शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

भारत-अफगाणिस्तान विमान सेवा सुरू करा, तालिबानची पत्राद्वारे भारत सरकारला मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 14:10 IST

हे पत्र 7 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तान नागरी उड्डयन प्राधिकरणाचे कार्यवाहक मंत्री हमीदुल्ला अखुंजादाने भारताच्या नागरी हवाई वाहतूक महासंचालक अरुण कुमार यांना लिहिलं आहे.

काबुल: 15 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानवर सत्ता मिळवल्यानंतर भारताने भारत-अफगाणिस्तान विमान सेवा बंद केली होती. पण, आता तालिबान सरकारने अफगाणिस्तान आणि भारतादरम्यान ही विमान सेवा पुन्हा सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, तालिबानने या प्रकरणी भारत सरकारला पत्रही लिहिलं आहे. हे पत्र 7 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तान नागरी उड्डयन प्राधिकरणाचे कार्यवाह हमीदुल्ला अखुंजादा यांनी भारताच्या नागरी उड्डयन महासंचालनालयाचे (डीजीसीए) अरुण कुमार यांना लिहिलं होतं. नागरी उड्डयन मंत्रालय या पत्रावर विचार करत आहे.

पत्रात काय लिहिलं ?

अखुंजादाने डीजीसीएला लिहीलेल्या पत्रात म्हटलं की, ''काही दिवसांपूर्वी अमेरिकन सैन्याने काबूल विमानतळ खराब आणि अक्षम केलं होतं. परंतु आमचा मित्र देश कतारच्या तांत्रिक सहाय्याने हे विमानतळ पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात आलं आहे. 6 नोव्हेंबर 2021 रोजी या संदर्भात नोटम (एअरमनना नोटीस) जारी करण्यात आली आहे. त्यामुळे भारताने भारत-अफगाणिस्तान विमान सेवा पुन्हा सुरू करावी."

भारताने तालिबानला मान्यता दिलेली नाही

तालिबानच्या अंतरिम सरकारला भारताने अद्याप मान्यता दिलेली नाही. मात्र, दोहामध्ये कतारमधील भारताचे राजदूत दीपक मित्तल आणि तालिबान नेते शेर मोहम्मद अब्बास स्टँकझाई यांची भेट झाली आहे. अमेरिकन सैन्य गेल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला. नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताकडून काबूलला शेवटचे विमान 21 ऑगस्ट रोजी उडाले होते. एअर इंडियाच्या विमानाने प्रथम दुशान्बे आणि नंतर नवी दिल्लीला उड्डाण केले.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान