शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
8
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
9
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
10
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
11
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
12
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
13
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
14
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
15
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
16
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
18
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
19
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
20
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
Daily Top 2Weekly Top 5

"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 12:16 IST

Asim Munir News: अमेरिकेतील पाकिस्तानी समुदायाला संबोधित करताना मुनीर यांनी भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या युद्धातील पराभवाचा बदला घेतला जाईल, असा दावा केला आहे. तसेच काश्मीरबाबतही लवकरच चांगली बातमी येईल, अशी मुक्ताफळे उधळी आहेत. 

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संरक्षण दलांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून या हल्ल्याचा बदला घेतला होता. त्यानंतर पाकिस्ताननेभारताच्या आक्रमक कारवाईला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्यावर भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानमधील ११ हवाई तळांना लक्ष्य केले होते. त्यामुळे अखेरीस पाकिस्तानला युद्धविरामाची विनवणी करणे भाग पडले होते. मात्र ऑपरेशन सिंदूरमध्ये नामुष्की ओढवल्यानंतरही पाकिस्तानकडून विविध मार्गांनी आगळीक सुरूच आहे. त्यात आता अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे फिल्ड मार्शन आसिम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. अमेरिकेतील पाकिस्तानी समुदायाला संबोधित करताना मुनीर यांनी भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या युद्धातील पराभवाचा बदला घेतला जाईल, असा दावा केला आहे. तसेच काश्मीरबाबतही लवकरच चांगली बातमी येईल, अशी मुक्ताफळे उधळी आहेत. 

पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल आसिम मुनीर यांनी भारताचे तुकडे करून १९७१ च्या पराभवाचा बदला घेण्याचा दावा केला आहे, अशी माहिती पाकिस्तानी पत्रकार अजाज सय्यद यांनी वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात दिली आहे. तर आसिम मुनीर यांच्या भाषणावेळी तिथे उपस्थित असलेल्या नोमान मुगल यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही चीनसोबत मिळून भारताविरोधातील युद्ध लढलो, असे आसिम मुनीर म्हणाले. तसेच मुनीर यांनी २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहतवादी हल्ल्याला दहशतवादी हल्ला मानण्यास नकार दिला. 

यादरम्यान आसिम मुनीर यांनी सांगितले की, पाकिस्तानने भारताविरोधात पाच आघाड्यांवर लढाई लढली. त्यात सायबर वॉरफेअरचाही समावेश होता. पाकिस्तानी सायबर हल्ल्यांनी ७० टक्क्यांपर्यंत ग्रिड स्टेशन हॅक झाली होती. तसेच ती बंद करण्यात आली होती. एवढंच नाही तर पाकिस्तानचे ड्रोन गुजरात आणि दिल्लीपर्यंत पोहोचले होते. एवढंच नाही तर भारताच्या रेल्वे नेटवर्कलाही हॅक करण्यात आल्याचा दावाही आसिम मुनीर यांनी केला. 

भारताबरोबर झालेल्या संघर्षामध्ये लढण्यासाठी पाकिस्तानला चीनकडून हत्यारे आणि लष्करी उपकरणे मिळाली होती. तसेच त्यांचा पाकिस्तानने ज्याप्रकारे वापर केला, ते पाहून चीनही प्रभावीत झाला, असा दावाही आसिम मुनीर यांनी केला आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर