शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

बांगलादेशी टकावर शेख मुजीबुर रहमान यांचा फोटो; नोटांवर बंदी येणार? मनी एक्स्चेंजर्स चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 17:54 IST

Bangladesh Taka : बांगलादेशच्या टका चलनावरही बंगबंधूं शेख मुजीबुर रेहमान यांचा फोटो आहे, त्यामुळं येथील नवीन सरकार नोट बदलणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात अराजकता पसरली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या दोन महिन्यांपासून हिंसाचार सुरू होता. ही परिस्थिती अखेर नियंत्रणाबाहेर गेल्यामुळं शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत बांगलादेशातून पळ काढला आहे. यानंतर आक्रमक झालेल्या आंदोलकांनी बांगलादेशच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या आणि शेख हसीना यांचे वडील असलेल्या शेख मुजीबुर रहमान यांचा पुतळाही सोडला नाही. आंदोलकांनी ढाका येथील बंगबंधू शेख मुजीबुर रेहमान यांच्या पुतळ्याची तोडफोड केली.

बांगलादेशचे राष्ट्रपिता म्हणून ओळख असलेले शेख मुजीबुर रेहमान यांच्या पुतळ्यावर चढून आंदोलकांनी हातोडा मारून मोडतोड केली. शेख मुजीबुर रेहमान यांनी बांगलादेशासाठी पाकिस्तानविरोधात सशस्त्र लढा दिला होता. त्यांच्या या लढ्यामुळे बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, आता आपल्याच देशात शेख मुजीबुर रहमान यांच्याबद्दलच्या अशा द्वेषानं जगाला धक्का बसला. या घटनेमुळं अनेक प्रश्न निर्माण झाले. आता बांगलादेशच्या टका चलनावरही बंगबंधूं शेख मुजीबुर रेहमान यांचा फोटो आहे, त्यामुळं येथील नवीन सरकार नोट बदलणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. जास्तकरून नोटा बदलण्याची चिंता भारत-बांगलादेश सीमेवर असलेल्या पैशांची देवाणघेवाण करणाऱ्या लोकांमध्ये आहे. 

एका अंदाजानुसार, भारतातील मनी एक्स्चेंज व्यापाऱ्यांकडे करोडो टका आहेत, ज्याची ते कमिशनने देवाणघेवाण करतात. सध्या दोन्ही देशांमधील सीमेवरील व्यापार ठप्प असून, टका बदलून रुपयाची देवाणघेवाण करणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. मात्र, बांगलादेश-भारत सीमेवरील मनी एक्स्चेंजर्स बांगलादेशमध्ये होत असलेल्या राजकीय गोंधळामुळे चिंतेत आहेत. मनी एक्सचेंजर्स टकाचे भारतीय चलनात आणि रुपयाचे बांगलादेशी चलन टकामध्ये रूपांतर करतात. त्यांचा व्यवसाय १०० रुपयांच्या बदल्यात ७० टका अशा हिशोबाने चालतो. मात्र गेल्या पाच दिवसांपासून त्यांचा व्यवसाय ठप्प आहे.

पेट्रापोल सीमेवर व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, ज्या प्रकारे टेलीव्हिजनवर शेख मुजीबुर रेहमान यांचा पुतळा पाडताना पाहत आहेत, त्यावरून असे दिसतं की, येणारं नवीन सरकार टकावर बंदी घालेल. दरम्यान, गौरांगा घोष या व्यावसायिकाने सांगितले की, सोमवारपासून त्यांच्या दुकानात कोणीही चलन बदलण्यासाठी आलेले नाही. पूर्वी रोज ७०-८० लोक यायचे, गेल्या चार दिवसांत एक ग्राहक आला. नोटा बदलून न दिल्याने उत्पन्न थांबले असतानाच, तोट्याची भीती सतावू लागली आहे. आता व्यावसायिकांना बांगलादेश टका लवकरात लवकर संपवायचा आहे.

पेट्रापोल क्लिअरिंग एजंट्स स्टाफ वेल्फेअर असोसिएशनचे सचिव कार्तिक चक्रवर्ती यांनी लँड पोर्ट ऑथॉरिटी आणि सीमा सुरक्षा दलाच्या परवानगीनंतर दोन्ही देशांमधील व्यापार लवकरच सुरू होऊ शकेल, अशी शक्यता व्यक्त केली आहे. सीमेवर उभ्या असलेल्या ट्रकची ये-जा सुरू झाली, तर चलन विनिमय करणाऱ्या लोकांची चिंता दूर होईल. बांगलादेशात जाणारे भारतीय व्यापारी खरेदीसाठी टका घेतात. तसेच, छोट्या गरजांसाठी ट्रकवाले बांगलादेशी चलनही घेतात.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीयNote Banनोटाबंदी