शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
3
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
4
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
5
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
6
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
7
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
8
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
9
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
10
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
11
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

भारत-अफगाणिस्तान विमान सेवा सुरू करा, तालिबानची पत्राद्वारे भारत सरकारला मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 14:10 IST

हे पत्र 7 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तान नागरी उड्डयन प्राधिकरणाचे कार्यवाहक मंत्री हमीदुल्ला अखुंजादाने भारताच्या नागरी हवाई वाहतूक महासंचालक अरुण कुमार यांना लिहिलं आहे.

काबुल: 15 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानवर सत्ता मिळवल्यानंतर भारताने भारत-अफगाणिस्तान विमान सेवा बंद केली होती. पण, आता तालिबान सरकारने अफगाणिस्तान आणि भारतादरम्यान ही विमान सेवा पुन्हा सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, तालिबानने या प्रकरणी भारत सरकारला पत्रही लिहिलं आहे. हे पत्र 7 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तान नागरी उड्डयन प्राधिकरणाचे कार्यवाह हमीदुल्ला अखुंजादा यांनी भारताच्या नागरी उड्डयन महासंचालनालयाचे (डीजीसीए) अरुण कुमार यांना लिहिलं होतं. नागरी उड्डयन मंत्रालय या पत्रावर विचार करत आहे.

पत्रात काय लिहिलं ?

अखुंजादाने डीजीसीएला लिहीलेल्या पत्रात म्हटलं की, ''काही दिवसांपूर्वी अमेरिकन सैन्याने काबूल विमानतळ खराब आणि अक्षम केलं होतं. परंतु आमचा मित्र देश कतारच्या तांत्रिक सहाय्याने हे विमानतळ पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात आलं आहे. 6 नोव्हेंबर 2021 रोजी या संदर्भात नोटम (एअरमनना नोटीस) जारी करण्यात आली आहे. त्यामुळे भारताने भारत-अफगाणिस्तान विमान सेवा पुन्हा सुरू करावी."

भारताने तालिबानला मान्यता दिलेली नाही

तालिबानच्या अंतरिम सरकारला भारताने अद्याप मान्यता दिलेली नाही. मात्र, दोहामध्ये कतारमधील भारताचे राजदूत दीपक मित्तल आणि तालिबान नेते शेर मोहम्मद अब्बास स्टँकझाई यांची भेट झाली आहे. अमेरिकन सैन्य गेल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला. नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताकडून काबूलला शेवटचे विमान 21 ऑगस्ट रोजी उडाले होते. एअर इंडियाच्या विमानाने प्रथम दुशान्बे आणि नंतर नवी दिल्लीला उड्डाण केले.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान