शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

धक्कादायक! संपूर्ण कुटुंब एका झटक्यात संपलं; नेपाळमधील अपघातात एअरलाईन कर्मचारी, पत्नी, मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 19:54 IST

नेपाळची राजधानी काठमांडू येथे आज बुधवारी एका विमानाचा अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

नेपाळमध्ये आज सकाळी विमानअपघात झाला. नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन विमानतळावर टेक ऑफ दरम्यान विमान कोसळले. विमान कोसळात ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. काठमांडू येथून पोखराला जाणाऱ्या या विमानात क्रू मेंबर्ससह एकूण १९ जण होते. घटनेची माहिती मिळताच बचावपथकाने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केले. मित्सुबिशी CRJ-200ER या दुर्दैवी सौर्य एअरलाइन्सच्या फ्लाइट 9N-ME मध्ये हा अपघात झाला.

नेपाळच्या काठमांडूत भीषण अपघात; टेक ऑफ करताना १९ प्रवाशांसह कोसळले विमान

या अपघातात एका मुलासह एकाच कुटुंबातील तीन जणांसह एकूण १८ जणांचा मृत्यू झाला. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच सौर्य एअरलाइनच्या विमानाला आग लागल्याने हा अपघात झाला. अपघातावेळी विमानात एकूण १९ जण होते.

वृत्तानुसार, या अपघातात मनु राज शर्मा, एअरलाइन तंत्रज्ञ, त्यांची पत्नी प्रिजा खतिवडा आणि त्यांचा चार वर्षांचा मुलगा आदि राज शर्मा यांचा मृत्यू झाला. प्रिजा यांनी ऊर्जा, जल संसाधन आणि पाटबंधारे मंत्रालयात सहाय्यक संगणक ऑपरेटर म्हणून काम केले.

विमानात एकुण १९ जण होते

या अपघातानंतर अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, पोखरा-जाणाऱ्या विमानात दोन क्रू मेंबर्स आणि एअरलाइनचे तांत्रिक कर्मचारी असे एकूण १९ जण होते. सकाळी अकराच्या सुमारास हे विमान कोसळले. 

या अपघातावर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचे वक्तव्यही समोर आले आहे. या दुर्घटनेत प्राणहानी झाल्यामुळे दु:ख झाल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान म्हणाले की नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. या दुःखाच्या काळात सर्वांनी संयम बाळगावा, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :NepalनेपाळAccidentअपघातairplaneविमान