शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर श्रीलंका! चीन-जपानच्या अब्जावधी डॉलर्सचं काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 16:47 IST

आर्थिक संकटात अडकलेल्या या देशाने, आपण काही दिवसांसाठी दुसऱ्या देशांकडून घेतलेले 5,100 कोटी डॉलरचे कर्ज फेडू शकणार नाही, असे म्हटले आहे.

श्रीलंकेतील आर्थिक संकट (Sri Lanka Economic Crisis) सातत्याने वाढताना दिसत आहे. आता तर, आर्थिक संकटात अडकलेल्या या देशाने, आपण काही दिवसांसाठी दुसऱ्या देशांकडून घेतलेले 5,100 कोटी डॉलरचे कर्ज फेडू शकणार नाही, असे म्हटले आहे. कारण, इंटरनॅशनल मॉनेटरी फंडकडून (IMF) श्रीलंकेला बेलआउट पॅकेज मिळू शकलेले नाही. श्रीलंकेचे ट्रेझरी सेक्रेटरी महिंद्रा सिरीवर्दने यांनी मंगळवारी ही घोषणा केली.

यासंदर्भात, श्रीलंकेच्या अर्थमंत्रालयाने कर्ज दिलेल्या देशांच्या सरकारांना आणि इतर कर्जदारांना, मंगळवारनंतर जे व्याज देय आहे, त्यासाठी एक तर काही काळ वाट पाहावी लागेल अथवा श्रीलंकन रुपयांत पेमेंट स्वीकारावे लागेल, असे सांगितले आहे.

आयएमएफसोबत सुरू राहील चर्चा -याच वेळी, बेलआउट पॅकेजसंदर्भात आयएमएफसोबत चर्चा सुरूच राहील, असे श्रीलंकन सरकारने म्हटले आहे. याशिवाय, श्रीलंकन सरकारने इतर देशांकडूनही द्विपक्षीय सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. यातच, देशाकडे असलेले सध्याचे परकीय चलन जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीसाठी वापरले जाईल, असे श्रीलंकेच्या सेंट्रल बँकेचे नवे गव्हर्नर नंदलाल वीरसिंघे यांनी म्हटले आहे.

श्रीलंकेवर कुणाचे किती कर्ज - श्रीलंकेवर असलेल्या एकूण कर्जाचा विचार करता, लंकेने 47 टक्के कर्ज बाजारातून घेतले आहे. तर चीनकडून सुमारे 15 टक्के, आशियाई विकास बँकेकडून 13 टक्के, जागतिक बँकेकडून 10 टक्के, जपानकडून 10 टक्के आणि भारताकडून 2 टक्के एवढे कर्ज घेतले आहे.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाEconomyअर्थव्यवस्थाchinaचीनJapanजपानIndiaभारत