शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

एलियन्सनी पृथ्वीवर हल्ला केला तर काय होणार? समोर आली धक्कादायक माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 18:10 IST

Aliens & Earth News: एलियन्स पृथ्वीवर आले तर मानव आणि त्यांच्यातील संबंध कसे असतील. तसेच एलियन्सनी पृथ्वीवर हल्ला केल्यास काय होईल, या प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहेत.

वॉशिंग्टन - अंतराळ संशोधनात होत असलेल्या प्रगतीबरोबरच एलियन्स अर्थात परग्रहवासियांबाबत असलेलं मानवाचं कुतुहल अधिकाधिक वाढत चाललं आहे. मात्र अमेरिका आणि ब्रिटनसारखे प्रगत देशही एलियन्सच्या अस्तित्वाबाबत अद्याप पूर्णपणे शोध घेऊ शकलेले नाहीत. तसेच त्यांनी एलियन्सचे अस्तित्वही नाकारलेले नाही. या देशांच्या सुरक्षा यंत्रणा यूएफओ आणि एलियन्सबाबतच्या घटनांवर लक्ष ठेवून असतात. काही काळापूर्वी बराक ओबामा यांनीही ते राष्ट्राध्यक्ष असताना यूएफओ संबंधीचे काही व्हिडीओ पाहिल्याचे मान्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर एलियन्स पृथ्वीवर आले तर मानव आणि त्यांच्यातील संबंध कसे असतील. तसेच एलियन्सनी पृथ्वीवर हल्ला केल्यास काय होईल, या प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहेत. (What would happen if aliens invaded Earth? Shocking information came to the fore)

याबाबत एका संशोधनामधून माहिती समोर आली आहे. अमेरिकेमध्ये चार दशकांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या SETI Instituteचे वरिष्ठ अॅस्ट्रोनॉमर सेठ शोस्तक यांनी एलियन आणि माणसांच्या संभाव्य चकमकीबाबत सविस्तर विवेचन केलं आहे. सेठ शोस्तक यांच्या म्हणण्यानुसार जर कधी एलियन्सनी पृथ्वीवर हल्ला केला तर माणसांकडे स्वत:च्या बचावासाठी काहीही साधन नसेल. मात्र चर्चित अॅस्ट्रोनॉमर सेठ शोस्तक यांचे असेही म्हणणे आहे की, बाहेरील जगातील कुणी माणसांविरोधात अचानक युद्ध सुरू करेल, असे कुठलेही कारण दिसून येत नाही. मात्र जर असं काही झालं तर हॉलिवूड चित्रपटांप्रमाणे मानव एलियन्सना उत्तर देऊ शकणार नाही. 

जगातील टॉप एलियन हंटर म्हणून प्रसिद्ध असलेले सेठ शोस्तक यांनी सांगितले की, जर एलियन्सनी हल्ला केला तर मानव त्यांच्या सामना करू शकणार नाही. त्यासाठी आम्ही स्वत:च जबाबदार आहोत. कारण आम्ही योग्य वेळी त्यांच्याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. शोस्तक पुढे म्हणतात की, एके दिवशी ब्रह्मांडातील कुठल्यातरी कोपऱ्यातून काही तरंग पृथ्वीवर पोहोचतील आणि एलियन्सच्या जीवनाला दुजोरा मिळेल.

SETI Institute ही अशी एक संस्था आहे जी सातत्याने एलियन्सच्या जीवनाचा शोध घेण्यासाठी आकाशातील विविध वस्तू स्कॅन करते. सेठ शोस्तक सांगतात की, अन्य ग्रहावरून पृथ्वीवर एलियन्स येणे खूप कठीण आहे. मात्र जर असं घडलं तर जगामध्ये अंधाधुंदी माजेल. मात्र संयुक्त राष्ट्रे आणि जगातील कुठलाही देश या विषयाकडे गांभीर्याने पाहत नाही आहे.

ते पुढे म्हणाले की, पृथ्वीवरून एलियन्सच्या कुठल्याही संभाव्य संपर्काबाबत आधीपासूनच प्रोटोकॉल तयार करण्याची गरज आहे. आणि SETI Institute याबाबत अनेक वर्षांपासून संयुक्त राष्ट्रंची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहे. सेठ शोस्तक सांगतात एलियन्स एकदम वेगळे असतील. त्यामुळे आधीपासून आखलेली कुठलीही योजना व्यर्थ जाऊ शकते. एलियन्सजवळ आपल्यापेक्षा अधिक अद्ययावत तंत्र असेल. आमच्याकडील सर्वाच चांगल्या रॉकेटला एखाद्या ताऱ्याजवळ जाण्यासाठी एक लाख वर्षे लागू शकतात. 

टॅग्स :Earthपृथ्वीscienceविज्ञानInternationalआंतरराष्ट्रीय