शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

Sri Lanka Crisis : संकटात श्रीलंका, भारताच्या मदतीनं बदलतंय जीवन; आतापर्यंत 'इतक्या' कोटींची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 17:17 IST

Sri Lanka Crisis : आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेसाठी आता भारत धावून गेला आहे. कोट्यवधींच्या केलेल्या मदतीमुळे आता लोकांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मदत मिळत आहे.

भारताचा शेजारी देश श्रीलंका (Sri Lanka Crisis) सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. तसंच श्रीलंकेवर दिवाळखोरीचा मोठ्या प्रमाणावर धोकाही आहे. चलनाचे मूल्य घसरल्याने अनेक महत्त्वाच्या वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. लोक डिझेल-पेट्रोल (Diesel-Petrol), गॅस (Gas) खरेदीसाठी लांबच लांब रांगा लावताना दिसत आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की सरकारला पेट्रोल पंपांवर सैन्याची तैनाती करावी लागले आहे. अशा भीषण परिस्थितीत श्रीलंकेला मदत करण्यासाठी भारत पुढे आला आहे. भारताच्या मदतीने श्रीलंकेतील लोकांना दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी मदत मिळतेय.

भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. भारताने श्रीलंकेला जी ५०० मिलिन डॉलर्सची लाईन ऑफ क्रेडिटची (LoC) मदत केली आहे. त्यामुळे लोकांच्या गरजा पूर्ण होण्यास मदत मिळत आहे, असं त्यांनी नमूद केलंय. आपण सेंट्र कोलंबोच्या सेट्रल परिसरातील (Downtown Colombo) इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर पोहोचलो. एमडी मनोज गुप्ता यांनी इंधनाच्या पुरवठ्याच्या स्थितीबाबत माहिती दिली, असंही जयशंकर म्हणाले. ते मालदीवच्या दौऱ्यानंतर आता श्रीलंकेच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत.पेट्रोल पंपावर लष्करइंधन खरेदीसाठी रांगेत उभे असलेल्या काही लोकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त गेल्या आठवड्यात समोर आलं होतं. सध्या श्रीलंकेत पेट्रोल डिझेलचे दर वाढण्यासोबतच योग्य पुरवठाही होत नसल्यानं पेट्रोल पंपांवर मोठा रांगा पाहायला मिळत आहेत. हजारो लोक तासनतास रांगेत उभं राहून इंधन खरेदी करत आहेत. "अनेक तासांपर्यंत रांगेत उभं रागिल्यानंतर तीन ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूच्या झालेल्या घटनेपश्चात पेट्रोल पंपांवर लष्कर तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे," अशी माहिती श्रीलंकन लष्कराचे प्रवक्ते निलांखा प्रेमारत्ने यांनी दिली.

सध्या श्रीलंकेतील परिस्थिती इतकी भीषण झाली आहे की अन्नधान्यासह अनेक आवश्यक वस्तूंची कमतरता भासत आहे. इतकंच नाही तर सरकारसमोर आर्थिक आणीबाणी लावण्याची परिस्थिती उद्भ्वताना दिसतेय. श्रीलंकेचं परकीय चलनही संपण्याच्या मार्गावर आणि चलनाचं मूल्यही विक्रमी घसरलंय. याशिवाय देशात तांदूळ आणि साखरेचीही कमतरता निर्माण झाली आहे. त्यातच साठेबाजांचाही प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाIndiaभारतS. Jaishankarएस. जयशंकर