शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

व्हेनेझुएलाचं कंबरडं का मोडलं? हजारो नागरिकांनी सोडला देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 15:32 IST

गेल्या वर्षभरात या देशातील लोकांचे सरासरी ११ किलो वजन कमी झाले आहे. आता कचऱ्यामध्ये अन्न शोधून खाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

कॅराकस- तेलाचे प्रचंड साठे असणारा व्हेनेझुएला देशाची अर्थव्यवस्था एकेकाळी अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये होती मात्र आता संकटात सापडलेल्या या देशाची अवस्था अत्यंत चिंताजनक झाली आहे. १ व्या शतकाच्या पहिल्या दशकात जगातील सर्व भांडवलशाही अर्थव्यवस्थांना तोडीस तोड उत्तर देत या देशाने आपली अर्थव्यवस्था बळकट केली होती. मात्र आज या देशातील लोकांकडे पोट भरण्यासाठीही पैसे नाहीत. बेसुमार चलनवाढीमुळे साधा ब्रेड किंवा अंडे विकत घेण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागत आहे. गेल्या वर्षभरात या देशातील लोकांचे सरासरी ११ किलो वजन कमी झाले आहे. आता कचऱ्यामध्ये अन्न शोधून खाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. जिवंत राहाण्यासाठी व्हेनेझुएलाच्या नागरिकांनी शेजारच्या देशांची वाट धरली आहे. या स्थलांतरामुळे नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.

व्हेनेझुएलाचा नक्की प्रश्न काय आहे?बेसुमार चलनवाढ हा व्हेनेझुएलाचा सर्वात मोठा प्रश्न आहे. तुम्हाला आम्हाला ऐकून आश्चर्च वाटेल पण व्हेनेझुएलामध्ये सध्या चलवाढीचा दर 10 लाख टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. यापुर्वी झिम्बाब्वेने 2000 टक्क्यांचा टप्पा गाठला होता. तर 1920मध्ये जर्मनीमध्येही चलनवाढ जाली होती. मात्र हे सर्व रेकॉर्ड मोडत व्हेनेझुएलामध्ये बेसुमार चलनवाढ झाली आहे. तेलाचे दर कोसळल्यामुळे अर्थव्यवस्था पार रसातळाला गेली आहेच. इतके होऊनही व्हेनेझुएलाच्या सरकारने या चलनवाढीमागे अमेरिकेने लादलेले निर्बंध आणि विरोधकांचे कारस्थान असल्याचा आरोप केला आहे.

2014 साली तेलाचे दर कोसळल्यानंतर काय झाले?१९९९ साली ह्युगो चावेज व्हेनेझुएलाच्या सत्तेवर आले.तेव्हा जगातील सर्वात जास्त तेल साठा असणाऱ्या म्हणजे व्हेनेझुएलाच्या अर्थकारणाची दिशा ठरवण्याची संधी मिळाली. समाजवादी विचारांच्या चावेज यांनी सर्व अर्थव्यवस्था तेलावर आधारीत यार करायला घेतली. मिळालेल्या प्रत्येक पैशाचा उपयोग गरिबांसाठी करु अशा घोषणा त्यांनी केल्या. गरिबांना तशी मदत केलीही. अन्न, औषधे या सगळ्यावर सबसिडी दिली, शिष्यवृत्त्या दिल्या, जमिन सुधारणा कायदे केले. तेलामुळे आपला देश चालतोय हे लक्षात आल्यावर त्यांनी उद्योगांचे सरकारीकरण करायला घेतले. देशातील खासगी उद्योगांचे पूर्ण कंबरडे मोडून झाल्यावर तेलाच्या पैशावर सर्व वस्तू आयात करणे सुरु केले. पण तेलाच्या किंमती अस्थिर असतात,  त्या कधीही बदलू शकतात याची त्यांनी कधीच काळजी केली नाही. सत्तेत राहाण्यासाठी लोकप्रिय योजना तोटा सहन करुन सुरुच ठेवल्या. मात्र २०१३ साली चावेज यांचे कॅन्सरने निधन झाले. चावेज यांचे निधन झाल्यावर १०० डॉलरच्या वर गेलेले तेलाचे भाव पुढच्याच वर्षी कोसळले. इथेच व्हेनेझुएलाच्या संकटांना सुरुवात झाली. चावेज यांचा मृत्यू आणि तेलाच्या दराची घसरण अशी दोन संकटे या देशावर आली

अन्न आणि औषधांचा तुटवडाव्हेनेझुएलाची आयात करण्याची क्षमता अगदीच कमी झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा केवळ 50 टक्के इतकीच आयात करता आली आहे. व्हेनेझुलातील मासिक वेतन केवळ 1 डॉलर इतके घसरले आहे. त्यामुळे अगदी साध्या गरजा भागवणेही लोकांना अशक्य झाले आहे. प्रत्येक 26 दिवसांनंतर किंमती दुप्पट होतात त्यामुळे लोकांना कचऱ्याच्या डब्यांमध्ये अन्न शोधावे लागत आहेत.नवे चलनव्हेनेझुएलाने या सर्व गोंधळातच नवे चलन बाजारात आणायचे निश्चित केले. सध्या कोसळलेल्या बोलिवार या चलनामधील शेवटचे तीन शून्य काढून टाकण्याचा निर्णय निकोलस मडुरो यांनी घेतला होता. मात्र आता पाच शून्ये कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे केल्यामुळे चलनवाढीशी लढा थोडा सोपा होईल असे मडुरो यांना वाटते. पुढील महिन्यामध्ये हे 'बोलीवार सोबेरानो' नवे चलन जुन्या 1 लाख बोलिवारच्या तोडीचे असेल.

स्थलांतरितांचे लोंढेसध्या 23 लाख व्हेनेझुएलन नागरिक देशाच्या बाहेर राहात आहेत. त्यातील 16 लाख लोक 2015साली अर्थव्यवस्था घसरल्यापासून बाहेर पडलेले आहेत. या नागरिकांनी कोलंबिया, इक्वेडोर, पेरु आणि चिलीमध्ये आसरा घेतला आहे तर काही लोक ब्राझीलच्या दिशेने गेले आहेत.  यास्थलांतराचा सर्वाधीक फटका कोलंबियाला बसला आहे. कोलंबियामध्ये 8 लाख 70 हजार तर 4 लाख व्हेनेझुएलन नागरिक पेरुमध्ये आहेत. पेरुमध्ये या महिन्यात एका दिवसात 5100 स्थलांतरितांनी प्रवेश केला. या गतीने स्थलांतरित आले तर आमची अर्थव्यवस्थाही कोसळेल अशी भीती या देशांनी व्यक्त केली आहे.

गुन्ह्यांचे वाढले प्रमाणव्हेनेझुएलामध्ये गरिबी आणि बेरोजगारीमुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षात 27 हजार लोकांची अत्यंत हिंसक हत्या करण्यात आली आहे. श्रीमंत नागरिकांना हल्ल्याच्या भीतीमुळे अधिक काळजी घ्यावी लागत आहे.