शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

एलियन्सनी पृथ्वीवर हल्ला केला तर काय होणार? समोर आली धक्कादायक माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 18:10 IST

Aliens & Earth News: एलियन्स पृथ्वीवर आले तर मानव आणि त्यांच्यातील संबंध कसे असतील. तसेच एलियन्सनी पृथ्वीवर हल्ला केल्यास काय होईल, या प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहेत.

वॉशिंग्टन - अंतराळ संशोधनात होत असलेल्या प्रगतीबरोबरच एलियन्स अर्थात परग्रहवासियांबाबत असलेलं मानवाचं कुतुहल अधिकाधिक वाढत चाललं आहे. मात्र अमेरिका आणि ब्रिटनसारखे प्रगत देशही एलियन्सच्या अस्तित्वाबाबत अद्याप पूर्णपणे शोध घेऊ शकलेले नाहीत. तसेच त्यांनी एलियन्सचे अस्तित्वही नाकारलेले नाही. या देशांच्या सुरक्षा यंत्रणा यूएफओ आणि एलियन्सबाबतच्या घटनांवर लक्ष ठेवून असतात. काही काळापूर्वी बराक ओबामा यांनीही ते राष्ट्राध्यक्ष असताना यूएफओ संबंधीचे काही व्हिडीओ पाहिल्याचे मान्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर एलियन्स पृथ्वीवर आले तर मानव आणि त्यांच्यातील संबंध कसे असतील. तसेच एलियन्सनी पृथ्वीवर हल्ला केल्यास काय होईल, या प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहेत. (What would happen if aliens invaded Earth? Shocking information came to the fore)

याबाबत एका संशोधनामधून माहिती समोर आली आहे. अमेरिकेमध्ये चार दशकांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या SETI Instituteचे वरिष्ठ अॅस्ट्रोनॉमर सेठ शोस्तक यांनी एलियन आणि माणसांच्या संभाव्य चकमकीबाबत सविस्तर विवेचन केलं आहे. सेठ शोस्तक यांच्या म्हणण्यानुसार जर कधी एलियन्सनी पृथ्वीवर हल्ला केला तर माणसांकडे स्वत:च्या बचावासाठी काहीही साधन नसेल. मात्र चर्चित अॅस्ट्रोनॉमर सेठ शोस्तक यांचे असेही म्हणणे आहे की, बाहेरील जगातील कुणी माणसांविरोधात अचानक युद्ध सुरू करेल, असे कुठलेही कारण दिसून येत नाही. मात्र जर असं काही झालं तर हॉलिवूड चित्रपटांप्रमाणे मानव एलियन्सना उत्तर देऊ शकणार नाही. 

जगातील टॉप एलियन हंटर म्हणून प्रसिद्ध असलेले सेठ शोस्तक यांनी सांगितले की, जर एलियन्सनी हल्ला केला तर मानव त्यांच्या सामना करू शकणार नाही. त्यासाठी आम्ही स्वत:च जबाबदार आहोत. कारण आम्ही योग्य वेळी त्यांच्याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. शोस्तक पुढे म्हणतात की, एके दिवशी ब्रह्मांडातील कुठल्यातरी कोपऱ्यातून काही तरंग पृथ्वीवर पोहोचतील आणि एलियन्सच्या जीवनाला दुजोरा मिळेल.

SETI Institute ही अशी एक संस्था आहे जी सातत्याने एलियन्सच्या जीवनाचा शोध घेण्यासाठी आकाशातील विविध वस्तू स्कॅन करते. सेठ शोस्तक सांगतात की, अन्य ग्रहावरून पृथ्वीवर एलियन्स येणे खूप कठीण आहे. मात्र जर असं घडलं तर जगामध्ये अंधाधुंदी माजेल. मात्र संयुक्त राष्ट्रे आणि जगातील कुठलाही देश या विषयाकडे गांभीर्याने पाहत नाही आहे.

ते पुढे म्हणाले की, पृथ्वीवरून एलियन्सच्या कुठल्याही संभाव्य संपर्काबाबत आधीपासूनच प्रोटोकॉल तयार करण्याची गरज आहे. आणि SETI Institute याबाबत अनेक वर्षांपासून संयुक्त राष्ट्रंची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहे. सेठ शोस्तक सांगतात एलियन्स एकदम वेगळे असतील. त्यामुळे आधीपासून आखलेली कुठलीही योजना व्यर्थ जाऊ शकते. एलियन्सजवळ आपल्यापेक्षा अधिक अद्ययावत तंत्र असेल. आमच्याकडील सर्वाच चांगल्या रॉकेटला एखाद्या ताऱ्याजवळ जाण्यासाठी एक लाख वर्षे लागू शकतात. 

टॅग्स :Earthपृथ्वीscienceविज्ञानInternationalआंतरराष्ट्रीय