शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

भारताने ‘सीएए’ कायदा का केला हे अनाकलनीय - शेख हसीना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 04:28 IST

सीएए’ व ‘एनआरसी’ या भारताच्या अंतर्गत बाबी आहेत, अशी बांगलादेशाची सातत्याची भूमिका आहे. ‘एनआरसी’ हे भारताने फक्त आपल्या देशांतर्गत हाती घेतलेले काम आहे

दुबई : सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टर (एनआरसी) या भारताच्या अंतर्गत बाबी आहेत, हे मान्य केले तरी भारताने या अनावश्यक गोष्टी का कराव्यात हे अनाकलनीय आहे, असे वक्तव्य बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केले आहे.शेख हसीना सध्या संयुक्त अरब अमिरातींच्या दौऱ्यावर आहेत. ‘सीएए’वरून सध्या भारतात सुरू असलेल्या विरोधाच्या संदर्भात विचारता ‘गल्फ न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या की, ‘सीएए’ व ‘एनआरसी’ या भारताच्या अंतर्गत बाबी आहेत, अशी बांगलादेशाची सातत्याची भूमिका आहे. ‘एनआरसी’ हे भारताने फक्त आपल्या देशांतर्गत हाती घेतलेले काम आहे, असे भारत सरकारने वारंवार सांगितले आहे व गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये नवी दिल्ली भेटीत पंतप्रधान मोदी यांनी मला तसे आश्वासनही दिले आहे.तरीही या गोष्टी भारत सरकार काय करीत आहे? त्याची काही गरज नव्हती, अशी पुस्तीही शेख हसीना यांनी जोडली. बांगलादेशच्या एकूण १६.१ कोटी लोकसंख्येत १०.७ टक्के हिंदू व ०.६ टक्के बौद्ध आहेत व तेथून धार्मिक छळामुळे लोक भारतात जातात याचे बांगलादेशने खंडन केलेले आहे. शेख हसीना म्हणाल्या की, लोकांनी भारतातून बांगलादेशात उलटे स्थलांतर केल्याच्या नोंदी नाहीत. मात्र, भारतातील भारतात लोकांना त्रास सोसावा लागत आहे; पण हीसुद्धा भारताची अंतर्गत बाब आहे. औपचारिकपणे बांगलादेशाने ही भूमिका घेतली असली तरी भारतातील या दोन्ही घडामोडींवरून तेथे बरीच अस्वस्थता आहे.ही भारताची अंतर्गत बाब असली तरी त्याचा परिणाम शेजारी देशांवरही होऊ शकतो, असे बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए. के. अब्दुल मोमेन यांनी बोलून दाखविले आहे. एवढेच नव्हे तर ‘सीएए’ मंजूर झाल्यानंतर बांगलादेशच्या तीन मंत्र्यांनी भारताचे नियोजित दौरे रद्दही केलेहोते. पंतप्रधान शेख हसीना मात्र या मुलाखतीत म्हणाल्या की, सध्या भारत व बांगलादेशचे संबंध सर्वोत्तम आहेत व दोन्ही देशांमध्ये व्यापक पातळीवर सहकार्य सुरू आहे.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक