शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांनी फिरविली पाठ; मालदीवने चीनपुढे पसरले हात, पर्यटकांना पाठविण्यासाठी लाेटांगण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 10:41 IST

मालदीवचे राष्ट्रपती माेहम्मद माेइज्जू हे सध्या चीनच्या दाैऱ्यावर आहेत

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली/बीजिंग: मालदीवच्या माजी मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर भारतीय पर्यटकांनी त्या देशाकडे पाठ फिरविली आहे. मालदीवमध्ये जाणारे सर्वाधिक पर्यटक हे भारतीय असतात. मात्र, त्यांची संख्या काही दिवसांमध्ये घटली आहे. अशा परिस्थितीत मालदीवचे राष्ट्रपती माेहम्मद माेइज्जू यांनी चीनकडे त्यांच्या देशातील पर्यटकांना पाठविण्यासाठी अक्षरश: लाेटांगण घातले आहे.

माेइज्जू हे सध्या चीनच्या दाैऱ्यावर आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांनी नरेंद्र माेदी यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्यानंतर भारतीय पर्यटक नाराज झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत एकूण पर्यटकांची संख्या वाढली आहे. मात्र, भारतीय पर्यटकांची संख्या स्थिर आहे. यात वाढ झालेली नाही. त्यावरूनच भारतीयांचा ओढा मालदीवकडे कमी झाल्याचे दिसून येते. त्याचवेळी चिनी पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे.

चिनी पर्यटक कसे वाढणार?

  1. माेइज्जू यांनी चीनचे पंतप्रधान ली कियांग यांची भेट घेतली. चिनी पर्यटकांची संख्या कशी वाढविता येईल, याबाबत त्यांनी कियांग यांच्याशी चर्चा केली.
  2. दाेन्ही देशांमध्ये थेट विमानसेवा सुरू करण्यावर भर देण्यात आला हाेता. भारतीयांनी पाठ फिरवल्यामुळे माेइज्जू यांना चीनपुढे हात पसरावे लागत आहेत.

 

  • २७ व्या स्थानी चीनचे स्थान हाेते वर्ष २०२२ मध्ये ३ऱ्या स्थानी चीनने २०२३ मध्ये झेप घेतली.
  • १ नंबरवर भारताचे स्थान २०२२ आणि २०२३ मध्ये कायम आहे.
  • १३ टक्के घट भारतीय पर्यटकांमध्ये झाली २०२३ मध्ये.
  • १३-१४ पटीने चिनी पर्यटक वाढले.

मालदीवला जाणारे पर्यटक (वर्ष २०२३)

  • २,०३,१९८     भारतीय
  • १,८७,११८     चिनी

अनेकांचे बेत रद्द

पर्यटकांनी नव्या वर्षाच्या सुरुवातीसाठी बरेच आधीपासून बेत आखले हाेते. ते ऐनवेळी रद्द करणे शक्य नव्हते. मात्र, भविष्यातील बुकिंगमध्ये घट हाेत आहे.

यंदा किती पर्यटक गेले?

  • वाद निर्माण झाल्यानंतर नव्या वर्षात ९ जानेवारीपर्यंत ३,७९१ पर्यटक मालदीवला गेले. हा आकडा एकूण पर्यटकांच्या ७.४ टक्के आहे. 
  • गेल्या वर्षी भारतातून ३,३५६ पर्यटक मालदीवला गेले हाेते. पर्यटकांच्या आकड्यात किरकाेळ वाढ झाली असली तरी प्रमाण तेवढेच आहे.

या ठिकाणांना अधिक पसंती

थायलंड, बाली, मलेशिया, व्हिएतनाम, अल्माटी, बाकू आणि त्बिलिसी.

टॅग्स :MaldivesमालदीवchinaचीनIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान