शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

मिशन शक्ती ही काळाची गरज, अमेरिकेकडून उपग्रहविरोधी चाचणीबाबत भारताचा बचाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 17:27 IST

भारताने 27 मार्च रोजी मिशन शक्ती अभियानाद्वारे उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेत अंतराळातील उपग्रह नष्ट केला होता.

वॉशिंग्टन - भारताने 27 मार्च रोजी मिशन शक्ती अभियानाद्वारे उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेत अंतराळातील उपग्रह नष्ट केला होता. दरम्यान, भारताने केलेल्या या चाचणीबाबत नासाने नाराजी व्यक्त केली असतानाच अमेरिकेन संरक्षण मंत्रालयाने मात्र या मोहिमेबाबबत भारताचा बचाव केला आहे. अंतराळामधील धोक्यांबाबत भारत चिंतीत आहे. त्यामुळे  भारताने केलेले उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राचे परीक्षण ही काळाची गरज असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेने दिली आहे. मिशन शक्ती या चाचणीअंतर्गत अंतराळातील उपग्रह नष्ट केल्यामुळे भारत अशी क्षमता बाळगणारा अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशांनंतरचा चौथा देश बनला आहे. दरम्यान, अमेरिकेन संरक्षण खात्यातील अधिकारी जॉन ई हितेन यांनी सिनेटच्या सशस्त्र सेवा समितीसमोर भारताने केलेल्या मिशन शक्तीबाबतची माहिती मांडली. ''भारत त्याच्यासमोर अंतराळामधून उद्भवू शकणाऱ्या धोक्यांबाबत चिंतीत आहे. त्यामुळेच त्यांनी अंतराळातील उपग्रह उद्ध्वस्त करण्याची चाचणी घेतली असावी, असे त्यांनी सांगितले.  यावेळी जॉन ई हितेन यांनी भारताने केलेल्या उपग्रहविरोधी चाचणीची गरज तसेच त्यामुळे अंतराळात पसलेला कचरा याबाबतच्या प्रश्नांनाही उत्तर दिले. भारताने अंतराळातील उपग्रह उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राच्या मदतीने उद्ध्वस्त केल्यानंतर नासाने याबाबत चिंता व्यक्त केली होती. तसेच या चाचणीमुळे अंतराळात पसरलेल्या तुकड्यांमुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला धोका पोहोचेल अशी भीती व्यक्त केली होती.  

टॅग्स :Mission Shaktiमिशन शक्तीIndiaभारतUnited Statesअमेरिका