शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 19:03 IST

Piyush Goyal On Air India Plane Crash Incident: लंडनमध्ये असलेल्या पीयूष गोयल यांनी एअर इंडिया विमान अपघाताबाबत भाष्य केले.

Piyush Goyal On Air India Plane Crash Incident: १२ जून २०२५ रोजी दुपारी सुमारे दीड वाजता अहमदाबाद ते लंडन या दरम्यान जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. अहमदाबाद येथील धावपट्टीवरून उड्डाण घेतल्यावर अवघ्या ४० ते ५० सेकंदात विमान कोसळले आणि त्या विमानात प्रवास करत असलेल्या २४१ जणांचा जागीच मृत्यू झाला. परंतु, एक व्यक्ती अतिशय आश्चर्यकारकपणे या भीषण विमान अपघातातून थोडक्यात बचावली. या घटनेमुळे संपूर्ण भारतवासीयांचे मन अतिशय सुन्न झाले. जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात असतानाच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे एक विधान चर्चेत आले आहे. 

प्रचंड भीषण विमान अपघातानंतर एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणारे विमान उड्डाण केल्यानंतर लगेचच कोसळले. या बोईंग ७८७-८ विमानात एकूण २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. त्यापैकी १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते. हा अपघात नेमका कसा झाला, याबाबत अनेक संस्था माहिती घेण्याचे काम करत आहेत. या अपघाताबाबत अनेक दावेही केले जात आहे. 

‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत

पीयूष गोयल सध्या लंडन येथे आहेत. लंडनच्या क्वीन एलिझाबेथ द्वितीय सेंटर येथे इंडिया ग्लोबल फोरम कार्यक्रमात बोलताना पीयूष गोयल यांनी एअर इंडिया विमान अपघाताबाबत भाष्य केले. हे खूप दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. हे ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ आहे. हा एक अपघात आहे, असे दिसते. अर्थात, चौकशी सुरू आहे, परंतु भविष्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कठोर प्रोटोकॉल लागू करण्यासाठी हे जगाला जागे करणारे संकेत आहेत, असे पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, या भयंकर अपघातातून एकमेव प्रवासी ४५ वर्षीय विश्वास कुमार रमेश हे वाचले आहेत. ते आपत्कालीन एक्झिटजवळील सीट ११ए वर बसले होते. याबाबत बोलताना विश्वास कुमार रमेश म्हणाले की, ते विमानात ज्या ठिकाणी बसले होते तो भाग इमारतीला धडकला नाही, ज्यामुळे जमिनीवर एक अरुंद रस्ता राहिला. त्यामुळे आपत्कालीन एक्झिटचा दरवाजा उघडून त्यांना विमानातून बाहेर पडता आले.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाpiyush goyalपीयुष गोयल