शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

युद्धामुळे आलेले संकट मान्य नाही; भारताची संयुक्त राष्ट्रात भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 05:29 IST

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे, विशेषत: महिला आणि लहान मुलांचे नुकसान झाले आहे

संयुक्त राष्ट्रे : ‘रमजान महिन्यासाठी गाझामध्ये तत्काळ युद्धविराम करण्याची मागणी करणाऱ्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा ठराव सकारात्मक पाऊल आहे. सध्या सुरू असलेल्या इस्रायल-हमास संघर्षामुळे उद्भवलेले मानवतावादी संकट अस्वीकारार्ह आहे,’ अशी भूमिका भारताने संयुक्त राष्ट्र आमसभेत ठामपणे मांडली.

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे, विशेषत: महिला आणि लहान मुलांचे नुकसान झाले आहे. भारताने या संघर्षात नागरिकांच्या मृत्यूचा तीव्र निषेध केला आहे आणि कोणत्याही संघर्षाच्या परिस्थितीत नागरिकांची जीवितहानी टाळणे अत्यावश्यक आहे. युद्धामुळे आम्ही खूप त्रस्त आहोत, असेही संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी म्हटले आहे.

आण्विक प्रकल्पांवर हल्ल्याची धमकीइस्रायल आणि इराणमधील तणावही वाढत आहे. गेल्या आठवड्यात दमास्कसमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर आणि इराणी अधिकाऱ्यांकडून बदला घेण्याच्या धमक्यांनंतर इराणमधील आण्विक प्रकल्पांवर हल्ला करण्याचा इशारा इस्रायलने दिला आहे. इराण आगामी काळात आपल्या वतीने हल्ले करण्यास या प्रदेशातील विविध यंत्रणांना उद्युक्त करील असे सांगण्यात येते.

शपथ घेणे महागात पडेल : अमेरिकानेतन्याहू यांनी रफाह या शहरावर आक्रमण करण्याची शपथ घेतली आहे. दरम्यान, अमेरिकेने मात्र रफाहवरील आक्रमण ही घोडचूक ठरेल आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी ठोस योजना आखण्याचे आवाहन केले आहे. 

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारतwarयुद्धIsraelइस्रायल