शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चंद्रावर स्वारीची पन्नाशी : चक्क 'नासा'चा कमांडरही यानाला लिंबू लटकवतो तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 12:57 IST

भारतात लिंबू -मिरचीचा वापर खाद्यपदार्थांशिवाय जादूटोण्यासाठीही केला जातो.

भारतात लिंबू -मिरचीचा वापर खाद्यपदार्थांशिवाय जादूटोण्यासाठीही केला जातो. अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे प्रायोगिक अंतराळ यान अनेक संकटात सापडले होते. त्याचे कमांडर गस ग्रिशम यांचा जादूटोण्यावर थोडा विश्वास होता. या विश्वासापोटीच त्यांनी अंतराळयानाच्या मोड्युलबाहेर लिंबू लटकविले होते.

नासा’चा नियमचंद्रावरून पृथ्वीवर आणण्यात आलेल्या माती, खडक व इतर वस्तूंच्या नमुन्यांबाबत ‘नासा’ने तयार केलेल्या नियमावलीनुसार चंद्राशी संबंधित सर्वच वस्तू ह्या अमेरिकेची संपत्ती असतील आणि त्यांचा वापर केवळ सरकारी उद्देशांसाठीच केला जाऊ शकतो.अमेरिका आणि चीननंतर भारतानेसुद्धा चांद्र मोहिमेच्या दिशेने वेगवान पावले टाकणे सुरू केले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतर्फे(इस्रो) अंतराळ मोहीम चांद्रयान-२ चे प्रक्षेपण होत आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच चीनने आपले अंतराळ यान चांग ई-४ चंद्रावर उतरविले आहे. अपोलो-१७ नंतर अमेरिकेने चंद्रात रुची घेणे बंद केले होते. परंतु आता तोसुद्धा पुन्हा चंद्रावर संशोधनात गुंतला आहे. इ.स. २०२४ पर्यंत चंद्रावर पुन्हा एकदा अमेरिकेच्या अंतराळवीरांची पावले पडू शकतात. चंद्रावर वसाहती निर्माण करून खनिजांचे उत्खनन आणि मोठे उद्योग उभारण्यासाठी ही सगळी चढाओढ आहे. चंद्रावर वस्त्या निर्माण करून खनिज पदार्थांचे उत्खनन करण्याची जगभरातील महाशक्तींची योजना आहे. हे लक्षात घेऊनच चीन, अमेरिका, रशिया आणि भारत प्रदीर्घ कालावधीच्या योजनेवर काम करीत आहे. इ.स. २०३६ पर्यंत चंद्रावर आपला एक स्थायी ठावठिकाणा असावा यासाठी चीन प्रयत्नशील आहे. अग्निबाण बनविण्यासाठी चंद्राच्या भूपृष्ठावर आढळणाऱ्या टायटेनियम, युरेनियम, पोलाद व पाण्याचा वापर करण्याची या देशाची मनीषा आहे.

अनेक देश स्पर्धेत सामीलरशियाच्या अंतराळ संस्थेनेसुद्धा इ.स.२०४० पर्यंत चंद्रावर लोकवस्ती बनविण्याची घोषणा गेल्या वर्षी केली होती. रशियन विज्ञान अकादमीचे प्रमुख अलेक्झँडर सर्गेयेव यांच्या सांगण्यानुसार नैसर्गिक संसाधनांच्या दृष्टीने चंद्र अत्याधिक महत्त्वाचा आहे. जपान आणि दक्षिण कोरियानेसुद्धा चंद्राच्या ध्रुवांवर अंतराळ यान पाठविण्याची घोषणा केली आहे. त्यांचेही लक्ष चंद्रावरील नैसर्गिक स्रोतांच्या वापराकडेच आहे. तिकडे युरोपियन युनियनही चंद्रावर ‘मून व्हिलेज’ वसविण्याचे स्वप्न रंगवते आहे.

४ लाख लोकांचे परिश्रम५० वर्षांपूर्वी मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले तेव्हा साºया जगाने आनंदोत्सव साजरा केला होता. या अभूतपूर्व यशामागे एक-दोन नव्हेतर, तब्बल चार लाख लोकांचे अथक परिश्रम होते. १६ जुलै १९६९ साली अपोलो-११ हे अमेरिकन अंतराळ यान प्रथमच मानवासह रवाना झाले होते. चार दिवसांनी २० जुलैला अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव ठरले. चंद्र्रावर मानवाचे पाऊल पडणे ही मानवी इतिहासातील बहुधा सर्वाधिक महत्त्वपूर्ण उपलब्धी होती. खुद्द आर्मस्ट्राँगनेसुद्धा अपोलो-११ मोहिमेच्या यशाचे श्रेय त्याच्याशी जोडलेल्या हजारो लोकांना दिले होते.

 

टॅग्स :NASAनासाNeil Armstrongनील आर्मस्ट्राँग