शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
3
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
4
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
5
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
6
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
7
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
8
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
9
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
10
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
11
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
12
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
13
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
15
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
16
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
17
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
18
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
19
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
20
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?

संकटाची चाहूल! "2050 पर्यंत पृथ्वीवरील अन्नधान्य संपणार; एकही कण नाही उरणार", गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 10:39 IST

संशोधकांनी आता अन्नधान्याच्या कमतरतेसंदर्भात एक धोक्याचा इशारा दिला आहे. येत्या 27 वर्षांमध्ये जगातील सर्व धान्य संपणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

जगभरातील लोकसंख्या अत्यंत वेगाने वाढत आहे. गरिबांना तर दोन वेळचं जेवण मिळणं देखील अवघड असतं. तर दुसरीकडे अन्नाची नासाडी होत असल्याची कित्येक उदाहरणं समोर येत आहेत. याच दरम्यान अशीच एक धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. संशोधकांनी आता अन्नधान्याच्या कमतरतेसंदर्भात एक धोक्याचा इशारा दिला आहे. येत्या 27 वर्षांमध्ये जगातील सर्व धान्य संपणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 24 एप्रिलपासून संशोधकांनी सजीवसृष्टीच्या मृत्यूच्या दिवसाची मोजणी सुरू केली आहे. पृथ्वीवासीयांकडे आता फक्त 27 वर्षं आणि 251 दिवस शिल्लक राहिले आहेत, असा संशोधकांनी दावा केला आहे. 

सोशियोबायोलॉजिस्ट एडवर्ड विल्सन (Sociobiologist Edward Wilson) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीवरच्या माणसांची अन्नाची मागणी पूर्ण करायची असेल, तर आपल्याला आणखी दोन पृथ्वीसाऱख्या ग्रहांची गरज भासणार आहे. एडवर्ड विल्सन सांगतात, की पृथ्वीवर अन्नधान्य पिकवण्याची माणसाची एक मर्यादा आहे. जगातला प्रत्येक माणूस शाकाहारी बनला, तरी माणसाच्या गरजा भागवण्यासाठी जगातले शेतकरी आणि त्यांच्या जमिनी इतक्या मोठ्या प्रमाणात धान्यनिर्मिती करू शकणार नाहीत. पुढच्या काळात जगभरातली लोकसंख्या प्रचंड वाढणार आहे. 

प्रत्येक माणसाची खाण्याची मागणी पूर्ण केली जाऊ शकणार नाही. पुढच्या 27 वर्षांमध्ये म्हणजेच 2050 मध्ये जगाची लोकसंख्या 10 अब्ज पोहोचणार आहे. अन्नधान्याच्या मागणीबाबत बोलायचं झाल्यास ही संख्या 2017 सालाच्या तुलनेत 70 टक्के वाढण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांनी वाढती लोकसंख्या आणि अन्न-धान्य उत्पादनांच्या आकडेवारीवरून निष्कर्ष काढला आहे. तो असा, की गेल्या आठ हजार वर्षांमध्ये माणसाने कधीच केलं नसेल, इतक्या धान्याचं उत्पादन येणाऱ्या 40 वर्षांत माणसाला करावं लागणार आहे. 

पृथ्वी एक हजार कोटी नागरिकांना अन्न खाऊ घालू शकेल. परंतु त्यानंतर धरतीवरचा भार वाढायला सुरुवात होणार आहे. माणसं आवश्यकतेपेक्षाही जास्त अन्न खात आहेत आणि नंतर अन्नाची नासाडीही करत आहेत. त्यामुळे धान्यनिर्मिती करण्यासाठी पृथ्वीवर दबाव वाढत जाणार आहे. पृथ्वीवरचे सर्व नागरिक शाकाहारी झाले, तरच जास्त लोकसंख्येला अन्न खाऊ घालता येणार आहे. उदाहरणार्थ, मक्याच्या तुलनेत मांसाचं उत्पादन करण्यास 75 हून अधिक पट ऊर्जेचा वापर केला जातो. 2050 पर्यंत जगातल्या सर्व देशांमध्ये अन्नधान्याची कमतरता भासणार आहे, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Earthपृथ्वी