शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

...तर माझं नाव बदलून टाका; शहबाज शरीफ यांनी केली पाकिस्तान-भारताची तुलना, वास्तव काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 15:32 IST

पाकिस्तानात बेरोजगारीची मोठी समस्या आहे. २०२३ मध्ये पाकिस्तानात बेरोजगारी दर २२ टक्के होता. २०२०-२१ मध्ये हा दर ६.३ टक्के होता.

नवी दिल्ली - जर पाकिस्तानने विकासाच्या बाबतीत भारताला मागे सोडलं नाही तर माझं नाव बदलेन असा दावा पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केला आहे. देशातील जनतेला खुश करण्यासाठी कदाचित शहबाज यांनी हे विधान केले असावे परंतु वास्तव पाहिले तर हे चित्र फार दूर आहे. भारताला मागे टाकण्याचा चंग बांधणाऱ्या पाकिस्तानी पंतप्रधानांनी आधी त्यांच्या देशातील स्थितीवर लक्ष द्यायला हवं असा शहबाज शरीफ यांचं विधान ऐकून प्रत्येकजण बोलत आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्या विकासात काय फरक?

पाकिस्तान आणि भारत हे दोन्ही देश एकमेकांचे शेजारी आहेत परंतु त्यांच्या अर्थव्यवस्था आणि विकासात मोठी तफावत असल्याचं दिसून येते. २०२४ ची पाकिस्तानी जीडीपी सांगायचं झाल्यास १.६५९ ट्रिलियन डॉलर आहे. या वर्षी २०२५ मध्ये ती १.७३६ ट्रिलियनपर्यंत पोहचण्याची अपेक्षा आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये वर्ल्ड इकोनॉमी आऊटलूकमध्ये हे आकडे दिलेत. दुसरीकडे भारताचा जीडीपी २०२४ मध्ये १४.५९४ ट्रिलियन डॉलर आहे. २०२५ मध्ये जीडीपी दर १५.५४१ ट्रिलियनपर्यंत जाण्याची शक्यता आहे. जर सामान्य जीडीपी पाहिला तर भारत ४.१३६ ट्रिलियन अमेरिकन डॉलर तर पाकिस्तान ०.३४१ ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतका आहे. भारताची अर्थव्यवस्था पाकिस्तानच्या १२ पट अधिक आहे.

पाकिस्तानात बेरोजगारीची मोठी समस्या आहे. २०२३ मध्ये पाकिस्तानात बेरोजगारी दर २२ टक्के होता. २०२०-२१ मध्ये हा दर ६.३ टक्के होता. १५ ते २४ वर्षातील युवकांची बेरोजगारी २९ टक्के इतकी आहे. १६ मिलियनपेक्षा अधिक युवक ना नोकरी करतात ना कुठलेही शिक्षण घेत आहेत अशा युवकांची संख्या येणाऱ्या काळात २२ मिलियनपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. महिलांची स्थिती आणखी बिकट आहे. याठिकाणी महिलांच्या बेरोजगारीचा दर ३९ टक्के आहे. ज्या महिला काम शोधतात त्यांना नोकरी मिळणे कठीण आहे. 

दरम्यान, भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. भारतात ५८६ मिलियन लोक काम करतात. याठिकाणी जगातील सर्वात मोठी कामगार शक्ती आहे. भारताने बराच विकास साधला आहे. परंतु याठिकाणी समस्या आहेत. भारतात श्रीमंत आणि गरीब यांच्यात दरी आहे. इथं जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहतात पण गरीबीची तितकीच आहे. परंतु भारत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. पाकिस्तानची अवस्था सध्या खूप बिकट आहे. बेरोजगारी आणि शिक्षण याची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे भारताला मागे टाकणं पाकिस्तानसाठी एखाद्या स्वप्नासारखं आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत