शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पाकिस्तान रडणार! 'दोस्त दोस्त ना रहा...'; तुर्की सख्ख्या मित्राची साथ सोडून भारताच्या वाटेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 15:56 IST

Turkey, India Tension will end soon on Kashmir Article 370: गेल्याच आठवड्याच तुर्कीचे परराष्ट्र मंत्री मेवलुथ औसुओग्लू यांनी ताजिकीस्तानमध्ये एका सम्मेलनात भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी अर्थव्यवस्था आणि व्यापारावर लक्ष देण्यासोबत द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर जोर दिला होता. ते 29 मार्चला भेटले होते. 

जम्मू-काश्मीरचा अनुच्छेद 370 रद्द केल्याने भारत आणि तुर्कस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हा तनाव आता निवळू लागला असून तुर्की पाकिस्तानची साथ सोडण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या नेतृत्वात तुर्की अफगाणिस्तानमध्ये शांतता चर्चेसाठी तयार झाला आहे. (Tensions between Indian and Turkey had heightened after Modi govt scrapped Article 370 in J&K in August 2019.)

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने 5 ऑगस्ट 2019 मध्ये काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारा अनुच्छेद 370 रद्द करून टाकला होता. यामुळे पाकिस्तान संतापला होता. याला तुर्कीनेदेखील पाठिंबा दिला होता. यामुळे तुर्की पाकिस्तानचा समर्थक असल्याचे मानले जात होते. आता भारत आणि तुर्कीमध्ये संबंध सुधारत असून हा पाकिस्तानला धक्का मानला जात आहे. 

रविवारी तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्याची निंदा केली. या आधीही  तुर्कीने अशाप्रकारे दु:ख व्यक्त केले होते. परंतू रविवारचे वक्तव्य खूप महत्वाचे आहे. कारण भारतातील अंतर्गत सुरक्षेसंबंधी घटनेवर तुर्की बोलला आहे. नक्षलवादी आणि दहशतवादी हे दोन्ही मुद्दे सारखेच आहेत. दोन्ही गट भारताविरोधात कटकारस्थाने रचत असतात. यामुळे पाकिस्तानला तुर्कीने एकप्रकारे संकेत दिले आहेत. 

गेल्याच आठवड्याच तुर्कीचे परराष्ट्र मंत्री मेवलुथ औसुओग्लू यांनी ताजिकीस्तानमध्ये एका सम्मेलनात भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी अर्थव्यवस्था आणि व्यापारावर लक्ष देण्यासोबत द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर जोर दिला होता. ते 29 मार्चला भेटले होते. नवी दिल्ली आणि अंकारामध्ये तेव्हा तणावाचे वातावरण होते. जम्मू काश्मीरचा अनुच्छेद 370 रद्द केल्याने तुर्कीचे पंतप्रधान एर्दोगन यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. तसेच पाकिस्तानसोबतच्या तणावावर तोडगा काढण्याचे वक्तव्य केले होते. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुर्कीचा नियोजित दौरा रद्द केला होता. 

फेब्रुवारी 2020 मध्ये एर्दोगन यांनी पाकिस्तान दौऱ्यावेळी काश्मीर मुद्द्याचे इस्लामाबादच्या बाजुने समर्थन केले होते. तसेच दुसऱ्या विश्वयुद्धातील आपल्या देशाच्या परिस्थितीची तुलना त्यांनी सध्याच्या काश्मीरसोबत केली होती. यावर भारताने तुर्कीला चोख प्रत्यूत्तर दिले होते. निवडणुका असल्याने असली वक्तव्ये त्यांना करावी लागतात. त्यांची स्वत:ची काहीतरी मजबुरी असेल असे भारताच्या तुर्कीतील माजी  राजदुतांनी सुनावले होते.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदी