शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अवघी ६ लाख लोकसंख्या असलेला 'हा' देश भारतासाठी अति महत्त्वाचा का आहे? कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 13:43 IST

६ लाख लोकसंख्या असलेल्या या देशाची भारतासोबतची आर्थिक नाळ अत्यंत घट्ट आहे.

युरोपमधील लक्झमबर्ग हा देश आकारमानाने आणि लोकसंख्येने अत्यंत छोटा असला, तरी भारताच्या दृष्टीने तो किती मोठा आहे, याची प्रचिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या दौऱ्यातून आली आहे. "भारत लक्झमबर्गला आपला अत्यंत महत्त्वाचा भागीदार मानतो," असे विधान जयशंकर यांनी केले आहे. फिनटेक, स्पेस टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांसारख्या भविष्यवेधी क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांतील मैत्री आता नव्या उंचीवर पोहोचणार आहे.

मैत्रीचा ७७ वर्षांचा इतिहास 

भारत आणि लक्झमबर्ग यांच्यातील राजनैतिक संबंधांची सुरुवात १९४८ मध्ये झाली होती. गेल्या सात दशकांपासून हे दोन्ही देश जागतिक व्यासपीठावर एकमेकांचे खंदे समर्थक राहिले आहेत. एस. जयशंकर यांनी लक्झमबर्गचे पंतप्रधान ल्यूक फ्रायडन आणि उपपंतप्रधान झेवियर बेटेल यांची भेट घेऊन गुंतवणूक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यावर सविस्तर चर्चा केली.

भारतासाठी लक्झमबर्ग का महत्त्वाचा? 

६ लाख लोकसंख्या असलेल्या या देशाची भारतासोबतची आर्थिक नाळ अत्यंत घट्ट आहे. लक्झमबर्ग स्टॉक एक्सचेंजमध्ये १७० हून अधिक भारतीय कंपन्या लिस्टेड आहेत, जे दोन्ही देशांतील आर्थिक विश्वासार्हतेचे प्रतीक आहे. लक्झमबर्गमधील अनेक कंपन्या गेल्या दोन दशकांपासून भारताच्या 'मेक इन इंडिया' मोहिमेत सक्रिय असून भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. लक्झमबर्गमधील अनेक स्वयंसेवी संस्था भारतातील स्थानिक भागीदारांसोबत आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. दरवर्षी भारतातील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये लक्झमबर्ग आपले चित्रपट आणि प्रॉडक्शन दाखवून सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करत असतो.

१९८३ पासून सुरू झाला भेटींचा सिलसिला 

१९८३ मध्ये ग्रँड ड्यूक जीन हे भारत भेटीवर येणारे लक्झमबर्गचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले होते. त्यानंतर २००२ मध्ये नवी दिल्लीत लक्झमबर्गने आपला दूतावास उघडला. तेव्हापासून दोन्ही देशांतील मंत्री आणि उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या भेटींची संख्या सातत्याने वाढत आहे. आजच्या काळात जेव्हा जगभरात आर्थिक समीकरणे बदलत आहेत, तेव्हा लक्झमबर्गसारख्या आर्थिकदृष्ट्या प्रगत देशाशी असलेली भागीदारी भारतासाठी 'गेम चेंजर' ठरू शकते, असा विश्वास एस. जयशंकर यांनी व्यक्त केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Why Luxembourg, with a population of 6 lakh, matters to India.

Web Summary : Luxembourg, though small, is a key partner for India in fintech, space tech, and AI. Strong ties exist through trade, investment, and cultural exchange, with many Indian companies listed on the Luxembourg Stock Exchange. This partnership is set to be a game-changer.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय