शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

मेसेज फॉरवर्डवर व्हॉटस्अ‍ॅपची जगभर बंधने

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 06:25 IST

भारतात आधीच मर्यादा : खोटे संदेश टाळण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली : फेक न्यूजमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी व्हॉटस्अ‍ॅपने यापूर्वीच भारतात मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी मर्यादा ठरवून दिली आहे. हीच मर्यादा आता व्हॉटस्अ‍ॅपकडून जागतिक स्तरावर राबविली जाणार आहे.भारतात गतवर्षी जमावांकडून हल्ले होण्याच्या घटना घडल्या होत्या. यामागे व्हॉटस्अ‍ॅपचे फेक मेसेज असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर कंपनीचे वरिष्ठ अधिकारी क्रिस डॅनियल यांनी भारताचा दौरा केला होता. व्हॉटस्अ‍ॅपमध्ये फॉरवर्डची सुविधा आहे.

या माध्यमातून पूर्वी एकच मेसेज, व्हिडिओ अनेक जणांना पाठविता येत होता. पण, या घटनानंतर सरकारने व्हॉटस्अ‍ॅपवर दबाव आणला. आयटी विभागाचे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्हॉटस्अ‍ॅपला स्पष्ट केले की, अशा फेक मेसेजवर नियंत्रण आणावे. देशात व्हॉटस्अ‍ॅपचे २०० मिलियनपेक्षा अधिक युजर्स आहेत. सरकारने कंपनीला स्पष्ट निर्देश दिले की, त्यांनी नियमांचे पालन करावे लागेल. त्यानंतर भारतात मेसेज पाठविण्यावर मर्यादा आली. आता एका वेळी युजर पाच जणांना मेसेज पाठवू शकतो.मेक्सिकोमध्येही गैरप्रकारभारतातील मॉब लिचिंगच्या घटनेनंतर अशाच प्रकारच्या घटना मेक्सिकोत झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे व्हॉटस्अ‍ॅपने मेसेजची मर्यादा पूर्ण जगात लागू करण्याचे ठरविले आहे. व्हॉटस्अ‍ॅपने याची अंमलबजावणी केल्यानंतर आता जगात कोठेही एक युजर एका वेळी पाचपेक्षा अधिक जणांना मेसेज फॉरवर्ड करू शकणार नाही. अर्थात, व्हॉटस्अ‍ॅपकडून अधिकृतपणे याबाबत काही सांगण्यात आलेले नाही.

टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅप