शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

मला भारतात आणण्याचा आटापिटा निव्वळ मतांसाठी! विजय मल्ल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 05:35 IST

भारतात पुढील वर्षी निवडणूक व्हायची असल्याने मते मिळविण्यासाठी मला काहीही करून भारतात नेऊन सुळी देण्याचा आटापिटा सुरू आहे, असा दावा बँकांची नऊ हजार कोेटी रुपयांची कर्जे बुडवून परागंदा झालेल्या ‘मद्यसम्राट’ उद्योगपती विजय मल्ल्या याने केला आहे.

लंडन: भारतात पुढील वर्षी निवडणूक व्हायची असल्याने मते मिळविण्यासाठी मला काहीही करून भारतात नेऊन सुळी देण्याचा आटापिटा सुरू आहे, असा दावा बँकांची नऊ हजार कोेटी रुपयांची कर्जे बुडवून परागंदा झालेल्या ‘मद्यसम्राट’ उद्योगपती विजय मल्ल्या याने केला आहे.ब्रिटिश फॉर्म्युला वन ग्रां प्री’ मोटारींच्या शर्यतीत मल्ल्याच्या मालकीचा ‘इंडिया वन’ संघ सहभागी होत आहे. शर्यतीच्या ठिकाणी आलेल्या मल्ल्याने एका वृत्तसंस्थेस सांगितले की, भारतातील तपासी यंत्रणा मला ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ घोषित करून घेऊन माझ्या मालमत्ता जप्त करण्याची धडपड करत आहेत. पण मी पळून जाण्याचा प्रश्न येतोच कुठे? आधीपासूनच माझे वास्तव्य ब्रिटनमध्ये आहे आणि मी अनिवासी भारतीय आहे. त्यामुळे मी ब्रिटनमध्ये नाही तर दुसरीकडे कुठे जाणार? तरीही मला पळपुटा ठरविण्याचे राजकारण केले जात आहे.भारतीय बँकांनी केलेल्या अर्जावर लंडनमधील न्यायालयाने मल्ल्याच्या ब्रिटनमधील मालमत्तांची झडती घेण्यास अनुमती दिली आहे. त्याविषयी मल्ल्या म्हणाला की, ते खुशाल येऊ शकतात. पण प्रश्न असा आहे की, बँका ज्या मालमत्तांबद्दल बोलत आहेत, त्या माझ्या नाहीत. लंडनच्या ग्रामीण भागातील आलिशान बंगला माझ्या मुलांचा आहे व लंडनमधील घर आईचे आहे. या मालमत्तांना ते हातही लावू शकत नाहीत. प्रश्न राहिला ब्रिटनमधील माझ्या मालमत्तांचा. काही मोटारी व काही रत्नाभूषणे एवढेच काय ते माझ्या नावावर आहे. त्या वस्तूंची यादी मी ब्रिटनमधील कोर्टात सादर केली आहे व हव्या तेव्हा स्वत: आणून देईन, तुम्ही तसदी घेण्याचीही गरज नाही, असेही कोर्टाला लिहून दिले आहे.भारतातील थकीत कर्जे वसूल करण्यासाठी ‘सीबीआय’ व ‘ईडी’ माझ्या भारतातील मालमत्तांवरडोळा ठेवून आहेत. पण अशा दोन अब्ज डॉलरहून अधिक मालमत्तांची यादी मी कर्नाटक उच्च न्यायालयाकडे आधीच दिलेली आहे. त्या मालमत्ता कर्जे फेडूनही शिल्लक राहतील एवढ्या आहेत. त्या विकण्यास काहीच अडचण नाही. शिवायमीही पैसे उभे करण्यासाठी आणखी काही मालमत्ता विकण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे ब्रिटनमधील किंवा इतर ठिकाणच्या मालमत्ता कर्जफेडीत आणण्याचा प्रश्नच येत नाही. (वृत्तसंस्था)हा घोर अन्यायमी या मालमत्ता गुन्हेगारीच्या पैशातून उभ्या केल्याचे ‘ईडी’चे म्हणणे आहे व त्यासाठी त्यांना ‘मनी लॉड्रिंग’ कायद्याचा आधार घेतला आहे, पण हे करताना ‘ईडी’ने मला वडिलांकडून वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तांवरही टांच आणली आहे. त्यातील काही सन १९२० पासूनच्या आहेत. हा घोर अन्याय आहे.-विजय मल्ल्या, माजी ‘किंग आॅफ गूड टाइम्स’

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्याnewsबातम्या