शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

शांत बसण्यासाठी आम्ही अणुबॉम्ब बनविला नाही, पाकिस्तानी मंत्र्यांची भारताला अणुयुद्धाची धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 11:08 IST

आधी दिली धमकी नंतर...

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र संघटनेत दहशतवादावरून भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी पाकिस्तानची जोरदार धुलाई केल्यानंतर पाकिस्तानी नेत्यांचा तिळपापड झाला आहे. पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर पातळी सोडून टीका केल्यानंतर दुसऱ्या मंत्री शाजिया मर्री यांनी ‘आम्ही अणुबॉम्ब शांत बसण्यासाठी बनविला नाही,’ अशी धमकी दिली. त्यानंतर रविवारी त्यांनी बिलावल यांच्या वक्तव्याची पाठराखण केली खरी पण ‘पाक हा जबाबदार अण्वस्त्रधारी देश असल्याचे सांगून एक पाऊल मागेही घेतले.

दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पाकने भारतापेक्षा कितीतरी जास्त बलिदान दिले आहे, असे आश्चर्यकारक ट्टीट शाजिया यांनी केले आहे. ‘भारतीय प्रसार माध्यमांतील काही घटक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारतीय मंत्र्यांच्या चिथावणीखोर टिप्पण्यांना पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पाकिस्तानने भारतापेक्षा कितीतरी अधिक बलिदान दिले आहे. मोदी सरकार अतिरेकी आणि कट्टरतावादाला प्रोत्साहन देत आहे, असे त्या म्हणाल्या. 

गरज पडल्यास मागे हटणार नाही...‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे हे भारताने विसरू नये, आमची आण्विक स्थिती गप्प बसण्यासाठी नाही. गरज पडल्यास आम्ही मागे हटणार नाही.शाजिया मर्री

ओसामा बिन लादेनचा हुतात्मा म्हणून गौरव करणारा आणि झकीउर रहमान लखवी, हाफिज सईद, मसूद अझहर, साजिद मीर आणि दाऊद इब्राहिम यांसारख्या दहशतवाद्यांना आश्रय देणारा देश पाकिस्तान आहे, असे भारताने म्हटले होते.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतS. Jaishankarएस. जयशंकर