शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

हा दुसरा मुक्तीसंग्राम, आम्ही मुक्त झालो; नोबेल विजेते मोहम्मद यूनुस यांची शेख हसीनांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 12:36 IST

यूनुस यांनी नेहमीच शेख हसीनांवर टीका केलेली आहे. हसीना यांनी देखील यूनुस हे ग्रामीण बँकांद्वारे गरिबांना लुटत असल्याचे म्हणत १९० गुन्हे दाखल केले होते.

बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार बनविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पत्रकार, उद्योगपती, अर्थशास्त्री, राजकारणी व सैन्य असे मिळून सरकार चालविणार आहेत. अशातच या सरकारचे मुख्य सल्लागार असलेले व पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये आघाडीवर असलेल्या नोबेल पुरस्कार विजेत्या डॉ. मोहम्मद यूनुस यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. 

यूनुस यांनी नेहमीच शेख हसीनांवर टीका केलेली आहे. आता त्यांनी हसीना देश सोडून गेल्यावर द प्रिंटला मुलाखत दिली आहे, यात विद्यार्थ्यांचे आंदोलन हे बांगलादेशचा दुसरा मुक्तीसंग्राम होता, असे म्हटले आहे. तसेच हसीना देश सोडून गेल्याने आम्ही मुक्त झालो आहोत. आम्ही एक स्वतंत्र देश आहोत. जोवर त्या इथे होत्या आम्ही त्यांच्या ताब्यात होतो. त्या एक कब्जा करणारी शक्ती, एक हुकुमशहा, एक सेनापती सारखे वागत होत्या. ती सर्व काही नियंत्रणात ठेवत होती, असे यूनुस यांनी म्हटले आहे. 

यूनुस यांनी बांगलादेशमध्ये सहकार चळवळ राबविली होती. ग्रामीण बँकेची स्थापना करत गरीबांना लघु उद्योग सुरु करण्यासाठी कर्ज उपलब्ध केले होते. यामुळे त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता. या धर्तीवर जगभरातील देशांनी आपापल्या गावांमध्ये बँका उघडून गरीबांना आर्थिक मदत केली होती. यूनुस यांनी गरीबांचे रक्त शोषल्याचा आरोप शेख हसीनांनी केला होता. या ग्रामीण बँका गरीबांकडून भरमसाठ व्याज वसूल करतात, असा आरोप केला होता. हसीना यांच्या सरकारने यूनुस यांच्यावर १९० गुन्हे दाखल केले होते. त्यांच्यावर एक भ्रष्टाचाराचा अभियोगही सुरु झाला होता. 

चारवेळा सलग सत्तेत आलेल्या हसीना यांना यूनुस यांनी हुकुमशहा म्हटले आहे. हसीना यांनी बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीबुर्रहमान यांची प्रतिमा बरबाद केल्याचा आरोप यूनुस यांनी केला आहे. याचबरोबर बांगलादेशातील हिंसाचार योग्य असल्याचे यूनुस म्हणाले. देशात जी हिंसा, तोडफोड होत आहे तो हसीना यांच्याविरोधातील लोकांमधील राग आहे. हेच विद्यार्थी देशाला योग्य दिशेने नेतील, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Bangladeshबांगलादेश