शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

कॅनडाच्या भानगडीत भारतासोबतचे संबंध रसातळाला जातील; अमेरिकन राजदूताचा बायडेनना संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 15:46 IST

निज्जरची हत्या भारतीय एजंटनी केल्याचे इनपुट कॅनडाला अमेरिकेने पुरविले होते. यावरून ट्रुडो यांनी भारतावर आरोप केले होते.

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येवरून भारत आणि कॅनडामध्ये वितुष्ट आले आहे. भारतानेकॅनडाच्या अधिकाऱ्यांना भारत सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत. तर भारतीय कंपन्यांनी तेथील व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कॅनडा गुढग्यावर यायचे बाकी राहिला असून तिकडे अमेरिकेतही मोठी खळबळ उडाली आहे.

निज्जरची हत्या भारतीय एजंटनी केल्याचे इनपुट कॅनडाला अमेरिकेने पुरविले होते. यावरून ट्रुडो यांनी भारतावर आरोप केले होते. यावर भारताने त्यांच्याकडे पुरावे मागितले होते. परंतू, ट्रुडो ते देऊ शकले नाहीत. या साऱ्या प्रकरणावरून बायडेन प्रशासन दबाव वाढवू लागले आहे. यावरून अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी कॅनडाच्या भानगडीत भारतासोबत अमेरिकेचे संबंध रसातळाला जाऊ शकतात, असा इशारा दिला आहे. 

कॅनडासोबत सुरू असलेल्या राजनैतिक वादामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध काही काळासाठी रसातळाला जाऊ शकतात. अमेरिकेला भारतीय अधिकार्‍यांशी असलेले संपर्क अनिश्चित काळासाठी कमी करावे लागतील, असे गार्सेटी म्हणाले. यावरून बायडेन प्रशासनही सावध झाले आहे. भारताला वाकड्यात घेणे अमेरिकेला परवडणारे नाहीय, असे पॉलिटिकोने म्हटले आहे. 

खलिस्तानी दहशतवाद्यांबाबत भारत आणि कॅनडा यांच्यातील तणाव काही काळापासून शिगेला पोहोचला आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांनी बिनबुडाचे आरोप केल्यानंतर भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारताने 40 कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडण्यास सांगितले आहे. 

भारताच्या या कठोर भूमिकेनंतर आता कॅनडाचे पंतप्रधानांनी गुडघे टेकले आहेत आणि भारतासोबतचा वाद वाढवू इच्छित नसल्याचे सांगत आहेत. राजनैतिक वादाबाबत भारतासोबत खाजगीत चर्चा करायची आहे, असे आता कॅनडाचे परराष्ट्र मंत्री म्हणत आहेत. कॅनडा हा अमेरिकेचा नाटोतील शेजारी आहे. तर भारत चीनविरोधात अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावून लढत आहे. यामुळे अमेरिकेला हे प्रकरण खूप जड जाणार आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाCanadaकॅनडाIndiaभारत