शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 12:16 IST

Asim Munir News: अमेरिकेतील पाकिस्तानी समुदायाला संबोधित करताना मुनीर यांनी भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या युद्धातील पराभवाचा बदला घेतला जाईल, असा दावा केला आहे. तसेच काश्मीरबाबतही लवकरच चांगली बातमी येईल, अशी मुक्ताफळे उधळी आहेत. 

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संरक्षण दलांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून या हल्ल्याचा बदला घेतला होता. त्यानंतर पाकिस्ताननेभारताच्या आक्रमक कारवाईला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्यावर भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानमधील ११ हवाई तळांना लक्ष्य केले होते. त्यामुळे अखेरीस पाकिस्तानला युद्धविरामाची विनवणी करणे भाग पडले होते. मात्र ऑपरेशन सिंदूरमध्ये नामुष्की ओढवल्यानंतरही पाकिस्तानकडून विविध मार्गांनी आगळीक सुरूच आहे. त्यात आता अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे फिल्ड मार्शन आसिम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. अमेरिकेतील पाकिस्तानी समुदायाला संबोधित करताना मुनीर यांनी भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या युद्धातील पराभवाचा बदला घेतला जाईल, असा दावा केला आहे. तसेच काश्मीरबाबतही लवकरच चांगली बातमी येईल, अशी मुक्ताफळे उधळी आहेत. 

पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल आसिम मुनीर यांनी भारताचे तुकडे करून १९७१ च्या पराभवाचा बदला घेण्याचा दावा केला आहे, अशी माहिती पाकिस्तानी पत्रकार अजाज सय्यद यांनी वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात दिली आहे. तर आसिम मुनीर यांच्या भाषणावेळी तिथे उपस्थित असलेल्या नोमान मुगल यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही चीनसोबत मिळून भारताविरोधातील युद्ध लढलो, असे आसिम मुनीर म्हणाले. तसेच मुनीर यांनी २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहतवादी हल्ल्याला दहशतवादी हल्ला मानण्यास नकार दिला. 

यादरम्यान आसिम मुनीर यांनी सांगितले की, पाकिस्तानने भारताविरोधात पाच आघाड्यांवर लढाई लढली. त्यात सायबर वॉरफेअरचाही समावेश होता. पाकिस्तानी सायबर हल्ल्यांनी ७० टक्क्यांपर्यंत ग्रिड स्टेशन हॅक झाली होती. तसेच ती बंद करण्यात आली होती. एवढंच नाही तर पाकिस्तानचे ड्रोन गुजरात आणि दिल्लीपर्यंत पोहोचले होते. एवढंच नाही तर भारताच्या रेल्वे नेटवर्कलाही हॅक करण्यात आल्याचा दावाही आसिम मुनीर यांनी केला. 

भारताबरोबर झालेल्या संघर्षामध्ये लढण्यासाठी पाकिस्तानला चीनकडून हत्यारे आणि लष्करी उपकरणे मिळाली होती. तसेच त्यांचा पाकिस्तानने ज्याप्रकारे वापर केला, ते पाहून चीनही प्रभावीत झाला, असा दावाही आसिम मुनीर यांनी केला आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर