शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

तणाव निवळण्यासाठी मध्यस्थी करा, पाकिस्तानची यूनो आणि रशियाला विनवणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2019 12:44 IST

भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानची पळता भुई थोडी झाली आहे.

ठळक मुद्देदक्षिण आशियामधील तणाव निवळण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनी तसेच रशियाने मध्यस्थी करावीपाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरैशी यांचे आवाहन

इस्लामाबाद - पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दील घुसून या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या जैश ए मोहम्मद्दच्या अड्ड्यांवर एअर स्ट्राइक केले होते. दरम्यान, भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानची पळता भुई थोडी झाली आहे. त्यामुळेच दक्षिण आशियामधील तणाव निवळण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनी तसेच रशियाने मध्यस्थी करावी, अशी विनवणी पाकिस्तानने केली आहे. दक्षिण आशियामधील तणाव निवळण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे महासचिव आणि रशियाने मध्यस्थी करावी, असे आवाहन पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरैशी यांनी केले आहे. तत्पूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेची भाषा करत भारतासमोर चर्चेसाठी हात पुढे केला होता. भारतील हवाई दलाने जैश ए मोहम्मदच्या बालाकोट येथील केलेल्या तळावर एअर स्ट्राइक करून हा तळ उद्ध्वस्त केला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच भारताकडून रणनीतिक आणि कुटनीतिक स्तरावर वाढवण्यात येणाऱ्या दबावामुळे पाकिस्तानची कोंडी झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मोदींनी त्याला प्रतिसाद दिला नाही.   

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकunited nationsसंयुक्त राष्ट्र संघrussiaरशिया