शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

जगभर: ‘४६ तास रेल्वेत बसलो, आता घरी जाऊ द्या; बास झालं भारत दर्शन!’ व्हिक्टर ब्लाहोची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 08:29 IST

Victor Blaho videos: व्हिक्टर ब्लाहो असं त्याचं नाव. तो पर्यटक तर आहेच; पण एक यूट्यूबरसुद्धा आहे. भारतात फिरायला आला असताना ४६ तासांच्या रेल्वे प्रवासात आलेल्या अनुभवाने व्हिक्टर अक्षरशः हैराण झाला.

‘अतिथी देवो भव:’ ही आपली संस्कृती आहे, असं आपण म्हणतो; पण आपल्याकडे आलेल्या अतिथींना आपण देतो ते अनुभव खरंच तेवढे छान असतात का, असा प्रश्न आपणच आपल्याला विचारावा अशा बातम्या सध्या चहुबाजूंनी कानावर येत आहेत. पुण्यातल्या सिंहगडावर आलेल्या एका परदेशी प्रवाशाला स्थानिक लोकांनी ‘मराठी भाषा शिकवतो’ असं म्हणत चक्क शिव्या शिकवल्या. त्याबाबतचा व्हिडीओ यू-ट्यूबवर व्हायरल होताच हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं आहे. त्यानंतर आता एका फ्रेंच पर्यटकाचा अनुभव समोर आला आहे. ‘इंडियन रेल्वे’चा प्रवास आरामदायी, वेगवान आणि सुखकर असतो, असं म्हटलं जातं; पण एका फ्रेंच पर्यटकाने मात्र, ‘भारतात जाताय? मग रेल्वेचा प्रवास करु नका,’ असं थेट आवाहनच केलं आहे. 

व्हिक्टर ब्लाहो असं त्याचं नाव. तो पर्यटक तर आहेच; पण एक यूट्यूबरसुद्धा आहे. भारतात फिरायला आला असताना ४६ तासांच्या रेल्वे प्रवासात आलेल्या अनुभवाने व्हिक्टर अक्षरशः हैराण झाला. बास झालं भारत दर्शन, आपण आपलं गुपचूप आपल्या घरी परत जावं असं त्याला वाटलं. आपला हा अनुभव त्याने शेअर केला आहे आणि ‘भारतात फिरायला जाताय? सावधान...’ असा इशारा इतर परदेशी पर्यटक, प्रवाशांना दिला आहे. 

त्याबद्दलचा व्हिडीओ त्याने यूट्यूबवर अपलोड केला आहे. भारत भेटीवर आलेल्या व्हिक्टरने मुंबई ते वाराणसी, वाराणसी ते आगरा आणि आगरा ते दिल्ली असा तब्बल ४६ तासांचा रेल्वे प्रवास केला. स्लीपर कोचपासून ते थर्ड एसीपर्यंत रेल्वेच्या विविध ‘क्लास’मधून त्याने प्रवास केला. या प्रवासात काही फार सुंदर तर काही अत्यंत भयंकर अनुभव आल्याचं व्हिक्टरने म्हटलं आहे. दुर्दैवाने भयंकर अनुभवांचं पारडं अधिक जड असल्याचंही तो सांगतो.

भारतीय रेल्वेचे डबे प्रवाशांनी खचाखच भरलेले असतात. या डब्यांमध्ये नुसता कलकलाट असतो, त्यामुळे प्रवासात अजिबात शांतता मिळत नाही,’ अशी तक्रार व्हिक्टरने केली आहे. रेल्वेच्या डब्यांमध्ये उंदीर, झुरळं दिसली. त्यामुळे आता मला भारतातल्या रेल्वे प्रवासाची किळस वाटते आहे, असंही त्याने सांगितलं आहे. 

रेल्वेचा प्रवास आणि स्वच्छता यांचा दुरान्वयेही संबंध नाही. सगळीकडे कचरा असतो, त्याचा घाण वास येतो असं सांगत त्याने नाक मुरडलं आहे. उंदीर आणि झुरळं तर सोडूनच द्या; पण रात्रीच्या वेळी शांत झोपू असं म्हणून भारतात तुम्ही रेल्वेच्या प्रवासाचा पर्याय निवडत असाल तर थांबा. इथे रेल्वेच्या डब्यांमध्ये माणसं नुसती उच्च आवाजात बोलत असतात. त्यामुळे प्रचंड गोंगाट असतो. लोक सतत इकडून तिकडे चालत असतात. मी एक मिनिटही शांत झोपू शकलेलो नाही, असं व्हिक्टर त्याच्या व्हिडीओमध्ये सांगतो. 

या सगळ्या अनुभवात भर म्हणून एका स्थानिक प्रवाशाने त्याला व्हिडीओ कॉलवरून आपल्या गर्लफ्रेंडशी बोलायला लावलं. त्याच्याबरोबर फोटो काढले. सतत त्याच्याशी गप्पा मारून त्याला वैताग दिला. ‘मला या सगळ्यांचा त्रास होतोय.  मला आता शांतता हवी आहे. मला घरी जायचंय. मला शांत झोपायचंय, मला स्वच्छ बेड हवाय, कलकलाट नकोय,’ असं म्हणत व्हिक्टरने आपल्या वैतागाला वाट मोकळी करून दिली आहे.व्हिक्टरच्या या व्हिडीओवर आता भारतीयांनी टीकेची झोड उठवली आहे.

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेYouTubeयु ट्यूब