शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

जगातील सर्वात मोठा हिमनग अचानक का थांबला? २०२० पासून वाहत होता, ७३ किमी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 10:16 IST

A23a हा हिमनग महाकाय आहे, तो जॉर्जियाच्या दिशेने जात होता. या बेटांवर आदळेल किंवा तेथील उथळ पाण्यामध्ये अडकून पडेल अशी चिंता वाटत होती.

जगातील सर्वात मोठ्या हिमनगाने जगाच्या चिंता वाढविल्या आहेत. A23a नावाचा हा हिमनग २०२० मध्ये अंटार्टिकापासून तुटून वेगळा झाला होता. तेव्हा पासून या विशालकाय हिमनगाने समुद्राच्या पाण्यात वाहण्यास सुरुवात केली होती. एक अब्ज टन एवढे अजस्त्र वजन असलेल्या या हिमनगाच्या वाहण्यामुळे दक्षिण जॉर्जिया बेटांना धोका निर्माण झाला होता. तो या बेटांना आदळण्याची भीती व्यक्त केली जात होती. परंतू हा हिमनग अचानक थांबल्याने शास्त्रज्ञ देखील आश्चर्यचकीत झाले आहेत. 

A23a हा हिमनग महाकाय आहे, तो जॉर्जियाच्या दिशेने जात होता. या बेटांवर आदळेल किंवा तेथील उथळ पाण्यामध्ये अडकून पडेल अशी चिंता वाटत होती. यामुळे पेंग्विनसारख्या प्राण्यांची भोजन व्यवस्था प्रभावित होण्याचा धोका होता. परंतू हा हिमनग गेल्या १ मार्चपासून दक्षिण जॉर्जिया हिमनगापासून ७३ किमी अंतरावर येऊन थांबला आहे. जर हा हिमनग याच जागी थांबून राहिला तर त्यामुळे वन्यजीवांना कोणताही धोका होणार नाही, असे ब्रिटिश अंटार्टिक सर्वे (BAS) चे शास्त्रज्ञ अँड्र्यू मेयर्स यांनी म्हटले आहे. 

महत्वाचे म्हणजे या हिमनगाचा १९ किमी एवढ्या लांबीचा एक तुकडा जानेवारीमध्ये या हिमनगापासून वेगळा झाला आहे. महासागराचे पाणी जसजसे हे हिमनग पार करतात तसतसे तेथील वाढत गेलेल्या तापमानामुळे बर्फ वितळू लागतो व या हिमनगाचे तुकडे होऊ लागतात. या हिमनगाचा १९ किमी लांबीचा तुकडा वेगळा झाला आहे. यामुळे या हिमनगाचे वस्तुमान बदलले आहे. जर हा हिमनग इथेच थांबून राहिला तर तेथील पाण्यात वेगवेगळे पोषक तत्व विरघळतील, त्याचा पेंग्विन, सील सारख्या प्राण्यांना फायदा होईल. या भागात जवळपास ५ दशलक्ष सील आणि ६५ दशलक्ष पक्षांचे वास्तव्य आहे. या जिवांना फायदा होऊ शकेल असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. 

तापमान वाढीमुळे २००० सालापासून आतापर्यंत ६००० अब्ज टन बर्फ वितळला आहे. पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत आहे.हे तापमान १.५ ते २ अंश सेल्सिअसने वाढले तर समुद्राची पातळी एवढी वाढेल की ती पु्न्हा कधीच सामान्य होऊ शकत नाही, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या शतकाच्या अखेरीस मुंबईसारखी समुद्रालगतची शहरे पाण्याखाली जाण्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. असे झाल्यास भारतावर मोठे संकट ओढवू शकते. 

टॅग्स :environmentपर्यावरणHeat Strokeउष्माघात