शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
5
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
6
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
7
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
8
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
9
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
10
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
11
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
12
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
13
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
14
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
15
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
16
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
17
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
18
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
19
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
20
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...

जगातील सर्वात मोठा हिमनग अचानक का थांबला? २०२० पासून वाहत होता, ७३ किमी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 10:16 IST

A23a हा हिमनग महाकाय आहे, तो जॉर्जियाच्या दिशेने जात होता. या बेटांवर आदळेल किंवा तेथील उथळ पाण्यामध्ये अडकून पडेल अशी चिंता वाटत होती.

जगातील सर्वात मोठ्या हिमनगाने जगाच्या चिंता वाढविल्या आहेत. A23a नावाचा हा हिमनग २०२० मध्ये अंटार्टिकापासून तुटून वेगळा झाला होता. तेव्हा पासून या विशालकाय हिमनगाने समुद्राच्या पाण्यात वाहण्यास सुरुवात केली होती. एक अब्ज टन एवढे अजस्त्र वजन असलेल्या या हिमनगाच्या वाहण्यामुळे दक्षिण जॉर्जिया बेटांना धोका निर्माण झाला होता. तो या बेटांना आदळण्याची भीती व्यक्त केली जात होती. परंतू हा हिमनग अचानक थांबल्याने शास्त्रज्ञ देखील आश्चर्यचकीत झाले आहेत. 

A23a हा हिमनग महाकाय आहे, तो जॉर्जियाच्या दिशेने जात होता. या बेटांवर आदळेल किंवा तेथील उथळ पाण्यामध्ये अडकून पडेल अशी चिंता वाटत होती. यामुळे पेंग्विनसारख्या प्राण्यांची भोजन व्यवस्था प्रभावित होण्याचा धोका होता. परंतू हा हिमनग गेल्या १ मार्चपासून दक्षिण जॉर्जिया हिमनगापासून ७३ किमी अंतरावर येऊन थांबला आहे. जर हा हिमनग याच जागी थांबून राहिला तर त्यामुळे वन्यजीवांना कोणताही धोका होणार नाही, असे ब्रिटिश अंटार्टिक सर्वे (BAS) चे शास्त्रज्ञ अँड्र्यू मेयर्स यांनी म्हटले आहे. 

महत्वाचे म्हणजे या हिमनगाचा १९ किमी एवढ्या लांबीचा एक तुकडा जानेवारीमध्ये या हिमनगापासून वेगळा झाला आहे. महासागराचे पाणी जसजसे हे हिमनग पार करतात तसतसे तेथील वाढत गेलेल्या तापमानामुळे बर्फ वितळू लागतो व या हिमनगाचे तुकडे होऊ लागतात. या हिमनगाचा १९ किमी लांबीचा तुकडा वेगळा झाला आहे. यामुळे या हिमनगाचे वस्तुमान बदलले आहे. जर हा हिमनग इथेच थांबून राहिला तर तेथील पाण्यात वेगवेगळे पोषक तत्व विरघळतील, त्याचा पेंग्विन, सील सारख्या प्राण्यांना फायदा होईल. या भागात जवळपास ५ दशलक्ष सील आणि ६५ दशलक्ष पक्षांचे वास्तव्य आहे. या जिवांना फायदा होऊ शकेल असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. 

तापमान वाढीमुळे २००० सालापासून आतापर्यंत ६००० अब्ज टन बर्फ वितळला आहे. पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत आहे.हे तापमान १.५ ते २ अंश सेल्सिअसने वाढले तर समुद्राची पातळी एवढी वाढेल की ती पु्न्हा कधीच सामान्य होऊ शकत नाही, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या शतकाच्या अखेरीस मुंबईसारखी समुद्रालगतची शहरे पाण्याखाली जाण्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. असे झाल्यास भारतावर मोठे संकट ओढवू शकते. 

टॅग्स :environmentपर्यावरणHeat Strokeउष्माघात