शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
2
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
3
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
4
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
5
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
6
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
7
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
8
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
9
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
10
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
11
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
12
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
13
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
14
"परीक्षेच्या चार दिवस आधी…" T20 वर्ल्ड कप तयारीच्या प्रश्नावर सूर्यानं दिला थेट शाळेचा दाखला
15
आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
16
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
17
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारने लोकसभेत दिली 'डेटलाइन'
18
करून दाखवलं! हात गमावले पण 'तो' खचला नाही; पायांनी रचला इतिहास, ११ गोल्डसह १८ मेडल्स
19
ऑस्ट्रेलियन तरुणीवर सपासप वार, वाळूत अर्ध्यापर्यंत पुरलं, भारतात पळून आला; पण अखेर सापडलाच!
20
ट्रेनमध्ये भीक मागत होती अनाथ मुलगी; गोलूने वाईट नजरेपासून वाचवलं, घरी आणलं अन् लग्नच केलं
Daily Top 2Weekly Top 5

"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 14:28 IST

Operation Sindoor : पाकिस्तानी नेत्यांनी अजब दावा करत म्हटले की, "आम्ही भारताचे १० ते २० लढाऊ विमाने पाडू शकलो असतो, पण..."

भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये तोंडघशी पडल्यानंतरही पाकिस्तान आपल्याच पाठीवर थाप मारून, देशातील जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत आहे. पाकिस्तानचे नेते नेहमीच अतिशयोक्तीपूर्ण आणि काल्पनिक दावे करून स्वतःच आपल्या देशात आणि जगात हास्याचा विषय बनत आहेत. यावेळी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ आणि माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी पुन्हा असाच एक हास्यास्पद दावा केला आहे, ज्यामुळे त्यांना त्यांच्याच देशात ट्रोल केले जात आहे.

या पाकिस्तानी नेत्यांनी एका अजब दाव्यात म्हटले आहे की, "आम्ही भारताचे १० ते २० लढाऊ विमाने पाडू शकलो असतो, पण आमच्यावर इतर देशांचा खूप दबाव होता की आम्ही त्यांची विमाने पाडू नयेत."

'टार्गेट लॉक झाले होते, पण...': ख्वाजा आसिफ यांचा अजब युक्तिवाद

स्वतःची पाठ थोपटून घेताना ख्वाजा आसिफ यांनी दावा केला की, भारताची १० फायटर जेट्स पाडण्यासाठी त्यांचे टार्गेट पूर्णपणे लॉक झाले होते. "आमचे सैनिक अशा स्थितीत होते की, ते भारताची १० विमाने पाडण्यासाठी पूर्णपणे तयार होऊन बसले होते," असे आसिफ म्हणाले.

जेव्हा पत्रकार हामिद मीर यांनी त्यांना विचारले, "जर पाडू शकला असता, तर मग का पाडले नाही?" यावर ख्वाजा आसिफ यांनी अजब उत्तर दिले, "ही आमची अंतर्गत गोष्ट आहे... पण ती माहिती तुम्हालाही माहीत आहे."

ख्वाजा आसिफ यांच्या दाव्यानुसार, पाकिस्तान त्या रात्री भारताची १२ फायटर जेट्स पाडू शकला असता, पण त्यांच्यावर २-३ देशांचा दबाव होता की, ती पाडू नयेत. त्यामुळे त्यांनी ती विमाने सोडली. यानंतर भारतानेही पाकिस्तानचे जास्त नुकसान केले नाही.

बिलावल भुट्टो यांचाही '२० जेट'चा दावा

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनीही याच प्रकारचा दावा केला. ते म्हणाले की, "पाकिस्तानी फौजेने भारताच्या २० फायटर जेट्सचे टार्गेट लॉक केले होते, पण त्यांना पाडण्यात आले नाही. फक्त ६ विमाने पाडली." ते पुढे म्हणाले, "तुम्ही विचार करा, असे का झाले असेल? कारण इतर देशांचा दबाव होता."

या दाव्यांमुळे पाकिस्तानची जगभरात पुन्हा एकदा खिल्ली उडवली जात आहे. अशा प्रकारच्या बेताल वक्तव्यांनी पाकिस्तानचे नेते स्वतःच आपल्या देशाची प्रतिमा मलिन करत आहेत, असे अनेक राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानIndiaभारत