शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

Sri Lanka Crisis : संकटात श्रीलंका, भारताच्या मदतीनं बदलतंय जीवन; आतापर्यंत 'इतक्या' कोटींची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 17:17 IST

Sri Lanka Crisis : आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेसाठी आता भारत धावून गेला आहे. कोट्यवधींच्या केलेल्या मदतीमुळे आता लोकांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मदत मिळत आहे.

भारताचा शेजारी देश श्रीलंका (Sri Lanka Crisis) सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. तसंच श्रीलंकेवर दिवाळखोरीचा मोठ्या प्रमाणावर धोकाही आहे. चलनाचे मूल्य घसरल्याने अनेक महत्त्वाच्या वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. लोक डिझेल-पेट्रोल (Diesel-Petrol), गॅस (Gas) खरेदीसाठी लांबच लांब रांगा लावताना दिसत आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की सरकारला पेट्रोल पंपांवर सैन्याची तैनाती करावी लागले आहे. अशा भीषण परिस्थितीत श्रीलंकेला मदत करण्यासाठी भारत पुढे आला आहे. भारताच्या मदतीने श्रीलंकेतील लोकांना दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी मदत मिळतेय.

भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. भारताने श्रीलंकेला जी ५०० मिलिन डॉलर्सची लाईन ऑफ क्रेडिटची (LoC) मदत केली आहे. त्यामुळे लोकांच्या गरजा पूर्ण होण्यास मदत मिळत आहे, असं त्यांनी नमूद केलंय. आपण सेंट्र कोलंबोच्या सेट्रल परिसरातील (Downtown Colombo) इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर पोहोचलो. एमडी मनोज गुप्ता यांनी इंधनाच्या पुरवठ्याच्या स्थितीबाबत माहिती दिली, असंही जयशंकर म्हणाले. ते मालदीवच्या दौऱ्यानंतर आता श्रीलंकेच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत.पेट्रोल पंपावर लष्करइंधन खरेदीसाठी रांगेत उभे असलेल्या काही लोकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त गेल्या आठवड्यात समोर आलं होतं. सध्या श्रीलंकेत पेट्रोल डिझेलचे दर वाढण्यासोबतच योग्य पुरवठाही होत नसल्यानं पेट्रोल पंपांवर मोठा रांगा पाहायला मिळत आहेत. हजारो लोक तासनतास रांगेत उभं राहून इंधन खरेदी करत आहेत. "अनेक तासांपर्यंत रांगेत उभं रागिल्यानंतर तीन ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूच्या झालेल्या घटनेपश्चात पेट्रोल पंपांवर लष्कर तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे," अशी माहिती श्रीलंकन लष्कराचे प्रवक्ते निलांखा प्रेमारत्ने यांनी दिली.

सध्या श्रीलंकेतील परिस्थिती इतकी भीषण झाली आहे की अन्नधान्यासह अनेक आवश्यक वस्तूंची कमतरता भासत आहे. इतकंच नाही तर सरकारसमोर आर्थिक आणीबाणी लावण्याची परिस्थिती उद्भ्वताना दिसतेय. श्रीलंकेचं परकीय चलनही संपण्याच्या मार्गावर आणि चलनाचं मूल्यही विक्रमी घसरलंय. याशिवाय देशात तांदूळ आणि साखरेचीही कमतरता निर्माण झाली आहे. त्यातच साठेबाजांचाही प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाIndiaभारतS. Jaishankarएस. जयशंकर