शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

...तर माझं नाव बदलून टाका; शहबाज शरीफ यांनी केली पाकिस्तान-भारताची तुलना, वास्तव काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 15:32 IST

पाकिस्तानात बेरोजगारीची मोठी समस्या आहे. २०२३ मध्ये पाकिस्तानात बेरोजगारी दर २२ टक्के होता. २०२०-२१ मध्ये हा दर ६.३ टक्के होता.

नवी दिल्ली - जर पाकिस्तानने विकासाच्या बाबतीत भारताला मागे सोडलं नाही तर माझं नाव बदलेन असा दावा पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केला आहे. देशातील जनतेला खुश करण्यासाठी कदाचित शहबाज यांनी हे विधान केले असावे परंतु वास्तव पाहिले तर हे चित्र फार दूर आहे. भारताला मागे टाकण्याचा चंग बांधणाऱ्या पाकिस्तानी पंतप्रधानांनी आधी त्यांच्या देशातील स्थितीवर लक्ष द्यायला हवं असा शहबाज शरीफ यांचं विधान ऐकून प्रत्येकजण बोलत आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्या विकासात काय फरक?

पाकिस्तान आणि भारत हे दोन्ही देश एकमेकांचे शेजारी आहेत परंतु त्यांच्या अर्थव्यवस्था आणि विकासात मोठी तफावत असल्याचं दिसून येते. २०२४ ची पाकिस्तानी जीडीपी सांगायचं झाल्यास १.६५९ ट्रिलियन डॉलर आहे. या वर्षी २०२५ मध्ये ती १.७३६ ट्रिलियनपर्यंत पोहचण्याची अपेक्षा आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये वर्ल्ड इकोनॉमी आऊटलूकमध्ये हे आकडे दिलेत. दुसरीकडे भारताचा जीडीपी २०२४ मध्ये १४.५९४ ट्रिलियन डॉलर आहे. २०२५ मध्ये जीडीपी दर १५.५४१ ट्रिलियनपर्यंत जाण्याची शक्यता आहे. जर सामान्य जीडीपी पाहिला तर भारत ४.१३६ ट्रिलियन अमेरिकन डॉलर तर पाकिस्तान ०.३४१ ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतका आहे. भारताची अर्थव्यवस्था पाकिस्तानच्या १२ पट अधिक आहे.

पाकिस्तानात बेरोजगारीची मोठी समस्या आहे. २०२३ मध्ये पाकिस्तानात बेरोजगारी दर २२ टक्के होता. २०२०-२१ मध्ये हा दर ६.३ टक्के होता. १५ ते २४ वर्षातील युवकांची बेरोजगारी २९ टक्के इतकी आहे. १६ मिलियनपेक्षा अधिक युवक ना नोकरी करतात ना कुठलेही शिक्षण घेत आहेत अशा युवकांची संख्या येणाऱ्या काळात २२ मिलियनपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. महिलांची स्थिती आणखी बिकट आहे. याठिकाणी महिलांच्या बेरोजगारीचा दर ३९ टक्के आहे. ज्या महिला काम शोधतात त्यांना नोकरी मिळणे कठीण आहे. 

दरम्यान, भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. भारतात ५८६ मिलियन लोक काम करतात. याठिकाणी जगातील सर्वात मोठी कामगार शक्ती आहे. भारताने बराच विकास साधला आहे. परंतु याठिकाणी समस्या आहेत. भारतात श्रीमंत आणि गरीब यांच्यात दरी आहे. इथं जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहतात पण गरीबीची तितकीच आहे. परंतु भारत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. पाकिस्तानची अवस्था सध्या खूप बिकट आहे. बेरोजगारी आणि शिक्षण याची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे भारताला मागे टाकणं पाकिस्तानसाठी एखाद्या स्वप्नासारखं आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत