शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
4
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
5
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
6
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
7
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
8
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
9
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
10
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
11
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
12
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
13
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
14
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
15
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
16
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
17
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
18
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
19
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
20
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा

...म्हणून फिनलंड जगात सर्वाधिक आनंदी देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 12:40 IST

Finland News: भारताचा १९४९ पासूनचा मित्र फिनलंड मागील आठ वर्षांपासून ‘हॅप्पी इंडेक्स’च्या यादीत पहिल्या क्रमांकावर तर भारत ११८ व्या क्रमांकावर आहे. भारत आणि फिनलंड यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधावर ‘लोकमत’चे विशेष प्रतिनिधी चंद्रशेखर बर्वे यांनी फिनलंडचे राजदूत किम्मो लाह्देविर्ता यांच्याशी चर्चा केली.

भारताचा १९४९ पासूनचा मित्र फिनलंड मागील आठ वर्षांपासून ‘हॅप्पी इंडेक्स’च्या यादीत पहिल्या क्रमांकावर तर भारत ११८ व्या क्रमांकावर आहे. भारत आणि फिनलंड यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधावर ‘लोकमत’चे विशेष प्रतिनिधी चंद्रशेखर बर्वे यांनी फिनलंडचे राजदूत किम्मो लाह्देविर्ता यांच्याशी चर्चा केली.  

जगातील सर्वाधिक आनंदी देश कसे होता येते, हे भारताला सांगाल काय?    उत्तर : हॅपी इंडेक्समध्ये भारताच्या स्थानाबाबत मी भाष्य करू शकणार नाही. परंतु, फिनलंडचे सांगतो. ‘आनंदी’ हा शब्दच दिशाभूल करणारा आहे. आम्ही लहान-लहान गोष्टीत आनंद माणनारे आहोत. एकमेकांवरचा विश्वास, समानता, सुरक्षा आणि निसर्गासोबतचा एकरूपपणा उच्च दर्जाचा आहे. कदाचित हेच जगातील सर्वाधिक आनंदी देश होण्याचे रहस्य असावे.  

भारत-फिनलंडच्या मैत्रीबाबत काय सांगाल? उत्तर : दोन्ही देश डिजिटलायझेशन, एज्युकेशन, सस्टेनेबलिटी, इनोवेशन आणि मोबिलिटी या ‘देसी प्लस एम’च्या सूत्रावर काम करीत आहे. सोबतच, ‘६-जी’, उच्च कार्यक्षमतेचे संगणक आणि अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देवाणघेवाण सुरू आहे.

फिनलंडमध्ये राहणाऱ्या भारतीयांबाबत आपणास  काय वाटतं?  उत्तर :  आमच्या देशात मराठी माणसांसह २० हजार भारतीय राहतात. त्यांनी केवळ आपलं भारतीयत्व जपलं नाही, तर फिनिश संस्कृतीशीही जुळवून घेतले आहे.

छोट्या अणुभट्टीच्या निर्मितीवर काय चर्चा सुरू आहे? उत्तर : स्वच्छ ऊर्जा महत्त्वाची आहे. आण्विक कचऱ्याची विल्हेवाट लावणेही गरजेचे आहे. ही व्यवस्था करणारा फिनलंड जगातील पहिला देश होय. फिनलंड कार्बन न्युट्रलिटीचे लक्ष्य २०३५ पर्यंत साध्य करणार आहे. 

फिनलंडला रशियाच्या हल्ल्याची भीती वाटते काय? उत्तर : रशियाच्या युक्रेनवरील आक्रमक हल्ल्यानंतर युरोपातील वातावरण बदलले आहे. याच कारणामुळे फिनलंड नाटोचा सदस्य बनला आहे. मात्र, रशियातीत घडामोडींवर आमचे बारीक लक्ष आहे.

भारताने पुढाकार घेतला, तररशिया-युक्रेन युद्ध थांबणार काय? उत्तर : याचे उत्तर मला देता येणार नाही. परंतु, भारताचे दोन्ही देशांसोबत चांगले संबध आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतरही रशिया-युक्रेन का थांबले नसावे?  उत्तर : कदाचित युद्ध थांबावे असे रशियालाच वाटत नसावे. मात्र, युद्ध थांबले पाहिजे, असे आम्हाला वाटते.  

भारत-पाकिस्तानातील तणावाकडे आपण कसे पाहता ? उत्तर : दहशतवाद कोणत्याही स्वरूपात मान्य नाही. आपल्या नागरिकांचा बचाव करणे आणि दहशतवाद्यांना शिक्षा देणे हा प्रत्येक देशाचा अधिकार आणि कर्तव्य आहे.

टॅग्स :finlandफिनलंडIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय