचा कालावधी जाईल आणि त्यासाठी 6000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.या प्रकल्पामुळे भारत आणि नेपाळला वीज मिळणार आहे.मोदींच्या भेटीमुळे भारत आणि नेपाळ यांना रेल्वेने जोडण्याच्या प्रकल्पालाही गती मिळणार आहे. बिहारमधील राक्सौल आणि नेपाळची राजधानी काठमांडू यांना जोडण्याची घोषणा ओली यांच्या भारतदौऱ्याच्यावेळएस करण्यात आली होती. या वर्षअखेरीस त्याचे सर्वेक्षण पूर्ण होणार आहे. नेपाळवरील भारताचा प्रभाव कमी करण्यासाठी चीननेही तिबेट व नेपाळ यांच्यामध्ये रेल्वेमार्गाची घोषणा केली आहे. त्यामुळे त्याला शह देण्यासाठी भारतातर्फे अशा रेल्वेमार्गाची पूर्तता लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. भारताने नेपाळसह भूतानलाही रेल्वेने जोडण्याची तयारी चालवलेली आहे. रेल्वेमार्गांबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी ओली यांच्याबरोबर अंतर्गत जलवाहतुकीवर चर्चा करणार आहेत. तसेच कृषीविषयक मुद्द्यांवरही नेपाळ आणि भारत यांच्यामध्ये चर्चा होणार आहे. याबरोबरच पंचेश्वर बहुउद्देशिय धरण प्रकल्पही दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या चर्चेत समाविष्ट असेल. नेपाळवर गेली अनेक दशके चीन आपला प्रभाव पाडण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारताचा प्रभाव कमी करुन नेपाळमध्ये शिरकाव करण्यासाठी चीन विविध मार्गांचा वापर करत आहे.

टॅग्स :NepalनेपाळIndiaभारतprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीKathmanduकाठमांडूJanakpurजनकपूर