शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 12:53 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.  हा पुरस्कार मिळवणारे नरेंद्र मोदी हे जागातील 14 वे आणि भारतातील पहिले व्यक्ती ठरले आहेत.  

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान  हा पुरस्कार मिळवणारे नरेंद्र मोदी हे जागातील 14 वे आणि भारतातील पहिले व्यक्ती पुरस्कार म्हणून मिळालेली रक्कम नमामि गंगे प्रकल्पाला दान करणार असल्याचे मोदींनी जाहीर केले

सेऊल (दक्षिण कोरिया) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.  हा पुरस्कार मिळवणारे नरेंद्र मोदी हे जागातील 14 वे आणि भारतातील पहिले व्यक्ती ठरले आहेत.  दरम्यान, पुरस्कार म्हणून मिळालेली रक्कम नमामि गंगे प्रकल्पाला दान करणार असल्याचे मोदींनी जाहीर केले आहे.  ''सियोल शांती पुरस्कार प्राप्त होणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मात्र या  सन्मानाकडे मी केवळ वैयक्तिरित्या माझा माझा सन्मान म्हणून पाहत नाही तर भारतीय जनतेला कोरियाई जनतेने दिलेल्या सद्भावना आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून पाहतो,'' अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिली.

 सेऊल शांतता पुरस्कारासाठी जगभरातुन एकूण 1300 नामांकने प्राप्त झाली होती. त्यानंतर पुरस्कार कमिटीने त्यातील 100 नामांकनाबाबत गांभीर्याने विचार केला.  अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. या आधी हा पुरस्कार जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल आणि संयुक्त राष्ट्रांचे माजी प्रमुख असलेल्या बान की मून यांनाही हा पुरस्कार मिळाला होता.  

1) मोदीनॉमिक्स - नरेंद्र मोदी यांनी जनधनसारखी महत्त्वाची योजना सुरू केली होती. पुरस्कार समितीने गरीब आणि श्रीतमंत यांच्यातील अंतर कमी करण्यासाठीचे श्रेय हे मोदीनॉमिक्सला दिले. 2) भ्राष्टाचारावर लगाम - नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयावर देशात टीका झाली असली तरी पुरस्कार समितीने भ्रष्टाचार रोखण्यासाठीची आश्वासक पाऊले म्हणून या निर्णयांकडे पाहिले. 3) जागतिक सहकार्य - तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून दिलेल्या योगदानाची दखलही पुरस्कार समितीने घेतली.

सेऊल शांतता पुरस्कार काय आहे?  1988  मध्ये दक्षिण कोरियामध्ये 24 व्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले होते. या ऑलिम्पिकमध्ये 160 देशांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर दक्षिण कोरियाने सेऊल शांतता पुरस्कार देण्यास सुरुवात केली.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतSouth Koreaदक्षिण कोरिया