शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 11:56 IST

जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच, एक संपूर्ण देश दुसऱ्या देशात स्थलांतरित होण्याच्या तयारीत आहे.

जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच, एक संपूर्ण देश दुसऱ्या देशात स्थलांतरित होण्याच्या तयारीत आहे. प्रशांत महासागरातील लहान बेट राष्ट्र, तुवालु, हवामान बदलाच्या गंभीर परिणामांमुळे आपल्या नागरिकांना ऑस्ट्रेलियामध्ये हलवण्याची योजना आखत आहे. येत्या २५ वर्षांत तुवालु पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

काय आहे तुवालुवरचं संकट?प्रशांत महासागरात ९ प्रवाळ बेटांवर वसलेल्या या देशाची लोकसंख्या सुमारे ११,००० आहे. तुवालुची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची फक्त दोन मीटर आहे. त्यामुळे वाढती समुद्राची पातळी, पूर आणि उंच लाटांमुळे येथील लोकांचे जीवन सतत धोक्यात येत आहे.

जागतिक तापमान वाढीमुळे समुद्राची पातळी वाढत आहे आणि याचा सर्वाधिक फटका तुवालुला बसत आहे. सध्याच या देशातील दोन बेटे पाण्याखाली गेली आहेत. वैज्ञानिकांचा अंदाज आहे की, पुढील ८० वर्षांत संपूर्ण तुवालु देश समुद्रात विलीन होईल. त्यामुळे तुवालुच्या नागरिकांना आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला आहे.

ऑस्ट्रेलियाची मदतया संकटाच्या काळात ऑस्ट्रेलियाने मदतीचा हात पुढे केला आहे. तुवालु आणि ऑस्ट्रेलियाने २०२३ मध्ये 'फलेपिली करार' (Falepili Union) नावाचा एक ऐतिहासिक करार केला आहे. या करारानुसार, दरवर्षी २८० तुवालु नागरिकांना ऑस्ट्रेलियामध्ये कायमस्वरूपी निवास दिला जाईल.

या स्थलांतरित नागरिकांना ऑस्ट्रेलियामध्ये आरोग्य सेवा, शिक्षण, रोजगार आणि निवास यांसारख्या सर्व मूलभूत सुविधा व अधिकार दिले जातील. अशा प्रकारे, हवामान बदलामुळे विस्थापित झालेल्या जनतेला सुरक्षित आश्रय देणारा हा जगातील पहिलाच आंतरराष्ट्रीय करार ठरला आहे. हा करार मानवी इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाInternationalआंतरराष्ट्रीय