शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

भारत-अफगाणिस्तान विमान सेवा सुरू करा, तालिबानची पत्राद्वारे भारत सरकारला मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 14:10 IST

हे पत्र 7 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तान नागरी उड्डयन प्राधिकरणाचे कार्यवाहक मंत्री हमीदुल्ला अखुंजादाने भारताच्या नागरी हवाई वाहतूक महासंचालक अरुण कुमार यांना लिहिलं आहे.

काबुल: 15 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानवर सत्ता मिळवल्यानंतर भारताने भारत-अफगाणिस्तान विमान सेवा बंद केली होती. पण, आता तालिबान सरकारने अफगाणिस्तान आणि भारतादरम्यान ही विमान सेवा पुन्हा सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, तालिबानने या प्रकरणी भारत सरकारला पत्रही लिहिलं आहे. हे पत्र 7 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तान नागरी उड्डयन प्राधिकरणाचे कार्यवाह हमीदुल्ला अखुंजादा यांनी भारताच्या नागरी उड्डयन महासंचालनालयाचे (डीजीसीए) अरुण कुमार यांना लिहिलं होतं. नागरी उड्डयन मंत्रालय या पत्रावर विचार करत आहे.

पत्रात काय लिहिलं ?

अखुंजादाने डीजीसीएला लिहीलेल्या पत्रात म्हटलं की, ''काही दिवसांपूर्वी अमेरिकन सैन्याने काबूल विमानतळ खराब आणि अक्षम केलं होतं. परंतु आमचा मित्र देश कतारच्या तांत्रिक सहाय्याने हे विमानतळ पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात आलं आहे. 6 नोव्हेंबर 2021 रोजी या संदर्भात नोटम (एअरमनना नोटीस) जारी करण्यात आली आहे. त्यामुळे भारताने भारत-अफगाणिस्तान विमान सेवा पुन्हा सुरू करावी."

भारताने तालिबानला मान्यता दिलेली नाही

तालिबानच्या अंतरिम सरकारला भारताने अद्याप मान्यता दिलेली नाही. मात्र, दोहामध्ये कतारमधील भारताचे राजदूत दीपक मित्तल आणि तालिबान नेते शेर मोहम्मद अब्बास स्टँकझाई यांची भेट झाली आहे. अमेरिकन सैन्य गेल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला. नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताकडून काबूलला शेवटचे विमान 21 ऑगस्ट रोजी उडाले होते. एअर इंडियाच्या विमानाने प्रथम दुशान्बे आणि नंतर नवी दिल्लीला उड्डाण केले.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान