शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

एलियन्सनी पृथ्वीवर हल्ला केला तर काय होणार? समोर आली धक्कादायक माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 18:10 IST

Aliens & Earth News: एलियन्स पृथ्वीवर आले तर मानव आणि त्यांच्यातील संबंध कसे असतील. तसेच एलियन्सनी पृथ्वीवर हल्ला केल्यास काय होईल, या प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहेत.

वॉशिंग्टन - अंतराळ संशोधनात होत असलेल्या प्रगतीबरोबरच एलियन्स अर्थात परग्रहवासियांबाबत असलेलं मानवाचं कुतुहल अधिकाधिक वाढत चाललं आहे. मात्र अमेरिका आणि ब्रिटनसारखे प्रगत देशही एलियन्सच्या अस्तित्वाबाबत अद्याप पूर्णपणे शोध घेऊ शकलेले नाहीत. तसेच त्यांनी एलियन्सचे अस्तित्वही नाकारलेले नाही. या देशांच्या सुरक्षा यंत्रणा यूएफओ आणि एलियन्सबाबतच्या घटनांवर लक्ष ठेवून असतात. काही काळापूर्वी बराक ओबामा यांनीही ते राष्ट्राध्यक्ष असताना यूएफओ संबंधीचे काही व्हिडीओ पाहिल्याचे मान्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर एलियन्स पृथ्वीवर आले तर मानव आणि त्यांच्यातील संबंध कसे असतील. तसेच एलियन्सनी पृथ्वीवर हल्ला केल्यास काय होईल, या प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहेत. (What would happen if aliens invaded Earth? Shocking information came to the fore)

याबाबत एका संशोधनामधून माहिती समोर आली आहे. अमेरिकेमध्ये चार दशकांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या SETI Instituteचे वरिष्ठ अॅस्ट्रोनॉमर सेठ शोस्तक यांनी एलियन आणि माणसांच्या संभाव्य चकमकीबाबत सविस्तर विवेचन केलं आहे. सेठ शोस्तक यांच्या म्हणण्यानुसार जर कधी एलियन्सनी पृथ्वीवर हल्ला केला तर माणसांकडे स्वत:च्या बचावासाठी काहीही साधन नसेल. मात्र चर्चित अॅस्ट्रोनॉमर सेठ शोस्तक यांचे असेही म्हणणे आहे की, बाहेरील जगातील कुणी माणसांविरोधात अचानक युद्ध सुरू करेल, असे कुठलेही कारण दिसून येत नाही. मात्र जर असं काही झालं तर हॉलिवूड चित्रपटांप्रमाणे मानव एलियन्सना उत्तर देऊ शकणार नाही. 

जगातील टॉप एलियन हंटर म्हणून प्रसिद्ध असलेले सेठ शोस्तक यांनी सांगितले की, जर एलियन्सनी हल्ला केला तर मानव त्यांच्या सामना करू शकणार नाही. त्यासाठी आम्ही स्वत:च जबाबदार आहोत. कारण आम्ही योग्य वेळी त्यांच्याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. शोस्तक पुढे म्हणतात की, एके दिवशी ब्रह्मांडातील कुठल्यातरी कोपऱ्यातून काही तरंग पृथ्वीवर पोहोचतील आणि एलियन्सच्या जीवनाला दुजोरा मिळेल.

SETI Institute ही अशी एक संस्था आहे जी सातत्याने एलियन्सच्या जीवनाचा शोध घेण्यासाठी आकाशातील विविध वस्तू स्कॅन करते. सेठ शोस्तक सांगतात की, अन्य ग्रहावरून पृथ्वीवर एलियन्स येणे खूप कठीण आहे. मात्र जर असं घडलं तर जगामध्ये अंधाधुंदी माजेल. मात्र संयुक्त राष्ट्रे आणि जगातील कुठलाही देश या विषयाकडे गांभीर्याने पाहत नाही आहे.

ते पुढे म्हणाले की, पृथ्वीवरून एलियन्सच्या कुठल्याही संभाव्य संपर्काबाबत आधीपासूनच प्रोटोकॉल तयार करण्याची गरज आहे. आणि SETI Institute याबाबत अनेक वर्षांपासून संयुक्त राष्ट्रंची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहे. सेठ शोस्तक सांगतात एलियन्स एकदम वेगळे असतील. त्यामुळे आधीपासून आखलेली कुठलीही योजना व्यर्थ जाऊ शकते. एलियन्सजवळ आपल्यापेक्षा अधिक अद्ययावत तंत्र असेल. आमच्याकडील सर्वाच चांगल्या रॉकेटला एखाद्या ताऱ्याजवळ जाण्यासाठी एक लाख वर्षे लागू शकतात. 

टॅग्स :Earthपृथ्वीscienceविज्ञानInternationalआंतरराष्ट्रीय