शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

मला भारतात आणण्याचा आटापिटा निव्वळ मतांसाठी! विजय मल्ल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 05:35 IST

भारतात पुढील वर्षी निवडणूक व्हायची असल्याने मते मिळविण्यासाठी मला काहीही करून भारतात नेऊन सुळी देण्याचा आटापिटा सुरू आहे, असा दावा बँकांची नऊ हजार कोेटी रुपयांची कर्जे बुडवून परागंदा झालेल्या ‘मद्यसम्राट’ उद्योगपती विजय मल्ल्या याने केला आहे.

लंडन: भारतात पुढील वर्षी निवडणूक व्हायची असल्याने मते मिळविण्यासाठी मला काहीही करून भारतात नेऊन सुळी देण्याचा आटापिटा सुरू आहे, असा दावा बँकांची नऊ हजार कोेटी रुपयांची कर्जे बुडवून परागंदा झालेल्या ‘मद्यसम्राट’ उद्योगपती विजय मल्ल्या याने केला आहे.ब्रिटिश फॉर्म्युला वन ग्रां प्री’ मोटारींच्या शर्यतीत मल्ल्याच्या मालकीचा ‘इंडिया वन’ संघ सहभागी होत आहे. शर्यतीच्या ठिकाणी आलेल्या मल्ल्याने एका वृत्तसंस्थेस सांगितले की, भारतातील तपासी यंत्रणा मला ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ घोषित करून घेऊन माझ्या मालमत्ता जप्त करण्याची धडपड करत आहेत. पण मी पळून जाण्याचा प्रश्न येतोच कुठे? आधीपासूनच माझे वास्तव्य ब्रिटनमध्ये आहे आणि मी अनिवासी भारतीय आहे. त्यामुळे मी ब्रिटनमध्ये नाही तर दुसरीकडे कुठे जाणार? तरीही मला पळपुटा ठरविण्याचे राजकारण केले जात आहे.भारतीय बँकांनी केलेल्या अर्जावर लंडनमधील न्यायालयाने मल्ल्याच्या ब्रिटनमधील मालमत्तांची झडती घेण्यास अनुमती दिली आहे. त्याविषयी मल्ल्या म्हणाला की, ते खुशाल येऊ शकतात. पण प्रश्न असा आहे की, बँका ज्या मालमत्तांबद्दल बोलत आहेत, त्या माझ्या नाहीत. लंडनच्या ग्रामीण भागातील आलिशान बंगला माझ्या मुलांचा आहे व लंडनमधील घर आईचे आहे. या मालमत्तांना ते हातही लावू शकत नाहीत. प्रश्न राहिला ब्रिटनमधील माझ्या मालमत्तांचा. काही मोटारी व काही रत्नाभूषणे एवढेच काय ते माझ्या नावावर आहे. त्या वस्तूंची यादी मी ब्रिटनमधील कोर्टात सादर केली आहे व हव्या तेव्हा स्वत: आणून देईन, तुम्ही तसदी घेण्याचीही गरज नाही, असेही कोर्टाला लिहून दिले आहे.भारतातील थकीत कर्जे वसूल करण्यासाठी ‘सीबीआय’ व ‘ईडी’ माझ्या भारतातील मालमत्तांवरडोळा ठेवून आहेत. पण अशा दोन अब्ज डॉलरहून अधिक मालमत्तांची यादी मी कर्नाटक उच्च न्यायालयाकडे आधीच दिलेली आहे. त्या मालमत्ता कर्जे फेडूनही शिल्लक राहतील एवढ्या आहेत. त्या विकण्यास काहीच अडचण नाही. शिवायमीही पैसे उभे करण्यासाठी आणखी काही मालमत्ता विकण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे ब्रिटनमधील किंवा इतर ठिकाणच्या मालमत्ता कर्जफेडीत आणण्याचा प्रश्नच येत नाही. (वृत्तसंस्था)हा घोर अन्यायमी या मालमत्ता गुन्हेगारीच्या पैशातून उभ्या केल्याचे ‘ईडी’चे म्हणणे आहे व त्यासाठी त्यांना ‘मनी लॉड्रिंग’ कायद्याचा आधार घेतला आहे, पण हे करताना ‘ईडी’ने मला वडिलांकडून वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तांवरही टांच आणली आहे. त्यातील काही सन १९२० पासूनच्या आहेत. हा घोर अन्याय आहे.-विजय मल्ल्या, माजी ‘किंग आॅफ गूड टाइम्स’

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्याnewsबातम्या