शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

UAE सरकारचा मोठा निर्णय, पासपोर्टवर ‘असं’ नाव असलेल्या भारतीयांना आता ‘नो एन्ट्री’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 17:03 IST

युएई सरकारनं टुरिस्टसह निरनिराळ्या प्रकारच्या व्हिसावर येणाऱ्या लोकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.

जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणीतरी लवकरच संयुक्त अरब अमिरातीला (UAE) जाण्याच्या तयारीत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. यूएई सरकारने प्रवास मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल केला आहे. नवीन निर्देशांनुसार, आता जर कोणत्याही व्यक्तीच्या पासपोर्टवर फक्त एकच नाव लिहिलेले असेल, म्हणजे आडनावाचा कॉलम रिकामा असेल, तर तो यूएईला जाऊ शकत नाही आणि तिथूनही येऊ शकत नाही.

UAE सरकारच्या निर्देशानुसार सर्व प्रवाशांच्या पासपोर्टवर नाव आणि आडनाव दोन्ही स्पष्ट असणे आवश्यक आहे. 21 नोव्हेंबरपासून यूएईनेही हा नवा नियम लागू केला आहे. यूएई सरकारचा हवाला देत एअरलाइन्स कंपनी इंडिगोनेही एक निवेदन जारी केले आहे. इंडिगोने एका निवेदनात म्हटले आहे की, "यूएई सरकारच्या सूचनेनुसार, ज्या प्रवाशांच्या पासपोर्टवर एकच नाव आहे, मग ते पर्यटक असो किंवा कोणत्याही व्हिसावर, त्यांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही."

परमनंट व्हिसा असलेल्यांना सूटजर कोणाला परमनंट व्हिसा असेल तर त्यांना त्यावर प्रवास करण्याची परवानगी असेल. यासाठी त्यांना पहिल्या आणि शेवटच्या नावाच्या कॉलममध्ये तेच नाव अपडेट करावे लागणार आहे. खलिज टाईम्सनं दिलेल्या रिपोर्टनुसार युएई सरकारनं याची घोषणा केल्यानंतर अनेकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.

आम्ही दुतावासाकडून माहिती मिळण्याची वाट पाहत आहोत. यासाठी आम्ही लोकांना व्हिसा अप्लाय करण्यापूर्वी ४८ तासांचा वाट पाहण्याचा सल्ला देत आहोत, अशी प्रतिक्रिया एका ट्रॅव्हल कंपनीच्या कर्मचाऱ्यानं खलिज टाईम्सला दिली.

टॅग्स :Indiaभारतpassportपासपोर्टUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिराती