शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

Sri Lanka Crisis : संकटात श्रीलंका, भारताच्या मदतीनं बदलतंय जीवन; आतापर्यंत 'इतक्या' कोटींची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 17:17 IST

Sri Lanka Crisis : आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेसाठी आता भारत धावून गेला आहे. कोट्यवधींच्या केलेल्या मदतीमुळे आता लोकांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मदत मिळत आहे.

भारताचा शेजारी देश श्रीलंका (Sri Lanka Crisis) सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. तसंच श्रीलंकेवर दिवाळखोरीचा मोठ्या प्रमाणावर धोकाही आहे. चलनाचे मूल्य घसरल्याने अनेक महत्त्वाच्या वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. लोक डिझेल-पेट्रोल (Diesel-Petrol), गॅस (Gas) खरेदीसाठी लांबच लांब रांगा लावताना दिसत आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की सरकारला पेट्रोल पंपांवर सैन्याची तैनाती करावी लागले आहे. अशा भीषण परिस्थितीत श्रीलंकेला मदत करण्यासाठी भारत पुढे आला आहे. भारताच्या मदतीने श्रीलंकेतील लोकांना दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी मदत मिळतेय.

भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. भारताने श्रीलंकेला जी ५०० मिलिन डॉलर्सची लाईन ऑफ क्रेडिटची (LoC) मदत केली आहे. त्यामुळे लोकांच्या गरजा पूर्ण होण्यास मदत मिळत आहे, असं त्यांनी नमूद केलंय. आपण सेंट्र कोलंबोच्या सेट्रल परिसरातील (Downtown Colombo) इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर पोहोचलो. एमडी मनोज गुप्ता यांनी इंधनाच्या पुरवठ्याच्या स्थितीबाबत माहिती दिली, असंही जयशंकर म्हणाले. ते मालदीवच्या दौऱ्यानंतर आता श्रीलंकेच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत.पेट्रोल पंपावर लष्करइंधन खरेदीसाठी रांगेत उभे असलेल्या काही लोकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त गेल्या आठवड्यात समोर आलं होतं. सध्या श्रीलंकेत पेट्रोल डिझेलचे दर वाढण्यासोबतच योग्य पुरवठाही होत नसल्यानं पेट्रोल पंपांवर मोठा रांगा पाहायला मिळत आहेत. हजारो लोक तासनतास रांगेत उभं राहून इंधन खरेदी करत आहेत. "अनेक तासांपर्यंत रांगेत उभं रागिल्यानंतर तीन ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूच्या झालेल्या घटनेपश्चात पेट्रोल पंपांवर लष्कर तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे," अशी माहिती श्रीलंकन लष्कराचे प्रवक्ते निलांखा प्रेमारत्ने यांनी दिली.

सध्या श्रीलंकेतील परिस्थिती इतकी भीषण झाली आहे की अन्नधान्यासह अनेक आवश्यक वस्तूंची कमतरता भासत आहे. इतकंच नाही तर सरकारसमोर आर्थिक आणीबाणी लावण्याची परिस्थिती उद्भ्वताना दिसतेय. श्रीलंकेचं परकीय चलनही संपण्याच्या मार्गावर आणि चलनाचं मूल्यही विक्रमी घसरलंय. याशिवाय देशात तांदूळ आणि साखरेचीही कमतरता निर्माण झाली आहे. त्यातच साठेबाजांचाही प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाIndiaभारतS. Jaishankarएस. जयशंकर