शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान रडणार! 'दोस्त दोस्त ना रहा...'; तुर्की सख्ख्या मित्राची साथ सोडून भारताच्या वाटेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 15:56 IST

Turkey, India Tension will end soon on Kashmir Article 370: गेल्याच आठवड्याच तुर्कीचे परराष्ट्र मंत्री मेवलुथ औसुओग्लू यांनी ताजिकीस्तानमध्ये एका सम्मेलनात भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी अर्थव्यवस्था आणि व्यापारावर लक्ष देण्यासोबत द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर जोर दिला होता. ते 29 मार्चला भेटले होते. 

जम्मू-काश्मीरचा अनुच्छेद 370 रद्द केल्याने भारत आणि तुर्कस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हा तनाव आता निवळू लागला असून तुर्की पाकिस्तानची साथ सोडण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या नेतृत्वात तुर्की अफगाणिस्तानमध्ये शांतता चर्चेसाठी तयार झाला आहे. (Tensions between Indian and Turkey had heightened after Modi govt scrapped Article 370 in J&K in August 2019.)

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने 5 ऑगस्ट 2019 मध्ये काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारा अनुच्छेद 370 रद्द करून टाकला होता. यामुळे पाकिस्तान संतापला होता. याला तुर्कीनेदेखील पाठिंबा दिला होता. यामुळे तुर्की पाकिस्तानचा समर्थक असल्याचे मानले जात होते. आता भारत आणि तुर्कीमध्ये संबंध सुधारत असून हा पाकिस्तानला धक्का मानला जात आहे. 

रविवारी तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्याची निंदा केली. या आधीही  तुर्कीने अशाप्रकारे दु:ख व्यक्त केले होते. परंतू रविवारचे वक्तव्य खूप महत्वाचे आहे. कारण भारतातील अंतर्गत सुरक्षेसंबंधी घटनेवर तुर्की बोलला आहे. नक्षलवादी आणि दहशतवादी हे दोन्ही मुद्दे सारखेच आहेत. दोन्ही गट भारताविरोधात कटकारस्थाने रचत असतात. यामुळे पाकिस्तानला तुर्कीने एकप्रकारे संकेत दिले आहेत. 

गेल्याच आठवड्याच तुर्कीचे परराष्ट्र मंत्री मेवलुथ औसुओग्लू यांनी ताजिकीस्तानमध्ये एका सम्मेलनात भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी अर्थव्यवस्था आणि व्यापारावर लक्ष देण्यासोबत द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर जोर दिला होता. ते 29 मार्चला भेटले होते. नवी दिल्ली आणि अंकारामध्ये तेव्हा तणावाचे वातावरण होते. जम्मू काश्मीरचा अनुच्छेद 370 रद्द केल्याने तुर्कीचे पंतप्रधान एर्दोगन यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. तसेच पाकिस्तानसोबतच्या तणावावर तोडगा काढण्याचे वक्तव्य केले होते. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुर्कीचा नियोजित दौरा रद्द केला होता. 

फेब्रुवारी 2020 मध्ये एर्दोगन यांनी पाकिस्तान दौऱ्यावेळी काश्मीर मुद्द्याचे इस्लामाबादच्या बाजुने समर्थन केले होते. तसेच दुसऱ्या विश्वयुद्धातील आपल्या देशाच्या परिस्थितीची तुलना त्यांनी सध्याच्या काश्मीरसोबत केली होती. यावर भारताने तुर्कीला चोख प्रत्यूत्तर दिले होते. निवडणुका असल्याने असली वक्तव्ये त्यांना करावी लागतात. त्यांची स्वत:ची काहीतरी मजबुरी असेल असे भारताच्या तुर्कीतील माजी  राजदुतांनी सुनावले होते.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदी